चंद्रपूरः बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट राज्यव्यापी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आता अटकेत असलेल्या आरोपींची संख्या नऊ झाली आहे. पुण्याचा प्रमोण मोहकार, अहमदनगरच्या प्रकाश वडीटाके , अकोल्याचा अभिजीत म्हैसकर , चंद्रपूरचा नागेश अहिरे , मूलचा सचिन कोटपल्लीवार , मुख्य सूत्रधार नाशिकचा बाबा जाधव , अकोल्याचा राजेश दंदेकर ,गडचिरोलीचा त्रिदेव मुझुमदार आणि पानगडे यांना अटक करण्यात आली आहे. यातील बाबा जाधव हा नोटा स्कॅनिंग करीत होता. सर्व आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. चंद्रपुरातील बसस्थानक परिसरातील सुशिल्का हॉटेलमध्ये थांबलेल्या तीन व्यक्तींना
तब्बल ३२ लाख रुपयांच्या नकली नोटांसह चंद्रपूर आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्त कारवाईत
अटक केली. या तिघांसह चंद्रपुरातील एकाला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या नोटांचा वापर नक्षलवाद्यांसाठी शस्त्र खरेदीसाठी केला जाण्याचीही शक्यता पोलिसांनी
व्यक्त केल्यानं या प्रकरणाचं गांभीर्या वाढलं आहे. या प्रकरणातील मास्टर माइंडहा नाशिक इथं असल्यानं त्यालाही अटक होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर पोलिसांनी प्रदर्शनात मांडलेल्या या हजार रुपयांच्या नोटा
असली नसून बनावट आहेत. तब्बल ३२ लाख रुपयांच्या बनावट नोटा चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली
जिल्ह्यात जाणार होत्या. मात्र, गडचिरोली पोलिसांना याची माहिती मिळाली आणि चंद्रपूर पोलिसांच्या
मदतीनं बनावट नोटांचा व्यापार करणाèया टोळीला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद दत्तात्रय मोहरकर, पुणे, प्रकाश चांगदेव वडितके, रा. qपपळगाव (अहमदनगर),
अविजित धर्मराज म्हैसकर,
अकोला आणि नागेश प्रभाकर
अहिरे, चंद्रपूर
यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मास्टर माइंड प्रमोद जाधव हा नाशिक इथला रहिवासी असून,
त्याच्या अटकेसाठी
पोलिस पथक रवाना झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून काही व्यक्ती स्कार्पिओ
या गाडीनं तीन एप्रिलला चंद्रपुरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते हॉटेल
सुशिल्का इथं थांबणार असून त्यांच्याकडे नकली नोटा आहेत. नकली नोटा देऊन त्या बदल्यात
काही व्यक्तींकडून खèया नोटा घेणार आहेत,
अशी मटीपङ्क गडचिरोली
येथील सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मिळाली होती. त्यानंतर बावकर आपल्या पथकासह चंद्रपुरात दाखल झाले. पोलिस अधीक्षक राजीव
जैन यांनी लगेच चंद्रपूर आणि गडचिरोली पोलिसांचं संयुक्त पथक तयार केलं आणि रात्री
हॉटेल सुशिल्का इथं छापा टाकला. तेव्हा हॉटेलमध्ये प्रमोद मोहरकर, अविजित म्हैसकर आणि प्रकाश
वडितके आढळले. त्यांना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली, तेव्हा हजार आणि पाचशे रुपयांच्या
एकूण ३२ लाख तीन हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. सोबतच एक लाख २८ हजार रुपयांच्या
खèया नोटाही पोलिसांना मिळाल्या. आरोपींनी
आपल्या वाहनावर ममहाराष्ट्र पोलिसङ्क असं लिहिलं होतं. गंमत म्हणजे ज्या हॉटेलमध्ये
हे आरोपी थांबले, ते हॉटेल पोलिस मुख्यालयाच्या अगदी समोर आहे. आरोपींकडून पोलिसांनी या तिघांसह लॅपटॉप, पाच मोबाईल ङ्कोन जप्त केले. या आरोपींकडून
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील मध्यस्थ नागेश अहिरे यालाही पोलिसांनी ताब्यात
घेतलं. त्याच्याही घरून हजार रुपयांच्या २४ व पाचशे रुपयांच्या दोन नकली नोटा तसंच
एक लाख २६ हजार ५०० रुपयांच्या खèया नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
चंद्रपुरातील नागेश अहिरे हा मध्यस्थाचे कामकरीत होता. या प्रकरणात सचिन
कोटपल्लीवार या आणखी एका मध्यस्थाचं नाव समोर आलं आहे. तो मूल येथील असला तरी सध्या
तो गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी इथला रहिवासी आहे. नकली नोटा छपाईचं कामनाशिक
इथं चालत होतं. पोलिस तपासात काही खळबळजनक बाबीही समोर आल्या. या नकली नोटा शस्त्रसाठा
खरेदीसाठी वापरल्या जाणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसंच या
प्रकरणाचे तार गडचिरोली जिल्ह्याशी जुळले असल्यानं नक्षली कारवायांत हा पैसा वापरला
जाणार होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या प्रकरणात गोपनीयता बाळगली आहे. येत्या
दोन-तीन दिवसांत नकली नोटा छापणारे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता असून,
त्याचा वापर यापूर्वी
कधी केला आणि कुठे केला जाणार होता, यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीचा
संबंध असल्यानं प्रकरण गंभीर झालं आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
Wamanrao Pai : मानवजातीच्या दुःखाचे मूळ
-
जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे मानवजातीच्या
दुःखाला कारण आहे. मानवजातीच्या दुःखाचे मूळ आहे. परमेश्वराबद्दलचे जे आज
लोकांमध्ये अ...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे.
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग