काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 19, 2015

नझुल भूखंड धारकांना मालकी हक्क

नझुल भूखंड धारकांना मालकी हक्क

नागपूर, दि. 18 डिसेंबर :- विदर्भातील नझुल भूखंड धारकांना त्यांच्या भूखंडाचेसंपूर्ण मालकी हक्क देण्याबाबत या भूखंड धारकांकडून शासनाससातत्याने विनंती करण्यात येत होती. त्यामुळे आतालिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुलजमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-1) करण्यासंदर्भात सर्वंकषअभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी प्रधान सचिव(महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येतआहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिवांनी नामनिर्देशित केलेले प्रधान सचिव अथवा सचिवदर्जाचे अधिकारी, नागपूर व अमरावतीचे विभागीय आयुक्त हेसदस्य असतील. तर महसूल व वन विभागाचे उप सचिव हेसदस्य सचिव असतील.

ही समिती लिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावरदिलेल्या नझुल जमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-1) केल्यानेत्याचे राज्याच्या आर्थिक हितावर तसेच अन्य क्षेत्रात कोणतेदुर्गामी परिणाम होतील आणि या जमिनी फ्री होल्डकरण्यासंदर्भात सर्वंकष अभ्यास करील. या समितीने तीनमहिन्यात आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. येत्यामार्च अखेरपर्यंत समितीच्या अहवालावर निर्णय घेतला जाईल.

विदर्भातील नझुल जमिनीच्या भाडेपट्टयाचे दर
विद्यमान दराच्या एक पंचमांश होणार

Tuesday, December 08, 2015

आदिवासी अधिकाऱ्‍याला मिळाला न्याय.

आदिवासी अधिकाऱ्‍याला मिळाला न्याय.

एकनाथराव खडसे यांचेकडून
10 वर्षाची ससेहोलपट संपली

नागपूर, दि.8 डिसेंबर : स्वत:ची काही चूक नसतांना शासकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे अन्याय सहन करणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेल्या बा.गो.तिरानकर या आदिवासी अधिकाऱ्याला मा.राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकताच न्याय मिळवून दिला.

Friday, December 04, 2015

आयुक्तांच्या ‘हजेरी’साठी CCTV

आयुक्तांच्या ‘हजेरी’साठी CCTV

चंद्रपूरच्या नगरसेवकांची अनोखी शक्कल

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेच्या आयुक्तांवर नजर ठेवण्यासाठी नगरसेवकांनी आयुक्तांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर आणि पदाधिकारी यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.
आयुक्त गैरहजर राहतात, फाईल्स क्लिअर होत नाहीत, आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, असे आरोप करण्यात येत आहेत. यावरुन सर्वसाधारण सभेत गदारोळही माजला होता. यावेळी मी गैरहजर राहतो याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे, असा प्रतिप्रश्न आयुक्तांनी नगरसेवकांना केला आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क आयुक्तांच्या केबिनमध्येच सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे विशेष म्हणजे सीसीटीव्हीचा सर्व खर्च नगरसेवकांनी स्वत:च्या खिशातून केला आहे.

Wednesday, December 02, 2015

 'इ-इंडिया' पुरस्काराने गौरव

'इ-इंडिया' पुरस्काराने गौरव

  • महापालिकेच्या 'स्मार्टभरती प्रक्रियेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
  • ऑनलाईन परीक्षेद्वारे ७१,८१६ उमेदवारांमधून करण्यात आली होती ९४२ कर्मचा-यांची निवड
  • राज्यातील १४ केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात आली होती ऑनलाईन परीक्षा

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतींचा वापर करीत राबविण्यात आलेल्या 'स्मार्ट'भरती प्रक्रियेला 'इ – इंडिया' या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कर्मचारी निवड प्रक्रियेसाठी संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन राबविण्यात आलेली 'स्मार्ट' भरती प्रक्रिया ही केवळ ०७ महिन्यात यशस्वीरीत्या व पारदर्शकपणे पूर्ण करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. याच वैशिष्टयपूर्ण बाबीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. मुंबईतील ताज प्रेसिडेंट (विवांता) या तारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या 'इ – इंडिया' शिखर परिषदेच्या दिमाखदार सोहळ्यादरम्यान 'इ – इंडिया' या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

