चंद्रपूरः बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट राज्यव्यापी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आता अटकेत असलेल्या आरोपींची संख्या नऊ झाली आहे. पुण्याचा प्रमोण मोहकार, अहमदनगरच्या प्रकाश वडीटाके , अकोल्याचा अभिजीत म्हैसकर , चंद्रपूरचा नागेश अहिरे , मूलचा सचिन कोटपल्लीवार , मुख्य सूत्रधार नाशिकचा बाबा जाधव , अकोल्याचा राजेश दंदेकर ,गडचिरोलीचा त्रिदेव मुझुमदार आणि पानगडे यांना अटक करण्यात आली आहे. यातील बाबा जाधव हा नोटा स्कॅनिंग करीत होता. सर्व आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. चंद्रपुरातील बसस्थानक परिसरातील सुशिल्का हॉटेलमध्ये थांबलेल्या तीन व्यक्तींना
तब्बल ३२ लाख रुपयांच्या नकली नोटांसह चंद्रपूर आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्त कारवाईत
अटक केली. या तिघांसह चंद्रपुरातील एकाला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या नोटांचा वापर नक्षलवाद्यांसाठी शस्त्र खरेदीसाठी केला जाण्याचीही शक्यता पोलिसांनी
व्यक्त केल्यानं या प्रकरणाचं गांभीर्या वाढलं आहे. या प्रकरणातील मास्टर माइंडहा नाशिक इथं असल्यानं त्यालाही अटक होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर पोलिसांनी प्रदर्शनात मांडलेल्या या हजार रुपयांच्या नोटा
असली नसून बनावट आहेत. तब्बल ३२ लाख रुपयांच्या बनावट नोटा चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली
जिल्ह्यात जाणार होत्या. मात्र, गडचिरोली पोलिसांना याची माहिती मिळाली आणि चंद्रपूर पोलिसांच्या
मदतीनं बनावट नोटांचा व्यापार करणाèया टोळीला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद दत्तात्रय मोहरकर, पुणे, प्रकाश चांगदेव वडितके, रा. qपपळगाव (अहमदनगर),
अविजित धर्मराज म्हैसकर,
अकोला आणि नागेश प्रभाकर
अहिरे, चंद्रपूर
यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मास्टर माइंड प्रमोद जाधव हा नाशिक इथला रहिवासी असून,
त्याच्या अटकेसाठी
पोलिस पथक रवाना झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून काही व्यक्ती स्कार्पिओ
या गाडीनं तीन एप्रिलला चंद्रपुरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते हॉटेल
सुशिल्का इथं थांबणार असून त्यांच्याकडे नकली नोटा आहेत. नकली नोटा देऊन त्या बदल्यात
काही व्यक्तींकडून खèया नोटा घेणार आहेत,
अशी मटीपङ्क गडचिरोली
येथील सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मिळाली होती. त्यानंतर बावकर आपल्या पथकासह चंद्रपुरात दाखल झाले. पोलिस अधीक्षक राजीव
जैन यांनी लगेच चंद्रपूर आणि गडचिरोली पोलिसांचं संयुक्त पथक तयार केलं आणि रात्री
हॉटेल सुशिल्का इथं छापा टाकला. तेव्हा हॉटेलमध्ये प्रमोद मोहरकर, अविजित म्हैसकर आणि प्रकाश
वडितके आढळले. त्यांना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली, तेव्हा हजार आणि पाचशे रुपयांच्या
एकूण ३२ लाख तीन हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. सोबतच एक लाख २८ हजार रुपयांच्या
खèया नोटाही पोलिसांना मिळाल्या. आरोपींनी
आपल्या वाहनावर ममहाराष्ट्र पोलिसङ्क असं लिहिलं होतं. गंमत म्हणजे ज्या हॉटेलमध्ये
हे आरोपी थांबले, ते हॉटेल पोलिस मुख्यालयाच्या अगदी समोर आहे. आरोपींकडून पोलिसांनी या तिघांसह लॅपटॉप, पाच मोबाईल ङ्कोन जप्त केले. या आरोपींकडून
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील मध्यस्थ नागेश अहिरे यालाही पोलिसांनी ताब्यात
घेतलं. त्याच्याही घरून हजार रुपयांच्या २४ व पाचशे रुपयांच्या दोन नकली नोटा तसंच
एक लाख २६ हजार ५०० रुपयांच्या खèया नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
चंद्रपुरातील नागेश अहिरे हा मध्यस्थाचे कामकरीत होता. या प्रकरणात सचिन
कोटपल्लीवार या आणखी एका मध्यस्थाचं नाव समोर आलं आहे. तो मूल येथील असला तरी सध्या
तो गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी इथला रहिवासी आहे. नकली नोटा छपाईचं कामनाशिक
इथं चालत होतं. पोलिस तपासात काही खळबळजनक बाबीही समोर आल्या. या नकली नोटा शस्त्रसाठा
खरेदीसाठी वापरल्या जाणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसंच या
प्रकरणाचे तार गडचिरोली जिल्ह्याशी जुळले असल्यानं नक्षली कारवायांत हा पैसा वापरला
जाणार होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या प्रकरणात गोपनीयता बाळगली आहे. येत्या
दोन-तीन दिवसांत नकली नोटा छापणारे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता असून,
त्याचा वापर यापूर्वी
कधी केला आणि कुठे केला जाणार होता, यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीचा
संबंध असल्यानं प्रकरण गंभीर झालं आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :- गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र...
नागपूर : येथील माजी महापौर आणि माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. 22) निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. 1970 साली त्यांनी नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर, 1971 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम बघीतले. बारा वर्ष त्यांनी विधानपरिषदेत आमदार म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. नगरसेवक ते आमदार या राजकीय प्रवासात त्यांनी प्रदेश कॉग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविली. सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. गरीब होतकरु आणि मागासवर्गातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देण्यासाठी या संस्थेमार्फत जवळपास 45 शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना करुन भरीव कार्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वंसतराव साठे, निर्मलाबाई देशपांडे यांचेसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या मागे गिरीश आणि किरण अशी दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी (ता. 23) बारा वाजता धंतोली येथील निवासस्थानातून निघू...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...