সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 23, 2017

निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

प्रतिनिधी/नांदेड :- सोशियल मीडिया वरून साहित्य क्षेत्रात जनप्रसिद्धि मिळविलेल्या साहित्य स्पंदन,कुही या साहित्याकांच्या व्हाट्स अँप ग्रुपने गेल्या काही वर्षांपासून साहित्य क्षेत्रातील विविध स्पर्धेचे आयोजन करत आलेत,तसेच जगतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिना निमित्त ,"ऐसें कैसे झाले भोंधु",या विषयांवर लेखमाला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतें, तर नुकतेच प्रसिद्धी पत्राद्वारे निकाल जाहीर करण्यात आला.
जागतिक अंधश्रध्दा निर्मूलन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऐसे कैसे झाले भोंदू याविषयावरील निबंध स्पर्धेचा निकाल नुकतेच जाहिर करण्यात आले ,या स्पर्धेत महाराष्ट्र भरतील अनेक नामवंत लेखकांनी सहभाग नोंदवला होता. ज्यात नागपुरच्या अंकुश शिंगाडे यांच्या निबंधास सर्वोत्कृष्ट तर स्नेहलता कुलथे यांचे निबंध उत्कृष्ट ठरले. सदरील निबंध स्पर्धेत स्तंभलेखक नागोराव सा.येवतीकर यांच्या निबंधास प्रथम तर अनिल चांडक, हनुमंत सोपान, मनिषा क्षिरसागर यांच्या निबंधास अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले असल्याचे साहित्य स्पंदन समुहाचे मुख्य संचालिका प्रा. वैशाली देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. सर्व विजेत्या साहित्यकांना ग्राफिक्सकार संतोष शेळके यांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या विजयी प्रमाणपत्र ऑनलाइन देऊन गौरविण्यात आले. सदरील स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी समूह संयोजिका वृषाली वानखेडे, सहसंयोक कवी अनिल रेड्डी आणि कवी निखिल खराबे यांनी अथक परिश्रम घेतले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.