
ई-पंचायत
शासनाच्या या ङ्कमहाऑनलाईनङ्क कंपनीने घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
अॅड. गोस्वामी म्हणाल्या, केंद्र शासनाच्या निधीतून ई-पंचायत प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी ग्राम पंचायतीच्या अधिकारातील तेराव्या वित्त आयोगाच्या २० टक्के निधीतून खर्च केला जातो. हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी शासनाने महाऑनलाईनला व जलसंधारण मंत्रालयाला देण्यात आली. २०१० मध्ये तयार झालेली ही कंपनी राज्य शासन व टाटा कन्सलटन्सीची संयुक्त कंपनी आहे. ग्रामपंचायत स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्यात यावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. राज्य शासनाची चोविस टक्के भागीदारी असताना ही ऑपरेटरला ८ हजार ३२४ रुपये देण्याबाबतचा करार ग्राम पंचायतीने करावा. असाही निर्णय ३० एप्रिल २०११ रोजी शासनाने घेतला. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या नियुक्तीचे अधिकार खासगी कंपन्यांना दिले. शासनाने ग्राम पंचायतीला आदेश न देता महाऑनलाईनने करार केलेल्या युनिटी टेलकॉम इन्फ्रस्ट्रक्चर, युनिटी आयटी आणि चंद्रपूर ऑनलाईन लिमीटेड यांचे मार्फत डाटा एन्ट्री ऑपरेटरशी करार केला.