वरोरा/प्रतिनिधी :
गेल्या सहा दिवसापासून साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी विरोधात पूर्व व्रत कामावर घेण्याच्या मागणी साठी ५० कामगार अन्नत्याग आंदोलनाला बसले होते . मात्र सहा दिवस लोटूनही कंपनी व्यवस्थापना पाझर न फुटल्याने आ .बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळ भेट कामगारांना उपोषण सोडण्यास सांगितले व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वसन दिले त्या नंतर कामगारांनी उपोषण सोडले . साई वर्धा पॉवर जनरेशन या विद्युत तयार करणारया कंपनीतील १५० कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामगारांना कमी केल्याचा प्रकार ३ महिन्यापूर्वी घडला त्या वरून दीडशे हि कामगारांनी संघटित होऊन कंपनी च्या विरोधात आंदोलन पुकारले ३ महिन्यापासून शासन दरबारी न्यासाठी चकरा मारूनही कुठलाही तोडगा न निघाल्याने ७ नोव्हेंबर पासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते एक दिवसीय साखळी उपोषण करून ८ नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली होती .मात्र सहा दिवस लोटूनही कंपनी व प्रशासनाला पाझर न फुटल्याने व अर्ध्यापेक्षा जास्त उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने अखेर आज त्यांनी उपोषण सोडले . यावेळी आ . बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळ भेट देऊन आपण लढवय्ये आहोत .उपाशी राहून आंदोलन करायचे नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहो असे म्हणत बुधवारला उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत बैठक लावणार असल्याचे सांगितले ..त्यांनतर कामगारांनाही उपोषण सोडले यावेळी वरोरा येथील तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते .तर प्रहार संघटनेचे संस्थापक आ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून चर्चा केली असता कंपनी प्रशासन आमचा आदेश पाळत नसल्याचे खळबळ जनक उत्तर त्यांनी दिल्याने हा प्रश्न कामगार मंत्री यांच्याशी बैठक लावून सोडवणार असल्याचे आ कडू यांनी उपोषण कर्त्यांना सांगितले .
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...