সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, March 14, 2014

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 101 कोटींचे वाटप

शुक्रवार, १४ मार्च, २०१४


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जून, जुलै 2013 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 50 टक्के पेक्षा अधिक शेतपिकाचे नुकसान झालेल्या 2 लाख 984 शेतकऱ्यांना 101 कोटी 1 लाख 42 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक संबंधित तहसिलदार यांचेकडे दिले नसतील त्यांनी 25 मार्च 2014 पर्यंत आपले बँक खाते क्रमांक संबंधित तहसिलदाराकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

दि. 13 मार्च 2014 अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या मदतीची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. चंद्रपूर 9876 शेतकऱ्यांना 663 लाख, बल्लारपूर 6091 शेतकऱ्यांना 333.66 लाख, गोंडपिंपरी 12871 शेतकऱ्यांना 823.26 लाख, पोंभूर्णा 10142 शेतकऱ्यांना 532 लाख, मूल 13607 शेतकऱ्यांना 429 लाख, सावली 19708 शेतकऱ्यांना 302.43 लाख, वरोरा 28054 शेतकऱ्यांना 1962 लाख, भद्रावती 17884 शेतकऱ्यांना 1260 लाख, चिमूर 19156 शेतकऱ्यांना 894 लाख, ब्रम्हपूरी 23499 शेतकऱ्यांना 840.54 लाख, सिंदेवाही 2989 शेतकऱ्यांना 60.34 लाख, नागभिड 3642 शेतकऱ्यांना 77.45 लाख, राजूरा 18410 शेतकऱ्यांना 938 लाख, कोरपना 10274 शेतकऱ्यांना 645.16 लाख व जिवती 4819 शेतकऱ्यांना 337.58 लाख असे एकूण 2 लाख 984 शेतकऱ्यांना 101 कोटी 1 लाख 42 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्यात आले.

ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक 25 मार्च 2014 पर्यंत दिले नाही अशांचे बँक खाते नंतर स्विकारले जाणार नाही. त्यामुळे मदत मिळण्यापासून संबंधित शेतकरी वंचित राहील याची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.