সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, August 09, 2013

२०१४ मध्ये चिमूर जिल्हा : क्रांती दिन सोहळा

चिमूर-भगतqसग, राजगुरु, सुखदेव व इतर थोर क्रांतीकारकांच्या त्याग बलीदानातुन देशाला मिळालेले स्वातंत्र्य आबादीत राखण्याची लायकी केंद्र व राज्य सरकारची नसल्याने देशात सिमेच्या आत येवुन पाकीस्तानने भारतीय सैनिकांनी केलेली हत्या हे केंद्र सरकारचे नाकर्तेपणा होय असे प्रतिपादन आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी चिमूर क्रांती सोहळयात आपले प्रमुख मार्गदर्शनात केले तर २०१४ मध्ये भाजप-सेनेची सरकार सत्तेवर येणार असून चिमूर जिल्हा घोषीत झालेला दिसेल असे आश्वासन दिले.
चिमूर क्रांतीदिन कृती समिती व युवाशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत क्रांती दिन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा वनराईचे अध्यक्ष गिरीष गांधी, कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, प्रमुख अतिथी आमदार मितेशजी भांगडीया, आ. सुधीर पारवे, चंद्रपूरचे जि. प. अध्यक्ष संतोष कुमरे, जि. प. गडचिरोलीचे अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, माजी आमदार अशोक नेते, अर्थ व बांधकाम सभापती गुणवंत पाटील कारेकार, जि. म. स. चे संचालक सुरेश दहीकार, युवाशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास बानबले, जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रभाकरराव जोशी, सोनकुसरे, जेष्ठ नेते डॉ. दिपक यावले, दत्ता बोरीकर, मजहर शेख, स्त्रीशक्ती संघटनेचे मनीषा कावरे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

शहीदांना विनम्र श्रध्दांजली अर्पण करुन जेष्ठ स्वातंत्र संग्राम सैनिक प्रभाकरराव जोशी, सोनकुसरे यांचा सत्कार, गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार, सामाजिक कार्यात कार्य करणाèया जेष्ठ नागरिकांचा सत्कार, तिन रुग्णवाहिकेचे लोकार्पण, वृक्षरोपन, वृक्षqदडी आदी कार्यक्रमाने क्रांती दिन सोहळा संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना सामाजिक कार्यकर्ते गिरीष गांधी म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला कोणत्याही पक्षावर विश्वास राहीलेला नसून मी समाजासाठी काय करतो, मी काय केले पाहीजे हे अत्यंत महत्वाचे असून माणसाच्या मनातील विचार बदललेले पाहीजे तेव्हाच गावाचा व परिसराचा विकास होईल अशा आशावाद दिर्घ सामाजिक बांधीलकेतुन गिरीष गांधी यांनी व्यक्त केला.

तर कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते विनोद तावडे म्हणाले की, दिल्लीतील बलात्कार असो वा गल्लीतील. माणसाची विचारक्षमता कमकुवत असली की असे प्रकार वाढत जाते. तर स्वातंत्र्य हे त्याग, बलीदानातुन मिळालेले असून यासाठी भगतqसग, राजगुरु, सुखदेव व इतर थोर क्रांतीकारकांसह चिमूरचे शहीद बालाजी रायपुरकर यांच्या बलीदानातुन मिळालेले स्वातंत्र आज देशातील सरकार टिकविण्याचे लायकीचे नसून दुश्मन असलेला पाकीस्तान भारताच्या हद्दीत घुसुन भारतीय जवानांची हत्या करतो, आणि करंटे सरकार बघ्याची भुमिका घेतात, सडोतोड उत्तर देण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही तर ज्या क्रांतीभुमीने स्वातंत्राची ज्योत पेटवुन देशाला स्वातंत्र मिळवुन दिले. त्या भुमीची अवस्था काय आहे ते ही पाहता आले. चिमूर क्रांती जिल्हयाची मागणी ही करंटे सरकार करु शकले नाही. तेव्हा २०१४ मध्ये भाजपा-सेना युतीचे सरकार सत्तेवर येईल व चिमूर जिल्हा घोषीत करु असे आश्वासन विनोद तावडे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

याप्रसंगी भाग्यश्री आत्राम जि. प. अध्यक्ष गडचिरोली, आमदार मितेशजी भांगडीया, डॉ. दिपक यावले आदी मार्गदर्शनपर भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजहर शेख यांनी केले तर आभार माजी सभापती प्रकाश वाकडे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय सैन्यांना व उत्तराखंडातील शहीदांना मौन श्रध्दांजली वाहुन करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.






শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.