সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 28, 2013

कृषी व्यवसायाला राष्ट्रीय व्यवसाय घोषित करू- राजनाथसिह

ब्रह्मपुरी- विदर्भात बेकारी आणि दारिद्य्र आहे. इथला शेतकरी गरीब असूनही तो स्वाभिमानी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या भ्रष्टाचारामुळे मध्यवर्गीयांसमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. आदिवासींचा विकास खुंटला आहे. पीडित समाजाचा विकास होणार नाही, तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही कृषी व्यवसायाला राष्ट्रीय व्यवसाय घोषित करू. तसेच रोजगार हमी योजना शेतीसाठी राबवू. शेतकèयांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शेतक-यांना उत्तम खत, उत्तम बियाणे व qसचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे राजनाथसिह यांनी भाषणात सांगितले.

येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या पटांगणावर भाजपच्या वतीने शेतकरी व शेतमजूर मेळाव्याचे आज (ता.२८) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मागदर्शक म्हणून राजनाथqसह उपस्थित होते. यावेळी मंचावर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नितीन गडकरी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्मृती इराणी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अतुल देशकर, आमदार नाना पटोले, आमदार शोभाताई ङ्कडणवीस, आमदार सुधीर पारवे, जि. प. अध्यक्ष संतोष कंभरे, अशोक नेते, नीता केळकर, वनिता कानडे आदींची उपस्थिती होती. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.