সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 31, 2018

विविध मुद्यांवरून गाजली चंद्रपूर मनपाची आमसभा

 ललित लांजेवार:
मंगळवारी चंद्रपूर मनपाच्या सभागृहात आयोजित आमसभेत  विविध मुद्यांवरून चांगलीच गाजली.आरोग्य,औषध,दुषित पाणी,शहरातील LED दिवे,गुंठेवारी प्रकरण,शहरातील मुख्य रस्त्यांचे सौदर्यीकरण व रुंदीकरण,अतिक्रमण,बाबूपेठ उड्डाण पुलाचे धीम्या गतीने होत असेलेले बांधकाम,अश्या विविध मुद्द्यांवरून आज पालिकेच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकात हल्ला ऐकायला मिळाला.
सभा सुरु होताच सभागृहात झारखंड आणि जम्मूमध्ये शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शहिदांना श्रद्धांजली देत असतांना मात्र चंद्रपूर शहरात खड्ड्यांमुळे विनाकारण बळी गेलेल्या नंदा प्रमोद बेहरम (५८) रा. वडगाव व काजल पाल (१८) रा.बंगाली कॅम्प या दोघांचाही सभागृहाला विसर पडला.या आमसभेला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.
 सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र मनपाच्या आरोग्य केंद्रावर औषधच उपलब्ध नसल्याने रूग्णांलयांमध्ये रुग्णाची गैरसोय होत आहे,सध्या सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने नागरिकात रोष आहे.मंगळवारी मनपाच्या सभागृहात नगरसेवक सचिन भोयर यांनी अजेंट्यावरील विषय बाजूला ठेऊन पहिले,नगरसेवक व नागरिकांना हुज्जतबाजी करणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱयांना सस्पेंड करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व नगरसेवकांनी महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे लावून धरली. शहरातील आरोग्यकेंद्रावर डॉक्टर वेळेवर हजर होत नाही,औषधांचा तुटवडा आहे,रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत असल्याच्या वारंवार तक्रारी जनतेकडून नगरसेवकांना प्राप्त होत होत्या ,त्यावर उत्तर देत महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या ब्योम्याट्रिक थम मशीन तात्काळ प्रत्येक आरोग्य केंद्रावर बसवून उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. व वागणूक व्यवस्थित नसेल त्याविरुद्ध नौकरीवरून निलंबीत करण्याचे आदेशही देण्यात येतील अश्या सूचना यावेळी आरोग्य अधिकारी अंजली आंबटकर यांना करण्यात आल्या.
नगरसेवकांनी महापौर अंजली घोटेकर यांना विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी देखील नगरसेवकांशी हुज्जत बाजीने बोलतात  यावर उत्तर देत महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या यानंतर सन्मापूर्ण वागणूक न देणाऱ्यांवर नौकरीवरून पायउतार करू त्यामुळे आता अधिकाऱ्यांवर चुकीला माफी नसल्याची वेळ आली आहे .
आवश्यकतेनुसार रस्त्यावरील झाडे येणार काढण्यात 
शहरातील अनेक प्रभागात दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे
हि बाब सभागृहाच्या लक्षात आणून देतांना दीपक जयस्वाल 
व्यापाऱ्यांनी फुटपाथवर केलेले अतिक्रमण वाहनांची कोंडी व अरुंद रस्ते शहरातील मुख्य समस्या असतांना त्यामुळे मनपा अंतर्गत विकास कामात शहरातील मुख्य रस्ता असलेले गांधी चौक ते जटपुरागेट व कस्तुरबा मार्गाचे २ कोटी ५६ लाखाचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरु होणार आहे,त्या मार्गावर अनेक झाडेआधी पासून लावण्यात आले आहे अश्या झाडांना आवश्यकते नुसार काढण्यात येणार असल्याचे आयुक्त संजय काकडे यांनी सभागृहाला सांगितले हा रुंदीकरणाचा स्पेस वाढवून येथे पार्किंगची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले ,रस्ते बांधकामाचा टेंडर वारंवार एकाच व्यक्तीला का? व या मार्गावर येणाऱ्या झाडांचे काय? असा सवाल नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी उपस्थित केला होता त्यावर उत्तर देतांना आयुक्त संजय काकडे यांनी सभागृहाला हि महिती दिली.
      ट्रायस्टार ते एमईएलपर्यंतचा रस्ता वगळण्याचा ठराव मंजूर 
नगरपालिका अस्तित्वात असताना १९९७ मध्ये शहराच्या आराखड्या नुसार ६० मीटर रुंद विकास योजना रस्ता हा वळण रस्ता म्हणून मंजूर करण्यात आला होता. सदर रस्ता होटल कुंदन प्लाझा( ट्रायस्टार) ते तुकूम परिसरातील लॉ कॉलेजपर्यंतचा हा रस्ता होता. या रस्त्यामुळे ७०० हून अधिक घरे बाधित होणार होती,त्यामुळे नगरसेवक अशोक नागापुरे यांनी या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यांनी नगरपालिकेने दिलेल्या नोटीसांवर स्टे दिला.त्यानंतर ह्या विषय थंड बस्त्यात पडला. आजच्या आमसभेत नगरसेवक संदीप आवारी यांनी रिंगरोडमधून नेहरूनगर परिसर वगळण्यात यावा हा विषय सभागृहात उपस्थित केला होता,या संधर्भात नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या परिसरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० जात  असल्याने सध्या या रस्त्यावर ५६० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा विषय प्रस्तावित आहे. त्यामुळे या मार्गावरील ७०० घरे बाधित होण्यापासून वाचली आहेत. 
बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम संथ गतीने 
गेल्या कित्तेक दिवसांपासून बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. या प्रभागात लालपेठ,जुनोना,बाबूपेठ या परिसरातील व शहरातील अर्ध्या अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे.
 रेल्वे वाहतुकीने आधीच समस्या झेलत असलेल्या बाबूपेठ वासियांना आणखी किती दिवस उड्डाण पुलाच्या संथगतीने सुरु असलेल्या समस्सेला झेलावे लागेल असा प्रश्न बसप गटनेता अनिल रामटेके, स्नेहल रामटेके यांनी उपस्थित केला.



