माध्यम प्रतिनिधींसाठी फेक न्यूज संदर्भात कार्यशाळेचे आयोजन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नव्याने जनसामान्यांच्या हातात आलेल्या समाज माध्यमांना बळकट होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे हे माध्यम कायद्याच्या चौकटीत बसेपर्यंत यावरील सज्जनांची सक्रियता वाढविणे गरजेचे आहे. हे काम माध्यमातील जागरुक सकारात्मक वृत्तीने, स्वयंप्रेरणेने करणे गरजेचे आहे. दुर्जन सक्रिय व सज्जन हतबल हे सध्याच्या समाज माध्यमावरील चित्र बदलणे गरजेचे असल्याचा सूर आज चंद्रपूरमध्ये आयोजित ‘फेक न्युज व सायबर क्राईम’ या संदर्भातील कार्यशाळेमध्ये व्यक्त करण्यात आला.
चंद्रपूर येथे स्थानिक चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात श्रमिक पत्रकार संघ व जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली दरवर्षी श्रमिक पत्रकार संघात अर्पण करण्यात येते. याच कार्यक्रमासोबत माध्यमांसाठी आज एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके, चंद्रपूर पोलीस प्रशासनातील सायबर सेलचे प्रभारी विकास मुंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सर्वच वक्त्यांनी सध्याच्या काळात व्हाटस्ॲप सारख्या समाज माध्यमाने अनेक चुकीच्या बातम्या, अफवा पसरविण्याचे काम सुरू केले असल्याचे स्पष्ट केले. फेसबुक, व्हाट्सअप ही समाज माध्यमे एकीकडे जागतिक राजकारण बदलत असताना भारतीय समाज जीवनावर देखील याचा प्रभाव पडत आहे. व्यक्तिगत निंदानालस्ती सोबतच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चुकीचे संदेश समाजामध्ये पेरले जातात. त्यामुळे या समाज माध्यमाचे सर्वांनी पुढाकार घेऊन ऑडिट करणे गरजेचे आहे. या ठिकाणी कोणी जबाबदार नाही, असे होता कामा नये. ही माध्यम समाजामध्ये बळकट होईपर्यंत या संदर्भातील कायदे तयार होईपर्यंत आमची समाज व्यवस्था खिळखिळी करून सोडू नये याची काळजी सर्वांनीच घेणे गरजेचे असल्याचे यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले. महापुरुष, जाती-धर्म शासनाविरुद्ध खोटी माहिती या संदर्भातली कोणतीही पोस्ट आली तर या पोस्टमुळे कोणाचा फायदा होणार ? यामध्ये चूक आहे की बरोबर आहे ? याबाबतची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही प्रतिपादन यावेळी केले. सायबर सेलचे प्रभारी विकास मुंडे यांनी समाज माध्यमांद्वारे व्यक्तिगत मानहानी व आर्थिक विषयी होत असलेल्या गुन्ह्यांमधील वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात होत असलेल्या गुन्ह्यांची काही उदाहरणे सांगितली. यावेळी पत्रकारांसोबत संवाद करताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. बंडू लडके यांनी या नव्या माध्यमाला सामोरी जाताना स्वतः काही नियम पाळणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. संजय तुमराम यांनी देखील यावेळी बोलताना नव्या माध्यमाला न्याय देताना अधिक जबाबदारीने समाजातील प्रत्येकाने आपली भूमिका अदा करण्याचे आव्हान केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यम प्रतिनिधी पुढे केलेले फेक न्यूज संदर्भातील भाषण प्रोजेक्टरव्दारे उपस्थित माध्यम प्रतिनिधींना ऐकवण्यात आले. कार्यक्रमाला वेगवेगळ्या माध्यमांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी
-
नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक
बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल आणि
हवाई दलासाठ...
Actor Satish Shah passes away at 74
-
Bollywood actor Satish Shah, whose very presence in films such as Jaane Bhi
Do Yaaron and Main Hoon Na and sitcom Sarabhai vs Sarabhai elicited smiles
an...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
मानव-वन्यजीव संघर्षात महत्त्वाचा प्राणी हा बिबटे आहे. बिबट हा कुठलाही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीसलगत असलेल्या जंगल सदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता , घाण व उकिरडे असेल , तिथे या प्राण्यांची संख्या अधिक असते. अशाप्रकारचे गावे म्हणजे बिबट्याच्या अधिवासाचे पोषक असे वातावरण आहे. यामुळे बिबट्यासारखा प्राणी गावालगत वावरतो.. या गावातील कुत्र्यांची संख्या रोडावली की , मोकाट व मध्यम आकाराच्या पाळीव जनावरांना बिबट शिकार बनवितो. अशा परिस्थिती बिबट गावात येणे व शिकार करणे , अशा घटनांत वाढ होते. गावात व गावालगत बिबट्याचा वावर असल्यावर अगदी पहाटे शौचास जाणा - या गावक - यांवर या बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वाढते. यातूनच बिबट्याचा गावातील वाढलेला वावर म्हणजेच मवन्यजीव-मानव संघर्ष q कवा मबिबट-मानव संघर्ष होय. मानव-वन्यजीव संघर्ष: या प्रकारात गावक - यांचा गावालगतच्या जंग...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...