रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचा आज जन्मदिवस
सर्वकाही स्वतःच्या मीळकतीतून व निस्वार्थपणे करण्याचा त्यांचा आग्रह होता.नंतरच्या काळांत त्यांनी मनसर सह देवलापार,पारशिवनी व कन्हान या भागातही रूग्णवाहीका उपलब्ध करून दिल्या.व या सर्व सेवा आजही अखंडीत सुरू आहेत.संस्थेच्या स्थापनादिनाला दरवर्षी या भागातील सर्वसामान्यांना टिनपत्रे,अपंगाना ट्राय सिकल,रामटेक तालुक्यांतील सर्व शाळांच्या प्रत्येकी गरजू दहा विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश व पाठयपुस्तके,पर्यावरणाच्या रक्षणासाठी गावागावात रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण आदी नियमीतपणे ते राबवितात.
राजकारणांत येवून जनता जनार्दनासाठी अजून जास्त करता येईल ही भावना मनात आल्याने दोनवेळा आमदारकी लढविली पण यशआले नाही.मागच्या निवडणुकीत मात्र भाजपासेना युती ऐनवेळी तुटली व भाजपाचे नेतेनामदार नितीनजी गडकरी यांनी रेड्डी यांना भाजपाची रामटेक विधानसभेतूनउमेदवारी दिली.एकूणच देशात व महाराष्ट्रात परीवर्तनाची लाट होती.त्यांचे स्वतःचेही समाजकार्य लोकांपुढे होते व त्यामुळे ते रामटेक विधानसभा क्षेत्रांतून विजयाी झाले.गेल्या तीन वर्षांत त्यांनी आमदार म्हणून जे काही काम केले ते जनतेपुढे आहे.रामटेकचा 150 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करवून घेण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा व प्रयत्न प्रशंसनीय आहेत.अजून सुमारे दोन वर्षाचा त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ शिल्लक आहे.
रामटेकचा शिर्डी-शेगांवच्या धर्तीवर विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे यासाठी शासनदरबारी ते फार प्रयत्नशील व आग्रही आहेत.त्यांनी स्वतःला मीळणारा आमदारकीचा पगारही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूबांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीला दिला आहे.