हा तर वडगाव प्रभागावर अन्याय 
पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप
शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना मालमत्ता कराची माफी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी
 मौजा दे.गो. तुकूम मधील 8 जागेवरील आरक्षण काढण्याचा विषय आज आमसभेमध्ये आला होता. यावर वडगाव प्रभागाचे  नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मुद्द्याला धरून आमसभेत प्रश्नांची सरबत्ती केली.वडगाव प्रभागामध्ये सुद्धा अनेक जमिनीवर आरक्षण आहेत. आरक्षण असलेल्या जमिनीवर रहिवाशी घरे झालेली आहेत. शासनाच्या नियमानुसार 50 टक्केपेक्षा जास्त घरे झालेली असताना व आरक्षणाची गरज नसल्यास अशा प्रकारचे आरक्षण काढण्याची तरतूद आहे.असे पप्पू देशमुख यांचा आमसभेत सांगितले.
या तरतुदीचा वापर करीत मौजा दे गो. तुकुम मधील आरक्षण काढण्याचा विषय महासभेमध्ये घेण्यात आला.मग वडगाव प्रभागात सोबत दुजाभाव का करण्यात येत आहे,वडगाव प्रभागातील नागरिक गुंठेवारीसाठी चकरा मारत आहेत. अशा वेळी वडगाव प्रभागांमधील ट्रक टर्मिनल व इतर आरक्षण जिथे 50 टक्केपेक्षा जास्त निवासी घरे झाली,ही आरक्षणे काढण्याचा विषय का घेण्यात आला नाही.हा वडगाव प्रभागावर अन्याय असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी आमसभेत केला.तसेच वडगाव प्रभागातील गुंठेवारीची आरक्षणे काढण्याचा विषय घेतल्याशिवाय इतर विषयांना स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर बराच वेळ गदारोळ झाला  यानंतर वडगाव प्रभागातील पात्र प्रकरणे आरक्षण काढण्यासाठी घेण्यात येतील असे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
 आमसभेमध्ये माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात आली.मागील आमसभेमध्ये प्रहार चे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हा विषय लावून धरला होता. त्यामुळे या आमसभेत अजेंड्यावर चर्चेमध्ये हा विषय घेण्यात आला होता.आमसभेत  सर्वानुमते माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र त्याच वेळी गोवा स्वातंत्र्य लढ्यातले शहीद बाबूराव थोरात यांच्या वारसदाराला टॅक्स माफी देण्याच्या मुद्द्यावरून पप्पू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना टॅक्स माफी देण्याचा ठराव चंद्रपूर नगरपालिकेमध्ये घेण्यात आला होता.या ठरावानुसार मागील अनेक वर्षांपासून बाबूराव थोरात यांच्या कुटुंबियांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत होती.२०१८ मध्ये महानगरपालिकेने शहीद थोरात यांच्या मुलाला ४०००० मालमत्ता कर पाठविला .याबाबत  सभेमध्ये मुद्दा उपस्थित करून शहीद थोरात यांच्या कुटुंबियांना पूर्ववत मालमत्ता करमाफी सुरू ठेवण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावर सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.
मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे 
"शिवाजी महाराज कि जय" म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी
 सभागृहात काही नगरसेवकांनी घोषणाबाजी केली त्यावेळचे हे छायाचित्र






শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.