সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 24, 2018

वर्ध्यात शेतकऱ्याची आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे): 
                       
                                                                                        वर्धा जिल्ह्यातील मौझा बेलगाव तालुका कारंजा(घाडगे) येथे एका शेतकऱ्यांची आत्महत्या हरिदास शामरावजी आमझीरे वय ५० यांनी सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर असणाऱ्या सागाच्या झाडाला स्वतःच्या पांढऱ्या दुप्पटाने फाशी घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपविली.
घरच्यांच्या माहितीवरून सततच्या नापिकी व कर्जबाजारी पणामुळे ते नेहमी काळजीत असायचे यंदा पिकी जेमतेम त्यावर बँकेचे कर्ज तसेच कुटुंब कसे चालवायचे हाच विचार त्यांना नेहमी त्रास देत असायचा त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतला असावा असे सांगण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी दोन मुलं एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे जेमतेम ५ एकर कोरडवाहू शेती असून ती सामायिक आहे. त्यात बरेच नाव समाविष्ट असून त्यांच्या उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांना २ एकर शेती दिलेली आहे.परंतु यंदा निसर्ग कोपल्याने,(पावसाने) दळी मारल्याने त्यांना शेतीत बराच मोठा फटका बसला त्यामुळे ते नेहमी काळजीत असायचे म्हणून त्यांनी आज आपले जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेऊन आज सकाळी घरून जंगलात जाण्यासाठी निघाले आणि गावालगत असलेल्या कालव्याच्या पुलाच्या जवळ असलेल्या सागाचे झाळाला जवळ असलेल्या दुपट्टा झाडाला बांधून गळ्यात लटकविला आणि आपली जीवनयात्रा संपविली.







শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.