সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 22, 2013

तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे नुकसान

शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी :  ना. एकनाथराव खडसे

मुंबई  : केंद्र व राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्येशेतकऱ्यांना मदत देतांना वादळ, भुकंप, आग, पूर, अतिवृष्टी, अवेळी पाऊस,दुष्काळ, वीज कोसळणे, कडाक्याची थंडी आदी निकष जाहिर केले होते यानिकषानुसार देण्यात येणारी मदत यापुढेही चालु ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळानेकाल मान्यता दिली. परंतु, या निकषामध्ये तीव्र उष्णतामानामुळे पिकांचेझालेले नुकसान हा निकष समाविष्ट केलेला नाही. त्यामुळे राज्यातीलशेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष व तत्सम पिकांचे तीव्र उष्णतामानामुळे नुकसानझाल्यास त्यांना मदत मिळू शकत नाही, म्हणुन राज्य शासनाने या भागातीलशेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे होणारेनुकसान ही नैसर्गिक आपत्ती समजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठ नेतेएकनाथराव खडसे यांनी केली आहे.

श्री.खडसे पुढे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी 1 एप्रिल ते 15 जुनदरम्यान दरवर्षी कडाक्याचे ऊन पडलेले असते. काही ठिकाणी तापमान 47-48अंशांपर्यंत पोहोचलेले असते. केळी, द्राक्ष व तत्सम पिकांना साधारणत: 43-44अंश सेल्सीअसच्या वर तापमान मानवत नाही. त्यामुळे पिकांवर कडकउन्हाचा विपरीत परिणाम होऊन पिकांचे अतोनात नुकसान होते. परंतुशासनाच्या निकषात बसत नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनानुकसानीची भरपाई मिळत नाही म्हणुन तीव्र उष्णतामानामुळे पिकांचेनुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे त्यांनीशेवटी सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.