१४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करा

१४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करा

यवतमाळ, १ डिसेंबर- बिहार सरकारने एप्रिल १६ पासून बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीची केलेली घोषणा हा एक क्रांतिकारी निर्णय ठरला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यानेही कोणतीही आर्थिक वा महसुली तुटीची चिंता न करता शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्याच्या १४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष व यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, यासाठी २०१० पासून सतत जनआंदोलन करणारे किशोर तिवारी यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या जाहीर मागणीचा दाखला दिला आहे. आपण मागील दोन वर्षांत ग्रामीण भागात जनतेच्या भावनांचा अभ्यास केल्यावर अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना समाज व सरकारशी संवाद न होण्यासाठी दारू हेच प्रमुख असल्याचे सत्य समोर आले आहे, असे तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्याचा १४ जिल्ह्यातील महिलांनी आपल्या बळावर काही खेड्यांमध्ये दारूबंदी केली आहे. मात्र तालुक्याच्या ठिकाणी व लगतच्या मोठ्या गावात सरकारी दारूच्या दुकानामुळे ही खेड्यातील दारूबंदी कुचकामी ठरली आहे. या दारूच्या महापुराला सरकारी अधिकारी, पोलिस व अबकारी विभागाचे ‘जास्तीत जास्त दारू विका आणि सरकारला महसूल द्या’ हे धोरणच जबाबदार असल्याची टीकासुद्धा त्यांनी केली आहे.
सरकारच्या तिजोरीला जर या दारूबंदीमुळे तोटा होत असेल तर सरकारने दारूमुक्ती कर सुरू करावा, अशी सूचनाही किशोर तिवारी यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्‍नांवरील अभ्यासासाठी नेमलेल्या डॉ. विजय केळकर उच्चस्तर समितीच्या अहवालातसुद्धा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदीची शिफारस केली आहे. ग्रामीण भागातील प्रचंड अडचणी, आर्थिक संकट व अभूतपूर्व कृषी संकट यावर केळकर समितीने दारूबंदीचा प्रस्ताव सरकारला दिला असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.
३० जानेवारी २०११ ला यवतमाळ जिल्ह्यातील हजारो महिलांनी जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी पांढरकवडा येथे मेळावा आणि २०१२ मध्ये मार्च महिन्यात यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन आपली मागणी रेटून धरली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनीही यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची शिफारस केली होती. त्यामुळे शासनाने यवतमाळ जिल्ह्यात मद्यविक्री व मद्यपान यावर बंदी घालण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे, अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात असताना जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. आता तात्काळ संपूर्ण दारूबंदी लागू करावी, अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महिलांनी संपूर्ण दारूबंदीसाठी आंदोलन सुरू केले आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील यवतमाळ व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे सरकारने वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली येथील दारूबंदीच्या धर्तीवर दारूबंदी करणे गरजेचे झाले आहे.
तरुण पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. मुले दारूच्या आहारी जात आहेत. दारूमुळे सुखी संसाराची राखरांगोळी होत आहे. सहज उपलब्ध होणारी कमी पैशातील दारू हे यामागील प्रमुख कारण आहे. लगतच्या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेच्या आशीर्वादाने वाहात असलेल्या दारूच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता, केरळप्रमाणे सर्व पक्ष, सर्व धर्म व सरकार यांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यात दारूबंदी करणे काळाची गरज झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलिस व प्रशासनाने संरक्षण दिल्याने गावागावात दारूच्या भट्ट्या पेटविल्या जात आहेत. या दारूच्या विरोधात गावागावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु ज्यांनी कारवाई करायची त्यांचेच छुपे पाठबळ असल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्‍न महिलांपुढे निर्माण झाला आहे. अखेर या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे काढले आहेत. काही ठिकाणी तर महिलांनी स्वत:च दारूच्या भट्‌ट्या नेस्तनाबूत केल्या आहेत. दारूचे हे साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकही दिली आहे.
दारूविरुद्ध आंदोलन करणार्‍या या महिलांना दारू माफियांकडून धमक्याही दिल्या जात आहेत. काही ठिकाणी तर महिलांवर हल्लेही केले गेले आहेत. ही शोकांतिका किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे.
५ हजार पोलिसांचा ताफा

