সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 21, 2017

धनगर समाजाचा हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा

वरोरा/ भद्रावती (प्रतिनिधी) :  मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणु कीपूर्वी व निवडणूकी नंतर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षनाची अमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन देऊनही त्यांची अजूनपर्यंत पूर्तता केली नाही. याउलट TISS ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ  सोशल सायन्सेस)  या संस्थेकडून सर्व्हेक्षण करून अहवाल मागविला आहे. त्याची गरज नसून समाजाचा विरोध आहे.  धनगर समाज राज्यातील अनुसूचित जमातीचे यादीत ३६ क्रमांकावर असून देखील धनगर समाजास सवलती पासून वंचित ठेवण्याचे महाराष्ट्र सरकारचे हे कटकारस्थान आहे . असे  नागपूर चेधनगर समाज जिल्हाध्यक्ष रमेश पाटील चंद्रपूर जिल्याच्या दवऱ्या दरम्यान वरोरा - भद्रावती बैठकीत बोलत होते.  करिता महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एसटी आरक्षण अमलबजावणी समूहिक नेतृत्वात हल्लाबोल मोर्चाचे  आयोजन दि. ११ डिसेंबर२०१७ ला ११ वाजता हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.  मोर्चा यशवंत स्टेडियम, नागपूर येथून निघणार असून या मोर्चा ला जिल्यातून जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  माजी आमदार हरिदास भदे, अध्यक्ष रमेश पाटील, ज्ञानेश्वर घायवड, पुरुषोत्तम घायवड, देवराव ठमके, गुलाबराव चिडे, रमेश उरकुडे, अमित ठमके, पंढरीनाथ बोधे, श्रीहरी घोटकर, पुंजराम तुरके. यांनी केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.