সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 27, 2013

नाथाचे शिवकुंड झाले अनाथ

प्रशांत विघ्नेश्‍वर/मंगळवार, २७ ऑगस्ट २0१३
चंद्रपूर- जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या जिल्ह्यत पाषाण युगापासून आधुनिक युगापर्यंतचे पुरावे आढळतात. हे पुरावे स्मारक स्वरूपात असून यात मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, परमार, नागवंशी, गोंड, मुगलकालीन स्मारकांचा समावेश आहे. चंद्रपूरच्या स्वर्णिम इतिहासात अनेक सुवर्ण पाने आहेत. यातील अनेक पाने गळू लागली आहेत. त्यातीलच एक पान म्हणून शहराच्या मध्यभागी असलेल्या गोंडकालीन अंचलेश्‍वर मंदिराकडे बघितले जाते. येथील भोलेनाथाचे शिवकुंड आता अनाथ झाले आहे. विशेष म्हणजे, याच मंदिराच्या निर्मितीनंतर गोंड राजांनी आपली राजधानी बल्लारशाह (बल्लारपूर) हून चंद्रपूरला (चांदा) स्थानांतरित केली होती. याला ५00 वर्षांचा कालावधी लोटलेला असून सध्या चंद्रपूरचे पंचशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अचंलेश्‍वर मंदिराचा केदारनाथ होतोय. अंचलेश्‍वर मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह यांनी केली. तेव्हापासून चंद्रपूरला गोंडराजांची राजधानी म्हटले जाऊ लागले. इ.स. १४७२ मध्ये बल्लाळशाहने राजगादी सांभाळल्यानंतर चर्मरोगी बळावला. प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून राजे बल्लाळशाह स्वच्छ हवेच्या ठिकाणी शिकारीला जात असत. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.