সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 31, 2017

राज्य 4 लाख 25 हजार कोटी कर्जाच्या बोझात

तीन वर्षात राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा - आमदार प्रकाश गजभिये

नागपूर : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात जनतेला फसवून, निव्वळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी, फसवे आश्वासने देत सत्तेत आलेले भाजप शिवसेना सरकार तिन वर्षाच्या काळात जनतेच्या विश्वासावर अपयशी ठरले आहे, याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात संविधान चौकात भाजपचा तिसरा दिवस, होम हवन व कळूघाटा वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यंाना निवेदनाव्दारे तीन वर्षात राज्य 4 लाख 25 हजार कोटी कर्जाच्या बोझात असून राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. भाजप शिवसेना सरकारने तिन वर्षाच्या काळात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात केलेली विकासकामांचे भुमीपूजनच केले, कोणतीही नविन योजना न आणता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील योजनांचे निव्वळ नावे बदलविण्यात स्वताची पाठ थोपून घेतली. राज्यातील जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅस, जिवनावश्यक वस्तू, भाजीपाला आदींच्या किंमती वाढवून ‘‘अच्छे दिन’’ च्या रूपात नविन भेट दिली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.