काव्यशिल्प Digital Media: पुरस्कार

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पुरस्कार. Show all posts
Showing posts with label पुरस्कार. Show all posts

Tuesday, June 19, 2018

सत्यपाल महाराजांना प्रबोधनकार पुरस्कार

सत्यपाल महाराजांना प्रबोधनकार पुरस्कार

नागपूर/प्रतिनिधी:
मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे पुरस्कारासाठी यंदा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी जे सामाजिक कार्य केले त्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मारवाडी फाउंडेशनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येत असतो. समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद, जुन्या रुढी, परंपरा या बाबींचा नायनाट करण्यासाठी लोकजागृती करणारे सत्यपाल महाराज यांची यंदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापूर्वी (स्व.) डॉ. भा. ल. भोळे, पन्नालाल सुराणा, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. एन. डी. पाटील, रामकृष्णदादा बेलूरकर, शरद जोशी, डॉ़ सदानंद मोरे, अॅड. मा. म. गडकरी, गिरीश कुबेर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार प्रदान समारंभ प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी, २० नोव्हेंबर २०१८ रोजी नगपुरात होणार आहे.

Friday, May 04, 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रस्ताव आमंत्रित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील अनुसूचित जाती –जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्ठरोगी इत्यादींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवी व्यक्ती व संस्थांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार योजना सन 2018-19 शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून 24 मे 2018 पर्यत शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती-जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अंपग,कुष्ठरोगी इत्यादीच्या विकासासाठी शिक्षण,आरोग्य,अन्याय निर्मूलन,अंधश्रध्दा रुढी निर्मूलन व जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.या योजनेनुसार व जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातेा.
या योजनेनुसार अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्ठरोगी इत्यादींच्या विकासासाठी कार्य करणारे नामवंत समाजसेवक असावेत व त्यांनी सामाजिक क्षेत्रात कमीम कमी 10 वर्षे काम केलेले असावे.प्रस्ताव सादर करतांना अशा सामाजिक कार्यकर्ऱ्याचे वय 24 मे 2018 रोजी 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त व स्त्रियांसाठी 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.अपवादात्मक परिस्थितीत वय शिथील करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्ती केलेल्या समितीकडे राहतील.जिल्हा पोलीस अधीक्षकांचा चारित्र्यविषयक दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,फोटो व केलेल्या कार्याविषयी माहिती प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावा.यापूर्वी राज्य शासनाच्या कोणत्याही पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत.सदर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही,असे सहायक आयुक्त,समाजकल्याण, विभाग चंद्रपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. पुरस्कारासंबधी अधिक माहिती व अजाचा नमुना सहायक आयुक्त, समाज कल्याण,विभाग चंद्रपूर यांचे कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.

Thursday, January 25, 2018

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी पद्मश्री पुरस्कार

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी पद्मश्री पुरस्कार

पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय, राणी बंग यांना पद्मश्री
नवी दिल्ली /ऑनलाईन काव्यशिल्प:                विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्कारांची आज (गुरुवार) घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अभय बंग, राणी बंग यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
                      प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात बंग दाम्पत्यालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्षे गडचिरोलीतील दुर्गम भागांत वैद्यकीय सेवा देणाऱ्या या दाम्पत्याचा हा उचित सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे. 
डॉ. अभय बंग यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तीन विषयांत सुवर्णपदक मिळवल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणात त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातही सुवर्णपदक मिळवले. शहरातील ऐशो आराम आणि भौतिक सुखांचा त्याग करून त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात आपले कार्यक्षेत्र निवडले. 
डॉ. राणी चारी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर पती-पत्नी दोघांनी गडचिरोलीत समाजकार्याला वाहून घेतले. गडचिरोलीत त्यांनी बालमृत्यू रोखण्यसाठी केलेल्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्याचबरोबर बंग दाम्पत्याने महिलांचे आरोग्य दारूबंदी या विषयांवरही काम केले आहे.
                  केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील काही जणांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो.