५ हजार पोलिसांचा ताफा

हिवाळी अधिवेेशन

नागपूर, - ७ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून पोलिस बोलविण्यात आले असून ५ हजार पोलिस अधिकारी आणि शिपायांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे.
या बंदोबस्तासाठी बाहेरून २ अप्पर पोलिस आयुक्त, १५ पोलिस अधीक्षक, २९ सहायक पोलिस आयुक्त, ७५ पुरुष पोलिस निरीक्षक, १० महिला पोलिस निरीक्षक, ३०० फौजदार, ७० महिला फौजदार, २७०० पुरुष शिपाई आणि ५०० महिला शिपाई येणार आहेत. यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे १२०० जवान, राज्य राखीव बलाच्या ६ कंपन्या, फोर्स वनची तुकडी राहणार आहे. याशिवाय शहरातील २ ते २५०० अधिकारी आणि शिपायांना तैनात करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकार्‍यांची वीज मंडळ, केंद्रीय राखीव पोलिस बल, कृषिकुंज येथील विश्रामगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्तांची अमरावती मार्गावरील निंबूवर्गीय वसतिगृह, सातपुडा, वेणा, ओराई प्रशिक्षण केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकांची राष्ट्रीय अग्निशमन दलाच्या वसतिगृहात व्यवस्था केली आहे. बंदोबस्ताला आलेल्या महिलांना मानकापूर येथील क्रीडा संकुलात थांबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिपायांसाठी २७ मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. प्रत्येक मंगल कार्यालयात ५० ते ७५ शिपायांना थांबविण्यात येणार आहे. बंदोबस्ताला येणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४५० वाहनांची मागणी करण्यात आली असून अजूनपर्यंत वाहने मिळाली नाहीत. परंतु, दोन-तीन दिवसात ही वाहने मिळतील अशी आशा आहे.
पोलिस कर्मचार्‍यांना ४० रुपयात जेवण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही कंत्राटदारांशी बोलणी करून त्यांना जेवणाचे कंत्राट दिले आहेत. बंदोबस्ताला जाणार्‍या आणि बंदोबस्ताहून येणार्‍या कर्मचार्‍यांना हे कंत्राटदार जेवणाचे पाकिटे देणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी आणि शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. थंडीचे दिवस असल्याने कर्मचार्‍यांना गादी, उशी, चादरी आणि ब्लँकेट देण्यात येणार आहेत. बंदोबस्ताला येणार्‍या कुणाही कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही शहरातील ५ मोर्चे पॉईंट ठेवण्यात आले आहेत. मोर्चेकर्‍यांनी काही गडबड करू नये यासाठी खाजगी गणवेशात पोलिसांना तैनात करून मोर्चेकर्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात येणार आहेत.
मागील वर्षी शेवटच्या दिवसापर्यंत ९९ मोर्चे विधानभवनावर काढण्यात आले होते. आतापर्यंत १८ संघटनांनी मोर्चाची परवानगी मागितली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस आणि आदिवासींचे मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. याशिवाय अपंग, अंगणवाडी, विना अनुदानित शाळा, शिक्षक, मजदूर, झोपडपट्टीधारक, रॉकेल विक्रेते यांचेही मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत.

Tuesday, December 01, 2015

 सावलीत काँग्रेस, चिमूर, पोंभुर्ण्यात भाजपचे नगराध्यक्ष

सावलीत काँग्रेस, चिमूर, पोंभुर्ण्यात भाजपचे नगराध्यक्ष




चंद्रपूर, ता.३०: जिल्हयातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला एक, तर भाजपला दोन ठिकाणी सत्ता मिळाली.
सावली नगरपंचायतीच्या निवडणुकीत १० जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. तेथे राष्ट्रवादीला ५, तर बसपा व अपक्षास प्रत्येकी एक जागा मिळाली होती. पोंभुर्ण्यात भाजपने १० जागा जिंकून सर्वांना चीत केले होते.चिमूर नगरपंचायतीत भाजपला ६ जागेवर विजय संपादन करता आला होता. काँग्रेसला ५ , शिवसेना २ तर अपक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या.
भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी आपल्या परिवारासह नुकतीच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन जंगल सफारीचा आनंद लुटला, तो क्षण

Saturday, November 28, 2015

राज्यात दारू विक्रीवर बंदी होणार नाही : शासन

राज्यात दारू विक्रीवर बंदी होणार नाही : शासन

मुंबई - दारू विक्रीवर कधीही लवकरच  बंदी होणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारू बंदी घोषणा केल्यानंतर एकसमान बंदी महाराष्ट्रातील लागू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, शिवसेना आमदार नीलम गो-हे, भाजपचे आशिष देशमुख यांनी केली होती
तथापि, महाराष्ट्र सरकारने दारू विक्रीतून सशक्त महसूल मिळतो म्हणून राज्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही, असे सांगितले आहे.

