সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 13, 2018

भीमा कोरेगाव प्रकरणाचा सावलीत पडसाद

प्रतिनिधी / सावली:

महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठीगेलेल्या लोकांवर अचानक काही सजाजकंटकाव्दारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. हजारों लोक जखमी झाले. त्यामुळे बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या. हल्लोखरांवर कारवाईकरा अशी ठिणगी महाराष्ट्रभर पसरली. अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले.याचाच एक भाग म्हणून सावलीत सुध्दा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा महामोर्चा खादी कार्यालयापासून सुरूवात होऊन गावाला वळसा देत चंद्रपूर -गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाने तहसील कार्यालयावर पोहचला.
                                                    महामोर्चाचे रूपांतर निषेध सभेत करण्यात आले.  त्यानंतर शिष्टमंडळाच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.   भिमा कोरेगांव येथे १ जानेवारी १८१८ ला पेशवाईच्या होणार्‍या अन्यायाला कंटाळून पेशवाईविरूध्द बंड पुकारला. त्या वेळी महारांनी पेशव्यांना हरविले. त्यामुळे भिमा कोरेगांव येथे या स्मरणार्थ ब्रिटीशांनी शौर्यस्तंभ उभारला. महाराष्ट्र हा इतिहास लक्षात घेता भिमा कोरेगांवयेथे दरवर्षी महाराष्ट्रातील बौध्द अनुयायी लाखोंच्या संख्येने मानवंदना देण्यासाठी जात असतात. यंदाचे हे व्दिशतकीय वर्ष असल्याने लाखोंच्या संख्येने भिमा कोरेगांव येथे बौध्द अनुयायी गेले असता प्रस्थपितांनी या कार्यक्रमात हल्ला चढविला होता. त्यामुळे अनेकांचा बळी गेला.तर हजारो जखमी झाले. या हल्ल्याचा निषेध सर्वत्र करण्यात आला. सावली महामोर्चाचे आयोजन निषेध नोंदविण्यासाठी करण्यात आले होते. मोर्चाचा समारोप तहसीलदारांना निवेदन देवून करण्यात आला.यावेळी हजारोच्या संख्याने बौध्द बांधव उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.