Monday, January 08, 2018

 मतीन भोसले यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार; आनंदवनात वितरण सोहळा

मतीन भोसले यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार; आनंदवनात वितरण सोहळा

Baba Amte Humanity Award to Matin Bhosale | मतीन भोसले यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार; आनंदवनात वितरण सोहळाचंद्रपूर/प्रतिनिधी:  

 यावर्षीचा कर्मयोगी बाबा आमटे मानवता पुरस्कार मतीन भोसले यांना तर साधनाताई आमटे समीधा पुरस्कार हा शुभदा देशमुख यांना बहाल करण्यात आला. आनंदवन चौकातील ज्ञानदा जीवन विकास केंद्र परिसरात रविवारी आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदा वसतिगृहाचे माजी विद्यार्थी तथा लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरचे संचालक डॉ. हरीश वरभे होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, प्रयास सेवांकूर संस्था अमरावतीचे संस्थापक डॉ.अविनाश सावजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्मयोगी बाबा आमटे मानवता पुरस्कार गोवा स्वातंत्र संग्राम सैनिक श्रीधर पद्मावार प्रायोजित असून यामध्ये ५१ हजार रुपये रोख, मानपत्र असलेला पुरस्कार यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाण गावात पारधी समाजातील मुलांकरिता आश्रमशाळा काढून शाळेची यशस्वी वाटचाल करणारे मतीन भोसले यांना प्रदान करण्यात आला.
याचवेळी साधनाताई आमटे समीधा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील कुरेखडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या सहसंस्थापिका शुभदा देशमुख यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख व मानपत्र होते. याप्रसंगी प्रा. म. घो. उपलेंचवार लिखित मानपत्राचे वाचन ज्ञानदा वसतिगृहाचे माजी विद्यार्थी प्राचार्य गजानन लोनबले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक माजी विद्यार्थी दिलीप अग्रवाल यांनी केले. संचालन शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश महाकाळकर यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. श्रीराम महाकरकर यांनी मानले. सुचेता पद्मावार यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. साधनाताई आमटे समीधा पुरस्कार भारत जोडोचे गिरीष पद्मावार यांनी प्रायोजित केला.

Monday, December 04, 2017

अविनाश पोईनकर यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय रसिकराज वाड:मय पुरस्कार

अविनाश पोईनकर यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय रसिकराज वाड:मय पुरस्कार

चंद्रपूर/ प्रतीनिधी :
कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रतिथयश कवी अविनाश पोईनकर यांच्या 'उजेड मागणारी आसवे' या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय रसिकराज उत्कृष्ठ वाड:मय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी संस्कृत विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.पंकज चांदे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सुधाकर मोगलेवार, डॉ.बळवंत भोयर, आचार्य ना.गो.थुटे, मेजर हेमंत धकाते उपस्थित होते. अविनाश पोईनकर यांचा 'उजेड मागणारी आसवे' हा कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला आहे. प्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक डॉ.किशोर सानप यांची प्रस्तावना व पहिले युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्वर्य पाटेकर यांचे ब्लर्ब या कवितासंग्रहाला आहे. राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश पोईनकर यांचे अक्षर साहित्य कला मंच व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.

Friday, November 10, 2017

नॅशनल मीडिया अवार्ड’साठी करा अर्ज

नॅशनल मीडिया अवार्ड’साठी करा अर्ज

 १७ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे निवडणूक आयोगाचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी: मतदारांमध्ये उत्कृष्टरित्या जनजागृती मोहीम राबविणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांनी‘नॅशनल मीडिया अवार्ड’ पुरस्कारासाठी दि. १७ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

मतदारांमध्ये निवडणूक, मतदार नोंदणी आदी विषयक उत्कृष्टरित्या जनजागृती ‍‍‍‍‍‍‍‌‌‌‌‌मोहीम राबविणाऱ्या प्रिंट मीडीया, दूरचित्रवाणी (टि.व्ही.) माध्यम, रेडियो आणि ऑनलाईन (इंटरनेट) किंवा सोशल मीडिया या चार माध्यमांना भारत निवडणूक आयोगाच्यावतीने‘नॅशनल मीडिया ॲवार्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून १७ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२५ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. जनजागृती मोहिमेचा दर्जा,व्यापकता, जनतेवर पडलेल्या सकारात्मक प्रभावाचा पुरावा यासह अन्य बाबींचा विचार पुरस्कारांसाठी केला जाईल.

