सहा.आयुक्तांच्या गाडीसमोर ठेलेवाल्यांचा १ तास ठिय्या
ललित लांजेवार:
चंद्रपुरात प्लास्टिक बंदीच्या कारवाई वरून सुरु झालेल्या मनपाच्या कारवाईला गुरुवारी वेगळेच वळण मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार प्लास्टिक बंदी झाल्यानंतर शहरात मनपा प्लास्टिक बंदी मोहिमेसाठी धडक मोहीम राबवीत आहे,अश्यातच गुरुवारी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक परिसरात मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एका पानठेल्यातून प्लास्टिक जप्त केला व त्यावर कायदेशीर कारवाई केली असे मनपाचे कर्मचारी यांचे म्हणणे आहे,दोषी पानठेला मालकावर दंड आकारण्यात आला होता.मात्र पानठेला चालकाला हे मंजूर नव्हते. हि कारवाई सुरु असतांनाच हॉकर्स असोसिएशनच्या काही लोकांनी ठेलेवाल्यांच्या बाजूने बचावात या कारवाईत उडी घेतली,येथे एका नवीनच वादाला तोंड फुटले. ह्या कारवाईला पुढे नेत मनपा अधिकारयांचा मोर्चा हा शहरातील वरोरा नाका परिसरातील पत्रकार भवन येथे वळला. या ठिकाणी मनपाची अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु असतांना एका व्हाईट कॉलर नेत्याने ठेलेवाल्यांना एकत्र करत या कारवाईला विरोध केला,मात्र हा अतिक्रमनाचा वाद अधिकच चिघळला,
अतिक्रमण विभागाची कारवाई सुरु असतांना कारवाई दरम्यान कारवाई स्थळावर शासकीय वाहनाने आलेल्या सहा.आयुक्त शितल वाकडे यांची गाडी परिसरातील संपूर्ण हात ठेलेवाल्यांनी रस्त्यावर अडवत सहा.आयुक्त शितल वाकडे यांना तब्बल एका तास घेराव घातला. या ठेलेवाल्यांनी सहा.आयुक्त वाकडे यांच्या गाडी समोर मागे-पुढे ठिय्याच मांडला. शेवटी गाडीत बसलेल्या शीतल वाकडे ह्या गाडीतून बाहेर येत काही अंतरावर उभ्या राहिल्या. स्थिती आणखीनच चिघळत दिसल्याचे समजताच आयुक्त यांनी अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे यांना संपर्क करत अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे व उपायुक्त विजय देवलीकर यांनी पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळावर मदत म्हणून मागविला .वरोरा नाका परिसरात दिवसेंदिवस चायनीज आणि पानठेल्यांची संख्येत वाढ होत आहे.
अश्या आशयाची तक्रार मनपा अतिक्रमण विभागाला मिळाली होती.याच तक्रारीच्या आधारे मनपाच्या अतिक्रमण विभागाने हि कारवाई केली. दरम्यान या कारवाईत अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे, उपायुक्त विजय देवलीकर, अतिक्रमण व जब्ती विभागाचे भाऊराव सोनटक्के, नामदेव राऊत व रामनगर पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. हा वाद इथेच थांबला नसून रामनगर पोलिसात गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाला आता काय वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...