সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 19, 2013

बल्लारपुरात महिला डॉक्टरची आत्महत्या

बल्लारपूर : बामणी येथील डॉ. अनुराधा रवींद्र साळवे यांनी मंगळवारी (ता. १९) गळङ्कास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
महिला डॉक्टरचे पती गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. काही दिवसांपूर्वीच कार अपघातातून हे कुटुंब बचावले होते. बामणी गावातील सुसंस्कृत, सुस्वभावी कुटुंब म्हणून सर्वांना ते परिचित होते. असे असतानाही डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत डॉ. अनुराधाला साडेतीन वर्षांचा आदित्य नावाचा मुलगा आहे. सकाळी मुलाची शाळेची तयारी त्यांनी करून दिली. सासरे विनायकराव यांनी आदित्यला शाळेत सोडून दिले. पती रवींद्र आणि  त्यांची आई विश्रांती घेत होते. सासरे विनायकराव आदित्यला शाळेत सोडून आल्यानंतर घरगुती रुग्णालयाचा दरवाजा बराच वेळ उघडल्या गेला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांनी बोलवून दरवाजा तोडला, तेव्हा अनुराधाचा देह पंख्याला लटकलेला दिसला. आत्महत्येचे कारण अद्यापही कळले नसून, पोलिस तापस करीत आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.