महावितरण कंपनीने वीज मीटर फॉल्टी लावल्याने चुकीचे बिल येत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही, असा आरोप करून स्रेहनगर येथील भाऊराव देवाजी कोरडे यांनी शुक्रवारपासून चंद्रपूर परिमंडळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
भाऊराव कोरडे यांनी निवेदनात म्हटले की, वीज कंपनीच्या रामनगर वितरण केंद्राने मार्च २०१० ला मीटर लावून दिले. त्या महिन्यापासूनच मीटर फॉल्टी होते. त्यामुळे हे मीटर वेगाने फिरत असल्याने महावितरण कंपनीने जास्तीचे बिल पाठविले. पण, बिलाचा भरणा केला. दरम्यान, वीज मीटर बदलून देण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कंपनीने बिल पाठविणे सुरूच ठेवले. त्यानंतर मीटरची गुणवत्ता चाचणीबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली. पण, हा अहवाल देण्यात आला नाही, असा आरोप कोरडे यांनी केला. कंपनीने हा अन्याय दूर करावा, या मागणीसाठी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता अविनाश कुºहेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, वीजवितरण कंपनीने वीजमीटर टेस्टींग तसेच ऐक्यूचेकद्वारा तपासणी केली. शिवाय वीजनियामक आयोगाकडूनही प्राप्त झालेला वीजमीटर बरोबर म्हणजे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचा दाखलाही त्यांना देण्यात आला. थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीद्वारा वीजपुरवठा खंडित केल्यावरही कोरडे यांनी स्वत:च वीज यंत्रणेशी छेडछाड करीत परस्पर वीजजोडणी केली. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध वीजकायदा कलम१३८ अंतर्गत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १०० ते १५० असा सरासारी वापर तसेच उन्हाळयात २००ते ३०० युनिटदरम्यान वीजवापर असून महावितरणने कोरडे यांना विनंती करूनही थकीत वीजबिलाचे १६ हजार ५४० रूपये एप्रिल २०१७ ते मे २०१८ असे एकून १४ महिन्यांचे वीजबिल न भरता महावितरणवरच ५३ हजार २६० रुपये असल्याचे पत्र महावितरणला दिले आहे. कोरडे यांनी २९ फेब्रुवारी २०१६ ला मीटर बदलविणे व तपासणीकरीता अर्ज केला. त्यानुसार त्यांच्या समक्ष तपासणी करून मीटर योग्य असल्याचा अहवाल दिला. कंपनीच्या प्रचलित नियमानुसार मीटर तपासणी लॅबमध्ये पाठविण्याकरिता वाणिज्य परिपत्रकाची सत्यप्रतही पाठविली. एमईआरसीच्या मंजुरीप्रमाणे वाणिज्य परिपत्रकाअन्वये कोरडे यांच्या बिलात कोणतीही चूक नसल्याचे कळविले होते. परंतु, तीन महिन्यांचे १ हजार ९१० रूपयांचे संग्रहित परंतु संयुक्तिक वीज बिल भरून त्यानंतरचे संयुक्तिक वीज बिल भरणे बंद केले. उपोषण करून कंपनीला वठीस धरत असल्याची माहिती वीज वितरण कंपनीने दिली.
वीज कंपनीला वेठीस धरण्याचा प्रकार - कुऱ्हेकर
रामनगर वीज वितरण केंद्रातील सहायक अभियंत्यांनी विद्युत कायद्यानुसार १५ दिवसांची विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली. पण, ग्राहकाचे पूर्ण समाधान व्हावे, या हेतूने पुरवठा खंडित करण्याआधी ग्राहकासमक्ष मीटर तपासणी केली. त्यात मीटर योग्य असल्याचे निष्कर्ष येवूनही कोरडे यांनी बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे २९ सप्टेंबर २०१७ ला ग्राहकासमक्ष पुरवठा खंडितकरण्यात आला. बिल भरल्यानंतरच पुरवठा सुरळीत करण्याचे वीज वितरण कंपनीने कळविले होते. एवढेच नव्हे तर महावितरणने कोरडे यांनी स्वत: व जाणकार प्रतिनिधींसमक्ष मिटरची पुन्हा तपासणी केली जाईल व त्यासाठी एक दिवस अगोदर भेटून कळवावे, असे पत्र देण्यात आले होते. पण या पत्राची दखल घेतली नाही. विभागीय व उपविभागीय कार्यालयात हजर झाले नाही. दरम्यान, ४ जून २०१८ ला कोरडे यांच्या वीज पुरवठ्याची पथकाने पाहणी केली असता त्यांनी अवैधरित्या वीज जोडणी करून स्वत:चा पुरवठा सुरू केल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे ५ जून २०१८ ला कायमस्वरूपी खंडित करून ९ जून २०१८ ला वीजकायदा २००३ च्या कलम १३८ नुसार शहर ठाण्यात कोरडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती कार्यकारी अभियंता अभियंता कुऱ्हेकर यांनी दिली.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे गरजेचे
-
महापालिका मुख्य लेखापरीक्षकांनी नोंदवला निष्कर्ष विविध कल्पना
रुजवणाऱ्यांसाठी शिक्षकांना प्रशिक्षणाची गरज मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई
महानगरपालिकेच्या शाळ...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...