সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 27, 2018

हिरापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ

सरपंचाचा मनमानी कारभार
आवाळपूर /प्रतिनिधी:- 

हिरापूर गाव आय एस ओ मानांकित दर्जेदार शाळा व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकामुळे पंचक्रोशीत नावाजला गेल मात्र ग्रामपंचतीचा भोंगळ व नियोजन शून्य कामाचा अभावामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामपंचायतीचा व सरपंच भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे. त्यातच भर पडत आहे. अनके महिन्यापासून रोजंदारी वर काम करणाऱ्या कर्मचारी याना घरचा रस्ता दाखवून आपल्या जवळच्या माणसाला कर्मचारी म्हणून ठेवल्या गेले. या पूर्वी काम करीत असलेला कर्मचाऱ्यांवर आता  उपासमारीची वेळ आली आहे.

हिरापूर येथे मागील अनके वर्षापासून रमेश महादेव दासारकर सदर व्यक्ती ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कार्यरत होते त्याची प्रकृती वारंवार खराब होत असल्याने रोजंदारीवर सतीश वामन बोढे वय 26 वर्षे काम करीत होते.त्यातच रमेश याची प्रकृति खालावल्याने त्याचा मृत्यु झाला. तेंव्हा देखील सतीश हा रोजनदरी वर ग्रामपंचायत ला कार्यरत होता .काही महिन्या नंतर त्यांनी मला कायमस्वरूपी करा असे अर्ज केला. मात्र सरपंचाने आपल्या दडपशाही वृत्तीने या नंतर तू इथे कामावर यायचं नाही ग्राम पंचायत पेसा कायदा अंतर्गत येत असल्याने एस टी करीत राखीव आहे असे म्हणून त्यांनी काढून टाकले.

सरपंचाच्या अश्या दडपशाही वृत्तीने सतीश नि दिलेली सेवा ही फिकी पडली आणि त्याने केलीली सरड कामे सरपंचाला खडसावत असल्याने त्या कर्मचाऱ्याला  कामावरून कमी करून बेरोजगारीचा दगड सरपंचाने फेकून मारला आहे.

प्रामाणिकपणे ग्राम पंचायत भवनात काम करून लोकांना सेवा देणारा सतीश बोढे च्या हाताला काम नसल्याने तो बेरोजगारी ग्रस्त झाला आहे .त्या कर्मचावर मात्र आता उपासमारीची वेळ आली असून एवढे दिवस काम करून त्याचा पदरी निराशा पडली आहे.

 ( सरपंच यांनी माझा कोणताही विचार न करता सरळ मला काढून दिले त्याचा या मनमानी कारभारा  मुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे..मला योग्य ते न्याय देऊन पूर्ववत घ्यावे...सतीश बोढे, हिरापूर

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.