সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 13, 2018

कृषीपंपांना वीजजोडणी देण्यासाठी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क

अक्षांश-रेखांशच्या मदतीने देण्यात येणार वीजजोडणी 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
३१ मार्च २०१८ अखेर कृषीपंपासाठी प्रलंबित असलेल्या कृषीपंप ग्राहकांना नजिकच्या उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी देण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केले आहे. यासाठी कृषीपंप ग्राहकांच्या स्थळाचे अशांश-रेखांश याची आवश्यकता आहे व ते मिळविण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. ही माहिती लवकर मिळण्यासाठी ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपला मोबाईल नंबर नोंदविला आहे अशा ग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे मोबाईलवर संपर्क साधला जात आहे.
महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहकसेवा केंद्रांद्वारे पाठविलेल्या एसएमएस व सूचनेनुसार शेतकऱ्यांनी https://goo.gl/GtMGVD यावर क्लिक करून फोटोद्वारे कृषीसंचाच्या मांडणीची अक्षांश व रेखांशची माहिती पाठवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. आतापर्यन्त राज्यातील ८६२ कृषीपंपग्राहकांनी कृषीसंचाच्या मांडणीच्या फोटोची माहिती यशस्वीरित्या दिलेली आहे. 
ज्या शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविले नसतील त्या शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे टोल फ्री क्र. १८०० १०२ ३४३५ व १८०० २३३ ३४३५ यावर नोंदवावेत, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.