সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, June 14, 2018

अथक परिश्रमानंतर ४०० किलोचे आवाढव्य रोहित्र बसविण्यात महावितरणला यश

चंद्रपूर/प्रतिनिधी:
सध्या पावसाळा सुरु झाल्याने महावितरणच्या मागची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.अश्यातच कमी वेळात बिघाड दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत ठेवणे हे च्यालेन्जिंग काम करणे हि जबाबदारी महावितरणच्या प्रत्तेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खाद्यावर असते.अश्यात महावितरण नेहमी तत्पर असते, मंगळवारी मुल येथील विहीरगाव येथील वीजपुरवठा अचानक बंद झाला. महावितरणला त्याची तक्रार मिळाली,तक्रार प्राप्त होताच संपूर्ण अधिकारी व कर्मचारी बिघाळ दुरुस्तीचे काम करत होते मात्र तपासणी दरम्यान बिघाड मोठा असल्याचे आढळून आले.२०० किलोचे रोहित्र निकामी झाल्याने आता काय करायचे या प्रश्न महावितरणचे मुल शाखेचे सहायक अभियंता श्री.शशांक डगवार यांना पडला, फोन फानी करून रोहित्राची जुळवाजुळव करण्यात आली तितक्यात ४०० किलो वजनाचे रोहित्र मिळाले आणि २०० किलो वजनाच्या जागी ४०० किलो वजनाचे रोहित्र बसविण्याचे ठरविले २०० किलो वजनाचे रोहित्र काढून ४०० किलो वजनाचे रोहित्र कमी वेळेत लावणे म्हणजे जिकरीचेच काम होते, तिकडे कार्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी फोन वरून येत होत्या, रोहित्र मिळताच तब्बल ८ तासांच्या अथक परीश्रमा नंतर मुल शाखेचे सहायक अभियंता श्री.शशांक डगवार यांना ते रोहित्र कनजस्टेड ठिकाणी लावण्यात यश आले.
आधीच दिवसभरात सकाळपासून वीजयंत्रणेतील मारेाडा येथील मोठा बिघाड दुरूस्त करणे,त्याच दिवशी बिघडलेले रोहित्र बसविणे,पुन्हा आठ तासांच्या परीश्रमानंतर ४०० किलोचे अवाढव्य रोहित्र बसविणे हे जिकरीचे काम करून ग्राहकांना वीज पूर्ववत करून दिले.
दिवसभर ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करणे व दिवसभर ब्रेकडाउन दुरूस्ती करत संध्याकाळी थकल्याभागल्यावरही अवघड , निसरडया जागेत व अरूंद जागी आठ तासाच्या अथक परिश्रमानंतर रोहित्र जागेवर बसविण्याचा आनंद मुल शाखेच्या सहाय्यक अभियंता श्री. शशांक डगवार, महेंद्र कांबळे, व सहकारी यांच्या चेहऱ्यावर घामाच्या रूपात ओसंडून वाहतांना बघायला मिळाला. दिवसरात्रीची तमा न बाळगाता कर्तव्य पार पाडतांना अनेक वेळा वाईट प्रसंगांना महावितरण विभागाला सामोरे जावे  लागते. परंतु महावितरणचे हे सच्चे सैनिक उन, वारा, पावसात ग्राहकांना सेवा देतांना भुक, तहान, थकवा विसरून काम करीत असतात. अश्या या  महावितरणच्या कर्मचाऱ्यान बद्दल नागरिकांनी सहनुभूतीपूर्ण वागने  आज गरजेचे आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.