সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 10, 2014

तीन वर्षात ३८ सायबर गुन्हे

चंद्रपूर: फेसबुक, वाटसर्प, आकरुट यासारखे संचार माध्यम मानवाच्या सुविधांसाठी तयार केले आहेत. मात्र या माध्यमांचा दुरुपयोग वाढला आहे. सोशल नेटवकर्र्ींगचा विद्यार्थ्यांकडून दूरुपयोग होत असल्याने चिंता वाढली आहे. २0११ मध्ये सायबर क्राईमचे पाच गुन्हे दाखल आहेत. २0१२ मध्ये १२ गुन्हे तर २0१३ मध्ये तब्बल २१ असे एकूण ३८ साईबर क्राईमचे प्रकरण पोलिसांनी उजेडात आणले आहेत.

येथील पोलीस विभागाच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, २0११ मध्ये सायबर क्राईमचे पाच प्रकरणे नोंदविण्यात आली. यातील चार प्रकरणे केवळ फेसबुकशी संबंधित होते. २0१२ मध्ये एकूण १२ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील पाच प्रकरणे सोशल नेटवकर्र्ींगच्या प्रकारात मोडते. २0१३ मध्ये हा आलेख आणखी चढला. या वर्षात तब्बल २१ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यात सहा गुन्हे फेसबुकशी संबंधित आहेत. तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जिल्ह्यात सायबर क्राईम वाढत असल्याचे दिसून येते. यातील सर्वाधिक प्रकरणात महाविद्यालयीन विद्यार्थीच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाईलवरून अश्लिल फोटो, चित्रफित पाठविणे, अश्लिल एसएमएस, एमएमएस पाठविणे यासारख्या ९ गुन्ह्यांची २0१३ या वर्षात नोंद करण्यात आली आहे. याशिवाय कोणाचा ईमेल हॅक करणे, ऑनलाईन ट्रांजेक्शन फ्राड, दुसर्‍याच्या एटीएममधून परस्पर रक्कम काढणे यासारख्या सायबर गुन्ह्यांचीही या वर्षात नोंद झाली आहे. 

शिक्षेची तरतूद
  • ■ कलम ६६-ए नुसार सोशल नेटवकर्र्ींगच्या दुरुपयोगासाठी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६ नुसार संगणकातील डाटाचे नुकसान करण्यासाठी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६-बी नुसार मोबाईल किंवा संगणक चोरीप्रकरणी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६-सी नुसार पासवर्ड चोरणे, कुणाच्या नावाचा उपयोग करून अपराध करण्यासाठी तीन वर्ष शिक्षा व एक लाख रुपये दंड
  • ■ कलम ६६-एफ नुसार सोशल नेटवकर्र्ींगद्वारा दहशतवाद पसरविण्यासाठी आजन्म कारावास.
  • ■ कलम ६७ नुसार अश्लिल चित्रीकरण करून त्याचे प्रसारण करण्यासाठी पाच वर्ष शिक्षा.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.