विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या ४० गुरुवर्यांचा सत्कार
स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
प्राचीन काळापासूनच समाजात गुरुला विशेष स्थाण देण्यात आले आहे. मनुष्य जन्मापासूनच त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रक्ष रित्या विविध क्षेत्रातील अनेक गुरुंचे संस्कार होत असते मात्र हे गुरु दुर्लक्षित झाले आहे परंतु त्यांच्याकडून झालेल्या संस्कारातुमच उत्तम समाज घडू शकतो त्यामुळे उत्तम समाज घडवीण्यात परंपरागत गुरूंचे मोठे योगदान असल्याचे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आज परंपरागत गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. मातोत्री सभागृहात आयोजीत या सत्कार सोहळयात कार्यक्रमाच्या उद्घाटीका म्हणून उषाताई हजारे, प्रमुख पाहुणे प्रा. सुर्यकांत खनके, नगरसेवक सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, बबनराव फंड, विमल काष्टीया, किशोर पडगेलवार, आशा बुरडकर, दादाजी नंदनवार, किशोर तळवेकर, प्रमिला गटलेवार, नंदा जोशी, वंदना हातगावकर, संतोशी चव्हाण आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, आजवर धनादय, सर्वपरिचीत अश्या व्यक्तींचाच सत्कार केल्या जात होता. मात्र या समाजात असेही गुरु आहेत त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत अणेक विदयार्थी घडवीले. आज या गुरुंमुळे अणेकांना रोजगार मिळाला आहे. असे असले तरी या गुरुकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्ह्यात प्रथमच अश्या अनोख्या सत्कार सोहळयाचे आयोजन केल्या गेल्या असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगीतले.

विकलांग सेवा समितीचे अध्यक्ष श्रीराम पान्हेरकर हे नेहमी संस्थेच्या माध्यमातून अंध – अपंगांची मदत करत असतात आजपर्यंत त्यांनी अनेक विकलांग यांना शिलाई मशीन असो किव्हा तीनचाकी सायकल यासारखे अनेक साहित्य वाटप करून त्यांना स्वताच्या पायावर उभे करून त्यांना
पार पडलेल्या सत्कार सोहळयात विविध क्षेत्रातील जवळपास ४० गुरुवर्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संगीत क्षेत्रात काम करत असतांना अणेकांना संगीताचे धडे देऊन त्यांच्यातील कलाकरांना मंच उपलब्ध करुन देणा-या बंडु देठे यांचे ४४ व्या वर्षात पदार्पण झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उषाताई हजारे, प्रा. सुर्यकांत खनके, सुरेश पचारे, विमल काष्टीया, बंडू देठे, किशोर तळवेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ईरफान शेख यांनी केले तर संचालन एकता बंडावार यांनी केले. या कार्यक्रमाला विविध संघटणांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश बेलखेडे, अमोल शेंडे, पंकज गुप्ता, दर्शन बुरडकर, विनोद गरडवा, सुधीर माजरे, प्रकाश चंदनखेडे, विनोद अनंतवार, हर्षद कानमपल्लीवार, नितीन नागरिकर, मुन्ना जोगी, शंकर दंतुलवार, विजय वरवाडे, राशेद हुसैन, लोकेश कोटरंगे, शांताबाई धांडे, रजनी चिंचोळकर, बबलू मेश्राम, दिलीप बेंडले, रवी करमरकर, सुरज चव्हाण, गौरव जोरगेवार यांची उपस्थिती होती.