"राज्य फक्त दारू विक्रीतून सुमारे Rs18,000 कोटी महसूल प्राप्त करतो. सरकारने दारू विक्री बंदी साठी म्हणून, शक्य होणार नाही. महसूल पर्यायी स्रोत आढळल्यास दारू विक्री प्रतिबंध शक्य असल्याचे "राज्याचे महसूल आणि अबकारी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

बिहार सरकारने 1 एप्रिल पासून राज्यातील दारू बंदी निर्णय घेतला. मात्र चालू आर्थिक वर्षात किमान, तो बंदी शक्य होणार नाही, "ते म्हणाले. राज्य आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. "
चंद्रपूर, वर्धा व गडचिरोलीत गेल्या काही वर्षांपासून दारू विक्री प्रतिबंधित आहे. ती कायम राहणार आहे
अबकारी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दारू विक्रीवर राज्य व्यापी बंदी लागू करण्यासाठी प्रस्ताव आली नाही असे स्पष्ट केले.
तथापि, गाव पातळीवर दारू विक्रीवर घालण्यात आलेली बंदी स्थानिक संस्था मध्ये एक ठराव पास करता येते. महिला सक्षम करण्यासाठी प्रक्रिया सोपी करण्यासाठी प्रशासन निर्देश दिले. महिला बहुसंख्य या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दारू विक्री गावांमध्ये बंदी घातली जाईल.

Wednesday, November 18, 2015

दगड घालून खून

दगड घालून खून


आज सकाळी सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगरच्या मागच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेत जुगार, दारु आणि पैशाच्या वादातून दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. रवि प्रकाश डुले (२६) रा. गोपालनगर आणि बंटी उर्फ संदीप शरद आटे (२९) अशी मृतकांची नावे आहेत. या प्रकरणात पोलीसांनी आरोपी मनोज भारद्वाज (२५) यास अटक केली आहे. रवि हा बर्डीवर ऑटोरिक्षा चालवितो. तर आरोपी मनोज आणि बंटी हे सेन्ट्रींगचे काम करतात. काही दिवसांपूर्वी मनोजने रविकडून हिरो प्लेजर कंपनीची दुचाकी मागितली होती. रविने आपल्या नातेवाईकाची दुचाकी मनोजला दिली. परंतु मनोजने रविकडून घेतलेली दुचाकी स्वत:च्या फायद्याासाठी दुसºयाकडे तारण ठेवली होती. याची माहिती मिळताच रवि हा मनोजला दुचाकी परत करण्याचे किंवा दुचाकी सोडविण्यासाठी पैशाची मागणी करीत होता दरम्यान काल, मंगळवारच्या रात्री ९ च्या सुमारास रवि हा बंटी, मनोज आणि इतर पाच ते सहा मित्रांसह इंद्रप्रस्थनगर परिसरातील बाजाराच्या ठिकाणी विदेशी दारु पित आणि जुगार खेळत बसला होता. रात्री ११.३० पर्यंत ते दारु पित होते. त्यानंतर एक-एकजण घरी जाऊ लागले. त्या सुमारास त्यांची दारुही संपली. शेवटी रवि, बंटी आणि मनोजच त्या ठिकाणी थांबले होते. तिघांनाही पुन्हा दारुची आवश्यकता होती. त्यामुळे दारु कोण आणणार याच्यातून रवि आणि मनोजमध्ये वाद झाला. या वादातून दुचाकीचा मुद्दा आला असता मनोजने दुचाकी आणली आणि रविला दिली. परंतु त्यानंतरही भांडण सुरुच होते. त्यामुळे ११.३० च्या सुमारास मनोजने दारुच्या नशेत शेजारचे सिमेंटचे पत्रे घेऊन रविच्या डोक्यावर मारले. यात रवि रक्तबंबाळ झाला असता बंटी आरडाओरड करु लागला. त्यामुळे मनोजने बंटीच्या डोक्यातही दगड घातला. यानंतर रवि आणि बंटी गतप्राण झाले असता मनोजने त्याना संपविण्याच्या उद्देशाने पुन्हा त्यांच्या डोक्यात दगड घातले. रवि आणि बंटीचा मृत्यू झाल्यानंतर मनोज हा दुचाकी घेऊन घटनास्थळावरुन पळून गेला. सकाळी नैसर्गिक क्रियेसाठी जाणाºया रहिवाशांना बाजारपेठच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा दिसला आणि काही अंतरावर दोन मृतदेह पडले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीतील एका युवकाने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन खुनाविषयी माहिती दिली. यानंतर सकाळी ६ वाजता सोनेगाव, राणाप्रतापनगर येथील पोलीस घटनास्थळी पोहाचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आणि आरोपी मनोजला सकाळी ९.३० च्या
सुमारास त्याच्या घरुन अटक केली. मनोजने एकट्यानेच खून केला की त्याच्यासोबत कुणी होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्यासोबत दारु पिणाºया काहींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु मनोजने आपण एकट्यानेच दोघांनाही संपविल्याची कबुली पोलीसांना दिली.