२०१७ या वर्षात केलेल्या जनजागृतीच्या माहितीसह प्रसिद्धी माध्यमांनी आपला प्रस्ताव पवन दिवाण, अवर सचिव (संज्ञापन), भारत निर्वाचन आयोग, निर्वाचन सदन, अशोक रोड, नवी दिल्ली ११०००१, ई-मेल- diwaneci@yahoo.co.in,दूरध्वनी क्र. ०११-२३०५२१५३ या नावाने तयार करावा. हा प्रस्ताव विहीत मुदतीच्या आत मुख्य निवडणूक अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग,मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,मुंबई-३२ यांच्याकडे सादर करावा.

पुरस्कारासाठी पात्रता, आवश्यक बाबी

मुद्रित माध्यमांसाठी - संबंधित कालखंडात केलेल्या कामांचा सारांश, बातम्यांची तसेच लेखांची संख्या, प्रसिद्ध केलेल्या मजकुराचे एकूण स्वे.सें.मी. क्षेत्रफळ, एक पीडीएफ सॉफ्ट कॉपी किंवा संबंधित वेब पत्त्यावरील वृत्त, वर्तमानपत्र, लेखांची संपूर्ण आकारातील छायाचित्रीत, प्रिंट प्रत, प्रत्यक्ष सहभागासारख्या इतर कोणत्याही कामाचा तपशील,कोणतीही इतर माहिती.

दूरचित्रवाणी (टि.व्ही.) आणि रेडिओ माध्यमांसाठी - संबंधित कालावधीत चालविण्यात येणाऱ्या मोहिमेदरम्यान प्रसारित कार्यक्रमांचा कालावधी, वेळ, प्रत्येक स्पॉटच्या प्रसारणासह एकूण साहित्य (सीडी किंवा डीव्हीडी किंवा पेन ड्राइव्हमध्ये) आवश्यक आहे, एकूण प्रसारण वेळेची बेरीज,मतदाराची जागरुकता यावर बातम्या किंवा कार्यक्रम. तसेच याचसारख्या वृत्तविशेष, कार्यक्रमांच्या प्रसारणाचा दिनांक, वेळ याबाबत वरील माध्यमांमध्ये एकूण साहित्य. प्रत्यक्ष सहभागासारख्या इतर कोणत्याही कामाचा तपशील, कोणतीही इतर माहिती.

ऑनलाईन माध्यमांसाठी - संबंधित कालावधीत केलेल्या पोस्ट, ट्वीट, ब्लॉग, कॅम्पेन, लेख यांचा सारांश. संबंधित लेखाची पीडीएफ कॉपी किंवा वेब ॲड्रेसची लिंक. प्रत्यक्ष सहभाग असल्यास त्याचा पुरावा, मतदारांवर झालेला परिणाम याबाबत आदी माहिती.

नियम व अटी

 हिंदी व इंग्रजी भाषेव्यतिरिक्त असणाऱ्या प्रवेशिकांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले असणे बंधनकारक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रवेशिकामधील साहित्यातील पहिल्या १० मिनीट कालावधीतच या परिक्षकांना प्रवेशिकेचे मूल्यमापन करता येईल अशा प्रकारचे असावे. प्रवेशिकेवर नाव,पत्ता, दूरध्वनी, फॅक्स, इ-मेल पत्ता आणि माध्यमाचे नाव असणे आवश्यक आहे, असेही कळविण्यात आले आहे.