सावली (तालुका प्रतिनिधी) - सावली-गडचिरोली महामार्गावर मागील 2 वर्शापासुन सुरू असलेले काम निश्कृश्ट व कासवगतीने सुरू असल्यामुळे अनेकदा अपघाताची घटना घडत असतांनाच काल दि. 11 आॅक्टोंबर रोजी रात्रो 10 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर वरून राजनांदगावकडे जाणारा ट्रक किसाननगर जवळ रस्ता खोदकामामुळे पलटला. सदर रस्त्याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाÚयाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अपघाताची मालिका सुरूच आहे.
चंद्रपूर-गडचिरोली या राज्य महामार्ग क्रं. 7 या रस्त्याच्या कामासाठी केंद्रषासने केंद्रीय मार्ग निधी प्रकल्पाअंतर्गत 13 किमी रस्त्याच्या सुधारणेसाठी सुमारे 8 कोटी रूपयाचे निधी मंजुर करून सुरूवात करण्यात आलेले आहे. मागील 2 वर्शापासुन सदर काम चंद्रपूर येथील मे. लक्ष्मी कंट्रक्षन कंपनीने सुरू केलेले आहे. परंतु कामाला पाहिजे ती गती अजुनही आलेली नाही. यामुळे याठिकाणी अनेकदा अपघाताचे प्रमाण घडत आहे. सदर काम मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कं्र. 2 यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. परंतु सदर विभागाचे अधिकारी याकामाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर रस्त्याच्या कामाचा निकृश्ठपणा यावेळी आलेल्या पावसाने उघडकीस आणला आहे. चकपिरंजी ते हिरापूर पर्यंत सुरू झालेल्या कामावर अंदापत्रकानुसार 40 एमएम गिट्टी टाकणे गरजेचे असतांनाही माती मिश्रीत छोटी-छोटी गिट्टी टाकुन काम करण्यात आले. त्यानंतर हिरापूर ते किसाननगर पर्यंत रस्त्याचे काम करतांना खोदकाम केलेली माती त्याच ठिकाणी टाकण्यात आली. व वरवर मुरूम पसरवुन पुर्ण मुरूच टाकल्याचे भासविल्या जात आहे. त्याचप्रमाणे किसाननगर जवळ रस्ता खोदुन वर्शेभर काम सुरू न केल्याने अनेकदा अपघात झाले. आणि त्याच खोदलेल्या ठिकाणी मातीने बुजविले. मात्र काम पुर्ण न झाल्याने अजुनही अपघाताची मालीका सुरूच आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :- गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र...
नागपूर : येथील माजी महापौर आणि माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. 22) निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. 1970 साली त्यांनी नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर, 1971 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम बघीतले. बारा वर्ष त्यांनी विधानपरिषदेत आमदार म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. नगरसेवक ते आमदार या राजकीय प्रवासात त्यांनी प्रदेश कॉग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविली. सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. गरीब होतकरु आणि मागासवर्गातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देण्यासाठी या संस्थेमार्फत जवळपास 45 शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना करुन भरीव कार्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वंसतराव साठे, निर्मलाबाई देशपांडे यांचेसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या मागे गिरीश आणि किरण अशी दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी (ता. 23) बारा वाजता धंतोली येथील निवासस्थानातून निघू...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...