Saturday, November 14, 2015

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

चंद्रपूर-  चंद्रपुरातील जटपुरा गेटच्या वाहतुकीची कोंडी फोडण्याचा श्रीगणेशा शेवटी शनिवारी गेटजवळच आयोजित जनसभेने झाला. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जटपुरा गेटची वाहतूक सुरळीत करण्याचे दीर्घकालीन, तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय चर्चिले गेले. तात्पुरत्या उपायांवर लगेच कार्यवाही करण्याचे निर्देशही मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांना दिले.
मुख्य रस्त्याचे पथमार्ग लहान करणे, रामनगरच्या वनवेबाबत विचार करून तशा सूचना मागवणे, नो पार्किंग झोन तयार करून पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून देणे, शहरातून बाहेर पडणारे अन्य वळण मार्ग शोधणे, रस्त्याचे दुभाजक तोडून ते वाहतुकीला सुव्यवस्थित होईल, असे करणे आदी विषयांवर सूचना देण्यात आल्या. या सार्‍या बाबींवर विचार करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. 
शिवाय दीर्घकालीन उपायायोजना करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या प्रमुखांना येत्या सोमवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत पत्र लिहून त्यांना पाचारण करणे आणि प्रत्यक्ष जटपुरा गेट दाखवणे, त्यांच्यासोबत ही समस्या सोडविण्यासाठी चर्चा करणे, असे ठरले. 
सुधीर मुनगंटीवार हे स्वत: या कामासाठी पुढाकार घेणार आहेत. ते म्हणाले, जटपुरा गेट तोडणे हा काही शाश्‍वत मार्ग नाही. कारण किल्ला ही या शहराची ओळख आहे. या मार्गावरची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सारे मार्ग शोधून त्यावर काम करावे लागेल. रस्त्यांवरील विजेचे खांब काढून वाहिन्या भूमिगत कशा करता येईल, ते बघावे लागेल. 
तत्पूर्वी, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण यांनी, गेटच्या शेजारची भिंत तोडण्यासाठी पुरातत्व विभागाला परवानगी देण्यास काही हरकत नसावी. कारण आम्ही या वास्तूचे विद्रुपीकरण करीत नसून, उलट त्याचे सौंदर्यीकरणच करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर ती परवानगी घ्यावी, अशी सूचना केली. तर, डॉ. गोपाल मुंधड यांनी, जटपुरा गेटवरील वाहनांची कोंडी लक्षात घेता जटपुरा गेटची भिंत तोडावी आणि मनपाच्या मालकीच्या दुकानलाईनचा काही भाग तोडून त्या दुकानदारांना मागचा भाग देण्यात यावा, असे सूचवले. विनोद दत्तात्रय यांनी, अद्ययावत स्थापत्य तंत्रज्ञानाचा वापर करून तुकड्यामध्ये गेट उचलून बाजूला उभा करावा, जेणेकरून तो रस्त्याच्या मधे येईल आणि सुुंदरही दिसेल, असे सांगितले. मेघनाद जानी, तसेच सदानंद खत्री यांनी, जटपुरा गेटची भिंत तोडून दहा व चौदा फूट रुंदीचे दोन रस्ते तयार करावे. गेटच्या मधून चारचाकी जातील आणि उर्वरित रस्त्यावरून दुचाकी आणि ऑटो जातील, अशी व्यवस्था तयार करावी, असे सूचवले. रामनगर माार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे आणि या मार्गाला वनवे करावे, अशीही सूचना आली. या सार्‍या सूचनेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष गेट आणि रस्त्याची पाहणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Thursday, November 12, 2015

