चंद्रपूर : सोन्याच्या भावात मंगळवारी (ता. १६)
मोठी घसरण झाल्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांनी सराङ्कात मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत
सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव २६ हजार ५००, तर
दुपारनंतर २६ हजार ८०० रुपये एवढा होता. सोन्याच्या भावामध्ये गेल्या पंधरा
महिन्यांत झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. लग्नसराईचे दिवस असतानाच सोन्याने
ङ्कभाव खाणेङ्क सोडल्याने लग्नघरांतील मंडळीच नव्हे तर, इतरही घरांमध्ये सोनेखरेदीसाठी ‘लगीनघाईङ्क
सुरू झाली आहे. त्याचवेळी सोन्यात गुंतवणूक करणारे चिंतेत आहेत. मात्र जाणकार २४ हजारापर्यंत
घसरण झाल्यानंतर सोनं स्थिरावण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
युरोपातील एका बड्या
वित्तसंस्थेने त्यांच्याकडील सोने बाजारात विक्रीसाठी काढल्याने जगभरातील सोन्याचे
भाव कोसळले आहेत. दहा ग्रॅम सोन्याच्या दरात सोमवारी एक हजार २०५ रुपयांची घट झाली
असून, भाव २७ हजार २०० रुपयांवर होता. हाच दर २९ डिसेंबर
२०११ रोजी होता. गेल्या दीड वर्षातील ही सर्वांत मोठी घसरण आहे. ऐन लग्नसराईच्या
मोसमात सोन्याचे भाव उतरत असल्याने वधूपित्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. येत्या
काही दिवसांत घसरण कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे
सराङ्का व्यापारी सुभाष qशदे यांनी सांगितले. सोन्यासोबत
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, ५०
हजार रुपये दर होता. एक एप्रिल रोजी दहा ग्रॅम सोन्याचे दर ३० हजार ३० रुपये होते, तर एक किलो चांदी ५३ हजार ९०० रुपयांवर होती. गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या
दरात दोन हजार ८१०, तर चांदीच्या दरात पाच हजार ४०० रुपयांची
घसरण झाली आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :- गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...