সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 26, 2014

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान

शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्या
- एकनाथराव खडसे

मुंबई, दि. 26:- खान्देश, विदर्भ व कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतदेण्यासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांनी आज सकाळी केली. विधानसभेचे कामकाज सुरु होताच त्यांनी ही मागणीलावून धरली.

श्री.खडसे पुढे म्हणाले, इतक्या मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची हानी झाली आहे की दिवसाकाठी 10-20 शेतकऱ्यांचे दूरध्वनी येत आहेत. नुकसान भरपाई मिळावी यासाठी सभागृहात काहीतरी मांडा अशी मागणी तेकरत आहेत. इतकी गंभीर परिस्थिती आहे. तेव्हा किमान अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या उत्तरात यासंदर्भात सरकारने ठोस आश्वासन द्यावे, आपल्या कार्यपध्दतीनुसार नुकसानीचे पंचनामे होतच पण स्थायीआदेशाप्रमाणे राहतील, निकषात बसत नसतील त्यांना निकषात बसवून सरकारने आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी श्री.खडसे यांनी शेवटी केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.