সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 19, 2017

चहाचा घोटच ठरला अखेरचा

तीन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

सोलापूर : चहाची तलफ लागल्याने चहा पिण्यासाठी बाइकवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हे तिन्ही विद्यार्थी ठार झाले. आज पहाटे ही दुर्देवी घटना घडली.संगमेश माळगे, दीपक घुमडेल आणि अक्षय आसबे अशी या तिन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापूरजवळील तळे हिप्परगाजवळ आर्किड महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत होते. ते तिघेही शनिवारी रात्री ग्रंथालयात अभ्यासासाठी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास चहा पिण्यासाठी ते तळे हिप्परगा येतील कँटीनवर आले होते. यादरम्यान रस्त्यावरून जाणार्‍या ट्रकने तिघांना उडविले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. पोलीस तसेच ग्रामस्थांनी या तिघांना जखमी अवस्थेत सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघातात ठार झालेला दीपक हा सोलापूरच्या रेमंड शोरुमच्या मालकाचा मुलगा आहे. तर अक्षय आसबे हा पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील रहिवाशी आहे. अपघाताचे वृत्त समजताच रुग्णालयात नातेवाईक तसेच त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही रुग्णालयात भेट देवून पाहणी केली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.