तुम्ही बांगलादेशचे रहिवासी आहात, आम्ही तुम्हाला पकडून नेऊ अशी धमकी देऊन बौध्द भंतेकडून खंडणी वसूल केली. हा खळबळ जनक प्रकार जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी भंतेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकासह तिघांना ताब्यात घेतले. सूरज सुभाष नागदिवे (२0, रा. घोरपड, त. कामठी), अभिषेक संजय शेलारे (१८, रा. यशोधरानगर) अशी खंडणीबाज आरोपींची नावे आहेत.
रायगढ जिल्हय़ातील (प. बंगाल) बौद्ध भंते शंकर अमिरत चौधरी (५0) हे पारस ता. दौंड (पुणे) येथील शांती बुद्ध विहार येथे राहतात. बौद्ध धम्माचा प्रसार- प्रचार करण्यासाठी नागपुरात आले होते. नागपुरात त्यांचा मुक्काम पिवळी नदी येथील धम्मक्रांती बुद्ध विहारात आहे. रविवार १४ जानेवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास शंकर हे बुद्ध विहारात आराम करीत होते. त्यावेळी सूरज, अभिषेक आणि विधीसंघर्ष बालक हे तेथे आले. सूरज व अभिषेक यांनी शंकर यांना तुम्ही बांगलादेशचे रहिवासी आहात. आम्ही सीआयडी पोलिस आहोत. तुम्हाला पकडून नेऊ अशी दमदाटी केली. त्यामुळे शंकर घाबरले. शंकर यांनी आम्ही भारताचेच रहिवासी आहोत असे सांगितले. त्यावर तिघांनीही कारवाई न करण्यासाठी ५0 हजाराची मागणी केली. शंकरजवळ पैसे नसल्याने त्यांनी असर्मथता दर्शविली. त्यावर तिघांनीही त्यांना मारण्याची धमकी देत तुमच्याजवळील एटीएममधून पैसे काढून द्या असे म्हटले. त्यानंतर शंकर व त्यांच्यासोबत राहणारे शुभ भंते यांना ऑटोत बसवून राणी दुर्गावती चौकातील सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये नेले. शंकर यांनी त्यांच्या खात्यातून २0 हजार तर शुभ भंतेच्या खात्यातून १५ हजार रुपये असे ३५ हजार रुपये काढून त्यांना दिले. त्यानंतर दोन्ही भंतेंना बुद्ध विहारात आणून सोडले आणि ते पसार झाले.
आपल्याला गंडविण्यात आल्याचे भंते शंकर यांच्या लक्षात येताच त्यांनी जरीपटका पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उत्तम मुळक, हेड कॉन्स्टेबल मुन्ना ठाकूर, शिपाई गणेश बरडे, आसीफ शेख, रवींद्र भंगाडे हे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. पोलिसांनी तिघांचाही शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सूरज आणि अभिषेक यांना अटक केली.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :- गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...