राज्य नाटय स्पर्धेत यंदा 13 नाटकं

राज्य नाटय स्पर्धेत यंदा 13 नाटकं

मेजवाणी 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक फेरीला प्रारंभ

शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने आयोजित 55 व्या हौशी मराठी नाटय स्पर्धाचे आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होत असुन यंदा एकुण 13 नाटकं चंद्रपुर केंद्रावर, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कत्रतिक सभागत्रहात सादर होत असुन दिनांक 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक
पफेरीला प्रारंभ होणार आहे.
येत्या 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हि स्पर्धा रंगणार असुन रोज सायंकाळी 7 वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहे. स्पर्धेचे वेळापऋाकाप्रमाणे दिनांक 18 नोव्हेंबर, बुधवार, सायंकाळी 7 वाजता श्री. सिध्दीविनायक प्रतिष्ठान, यवतमाळ या संस्थेचे नाटक १अभिनेऋाी२, लेखक - गिरीश जोशी, दिग्दर्शक - कल्पना जोशी, दिनांक 19 नोव्हेंबर, गुरफवार, सायंकाळी 7 वाजता समुत्कर्ष बहुउद/देशीय संस्था, गडचिरोजी या संस्थेचे नाटक १परिवर्तन२, लेखक, दिग्दर्शक - राजरतन देवीदास पेटकर, दिनांक 20 नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी 7 वाजता समुत्कर्ष बहुउद/देशीय संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १तप्त दाही दिशा२, लेखक
- डाॅ. राजेन्द्र धामणे, दिग्दर्शक - राजाभाउफ भगत, दिनांक 21 नोव्हेंबर, शनिवार, सायंकाळी 7 वाजता डाॅ. श्यामाप्रसाद सार्वजनिक वाचनालय, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १हणम्याची मरीमाय२, लेखक - विजय खानविलकर, दिग्दर्शक - श्रीनिवास मुळावार, दिनांक 22 नोव्हेंबर, रविवार, सायंकाळी 7 वाजता कामगार मनोरंजन केंद्र, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १देवाशपथ खोट सांगेन२, लेखक - डाॅ. मोहन पानसे, दिग्दर्शक - मोहन जोशी, दिनांक 23 नोव्हेंबर, सोमवार, सायंकाळी 7 वाजता कलावैभव नाटय व सांस्कत्रतिक संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १खेळ२, लेखक - अनिल दांडेकर, दिग्दर्शक - अविश वत्सल, दिनांक 24 नोव्हेंबर, मंगळवार, सायंकाळी 7 वाजता कलाश्रय ज्ञान व कला संवर्धन मंडळ, यवतमाळ या संस्थेचे नाटक १आसरफबा२, लेखक - सुनिल देशपांडे, दिग्दर्शक - प्रशांत गोडे, दिनांक 25 नोव्हेंबर, शनिवार, सायंकाळी 7 वाजता अस्मिता रंगायतन, यवतमाळ या संस्थेचे नाटक १माझाा खेळ मांडु दे२, लेखक - सई परांजपे, दिग्दर्शक - अशोक आष्टीकर, दिनांक 26 नोव्हेंबर, गुरफवार, सायंकाळी 7 वाजता पफुलोरा सामाजिक विकास
संस्था, वर्धा या संस्थेचे नाटक १घर तिघांचं हवं२, लेखक - रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक - विकास पफटिंगे, दिनांक 27 नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी 7 वाजता नवोदिता, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १ज्याचा त्याचा प्रश्न२, लेखक - अभीराम भडकमकर, दिग्दर्शक - डाॅ. जयश्री कापसे-गावंडे, दिनांक 28 नोव्हेंबर, बुधवार, सायंकाळी 7 वाजता कल्पतरफ बहुउद/देशीय संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १हीच तर प्रेमाची गंमत आहे२, लेखक - अशोक पाटोळे, दिग्दर्शक - विलास राखे, दिनांक 29 नोव्हेंबर, रविवार, सायंकाळी 7 वाजता अध्ययन भारती, वर्धा या संस्थेचे नाटक १श्रीकांत प्रभुणेची प्रेमकथा२, लेखक - श्याम पेठकर, दिग्दर्शक - चैतन्य आठले, दिनांक 30 नोव्हेंबर, सोमवार, सायंकाळी 7 वाजता आदिवासी लोकरंग कलामंच बहुउद/देशीय संस्था, वणी, जिल्हा यवतमाळ या संस्थेचे नाटक १कातरवेळ२, लेखक - डाॅ. माणिक वडयाळकर, दिग्दर्शक - आनंद गेडाम
तरी 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा रंगणार असुन रसिकप्रेक्षकांनी मोठया संखेने आपली उपस्थिती दर्शवावी असे आव्हाहन महाराष्ट! शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने समन्वयक सुशील सहारे यांनी केले आहे.