সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 27, 2013

भाजीपाल्यांचे भाव वधारले

चंद्रपूर: उत्पादन निम्म्यावर आल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे. कांदा तर पुन्हा गृहिणींना रडवित असून भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर झाले आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अर्धेअधिक उत्पादन घटले आहे. त्यामुळे स्थानिक वाड्यांमधून बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजीपाल्यांचे भाव वधारले आहे. 
ठोक भाजीमार्केटमध्ये वांगे ४0 रुपये किलो, फुल कोबी ६0 रू किलो, परवळ ८0 रु., शिमला मिरची ८0 रु., तोंडले ५0 रु., पान कोबी ४0 रु., बिन्स शेंगा ८0 रु., चवळी शेंगा ६0 रु., शेवग्याच्या शेंगा ८0 रु., कोथिंबीर १00 रू., अद्रक १८0 रु., पालक ८0 रु., मेथी ६0 रु., मिरची १00 रुपये किलो याप्रमाणे विकले जात होते. आजच्या बाजारात केवळ टमाटर आणि बटाटेच केवळ २0 रुपये किलो होते. भाजीपाल्यांच्या या किमती ठोक बाजारात एवढय़ा आहेत. चिल्लर मार्केट व दारांवर तर ८0 आणि १00 रुपयांच्या आत काहीच मिळत नाही. मागील दीड महिन्यांपासून भाजीपाल्यांच्या किमती वधारलेल्याच आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेटच बिघडले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.