সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 01, 2015

कट ऑफ डेट सात ऑगस्ट पर्यंत वाढविली

राष्ट्रीय कृषी विमा योजना: कृषी मंत्री एकनाथराव खडसे

जळगाव, दि.01 ऑगस्ट: राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट ऑफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी 7 (सात) ऑगस्ट 2015 पर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज जळगांव येथे दिली.

खडसे यांनी पुढे सांगितले की, राज्य शासनाने केंद्राला लेखी पत्र पाठवून शेतकऱ्यांना विम्याचे हप्ते भरण्यासाठी किमान 15 दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, केंद्राने काल 31 जुलै राजी पत्र पाठवून ही मुदत अर्थात कट ऑफ डेट 07 (सात) ऑगस्ट पर्यंत वाढवल्याचे पत्र पाठवून कळविले आहे. या पत्रात स्पष्ट केले आहे की, एक विशेष बाब म्हणून आणि राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही अटींच्या अधिन राहून ही मुदत वाढ देण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीच्या काळात पीक विम्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित बँकेकडे आणि संबंधित यंत्रणेकडे नेहमी प्रमाणे पाठवावेत. तसेच, त्या सोबत संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेले पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्रही जोडावे.
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत भरावयाच्या विमा हप्त्यांना दिलेली मुदतवाढ लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे कृषी मंत्री खडसे यांनी आवाहन केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.