সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 27, 2014

जिवती तहसिलवर आदीवासींचा भव्य मोर्चा

जिवती तहसिलवर आदीवासींचा भव्य मोर्चा - अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्व
jiwati.jpg प्रदर्शित करत आहे

जिवती - तालुक्यातील निराधारांचे अर्ज निकाली काढावे, जबराजोतधारकांना
पटृटे व सातबार देण्यात यावी, घरकुल देण्यात यावे व राषनकार्ड वाटप
करण्यात यावे या मागण्या घेऊन श्रमिक एल्गारचे वतीने मोर्चा काढण्यात
आला.
जिवती तालुका हा अतीदुर्गम भाग असुन अनेक प्रष्न प्रलंबित आहेत. निराधार
योजनेकरीता वृध्द, विधवा, अपंग, दुर्धर आजार ग्रस्त व अनाथांनी तहसिल
कार्यालयात अर्ज केले आहेत. परंतु षेकडो अर्ज प्रलंबीत ठेवण्यात येऊन
लाभाथ्र्याना अनुदानपासुन वंचित ठेवल्या जात आहे. अनेक आदीवासी कुटुंब
वनजमीनीवर अतीक्रमण करून अनेक वर्शापासुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत
परंतु त्यांना पटृटे देण्यात आलेले नाही. ज्यांना पटृटे देण्यात आले त्या
पटृटेधारकांना अजुनपर्यंत सातबार दिलेला नाही यामुळे अनेक जबरानजोतधारक
षासकीय अनुदानापासुन वंचित आहेत. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत कार्डधारकांना
धान्याचे वाटप नियमित होत नाही, आदीवासी विभागाकडे घरकुलाकरीता हजारो
अर्ज 2005 पासुन प्रलंबीत आहेत. त्यांना अजुनपर्यत घरकुलाचा लाभ दिलेला
नाही. इत्यादी प्रष्न घेऊन अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात
श्रमिक एल्गारचे वतीने तहसिल कार्यालयावर हजारो आदीवासींचा मोर्चा
काढण्यात आला. यावेळी तहसिलदार पुप्पलवार यांनी निवेदन स्विकारून पुर्ण
करण्याचे आष्वासन दिले.
या आंदोलनात श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, महासचिव विजय
कोरेवार, घनष्याम मेश्राम, संगिता गेडाम, विमल कोडापे, मानिक मडावी, झाडु
कोडापे, षामराव कोटनाके, चंद्रकला मरापे, नामदेव उदे, परषुराम वेलादी
आदींसह हजारो आदीवासी मोर्चात सहभागी होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.