সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 09, 2017

नागपूरमध्ये ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह


पुणे : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कायम असल्याने महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास अराजक परिस्थिती निर्माण होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि उपाध्यक्ष अशोक धिवरे यांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला २० डिसेंबर रोजी ५२ महिने पूर्ण होत आहेत. पानसरे यांच्या खुनाला ३४ महिने पूर्ण होत आहेत. या खुनांच्या कटामध्ये सनातन आणि हिंदू जनजागरण समितीचा हात असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे अटकेत असले तरी फरार मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच अटकेतील दोघांना जामीनावर सोडण्यासाठी न्यायालयावर दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे कायदा-व्यवस्थेचा धाक कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी जवाब दो धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दाभोलकर आणि पानसरे यांचे खून विचारधारेच्या आधारावर झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा छडा लावण्यासाठी तपास यंत्रणेमध्ये विचारी, विवेकी लोक असण्याची गरज आहे, असे मत धिवरे यांनी व्यक्त केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.