१०८० पीओपी मुर्त्यांचे विसर्जन
शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही रामाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने विविध भागातून विविध पर्यावरण, सामाजिक संघटनां निर्माल्य गोळा करण्यासाठी सरसावल्या होत्या. गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. या तलावांत ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़
गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० पर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना काम ३ शिफ्ट मधे वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करत होते.. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी आणि नंतर अश्या दोन्ही वेळेस रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शेवटची गणेश मूर्ती रात्री २ वाजता शिरविण्यात आली. मनपा स्वच्छता विभागाने रात्री १२ वाजता नंतर स्वच्छतेचे कार्य सुरु केले, अथक प्रयत्न करून मिरवणुकीदरम्यान वाहतुकीने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत साफ करून चकचकीत करण्यात आले.
तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता ते कृत्रिम टँकमध्ये करावे, यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध भागांत १७ कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले . प्रत्येक तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले कलश निर्माल्याने भरले की लगेच महापालिकेतर्फे खाली केले जात होते.शहरातील मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी रामाळा तलाव येथे परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपुरात मागील वर्षीच्या तुलनेत प्रदूषणमुक्त विसर्जन पार पडल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत ७७८५ मातीच्या मूर्ती व १०८० पीओपी अशा एकूण ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. सगळ्या लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा कर्मचारी प्रयत्नशील होते, या कामात एस.पी. महाविद्यालय चंद्रपूरच्या ग्रीन थिंकर्स सोसायटी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावातच गणेश मूर्ती विसर्जित करण्याचा तसेच निर्माल्य कलशातच टाकण्याचा आग्रह स्वयंसेवक करीत होते. नागरिकांनाही त्यास प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव विसर्जनास हातभार लावला. याद्वारे बहुतांश मूर्तींचे विसर्जन रामाळा तलाव , गांधी चौक , शिवाजी चौक , दाताळा रोड इरई नदी , पं. दीनदयाळ उपाध्याय तुकूम प्रा. शाळा, झोन क्र. ३ कार्यालय, नेताजी चौक बाबुपेठ, बंगाली कॅम्प झोन ऑफिस, विठोबा खिडकी विठ्ठल मंदिर वॉर्ड , शिवाजी चौक, लोकमान्य टिळक प्रा. शाळा पठाणपुरा रोड, नटराज टॉकीज ताडोबा रोड, इत्यादी ठिकाणच्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या भाविकांना व गणेश मंडळांना प्रमाणपत्रे देऊन महानगरपालिकेने त्यांचा गौरव केला
याप्रसंगी आयुक्त श्री. संजय काकडे तसेच पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराज राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नायक सीसीटीव्ही च्या माध्यमातून मोबाईलद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहेरे. उपायुक्त श्री. गजानन बोकडे. श्री. गोस्वामी, सहायक आयुक्त श्री. विजय देवळीकर, धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता श्री. नितीन कापसे विसर्जन सुरळीतपणे पार पडण्यास प्रयत्नशील होते.
