সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, September 13, 2017

अजून किती विचारवंत संपवणार....?

लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
मो. ९९७००५२८३७

परवा निवांत क्षणी मोबाईल हाताळत होतो, अचानक एका व्हाट्स अँप ग्रुपवर्ती मला एक धक्कादायक बातमी दिसली, ही बातमी खरी आहे का,? या विचाराने मी थोडं पूर्ण माहिती मिळेल का याच्या शोधात होतो,आणि एकदम धक्कादायक बातमी माझ्या डोळ्यासमोर अली काही वेळ सुन्न झालो, ती बातमी होती बंगळूरच्या जेष्ठ पत्रकार तथा संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येची,आपल्या कार्यालयावरून रात्रीला घरी परतत असताना विकृत विचार सारणीच्या चार-पाच इसमानी त्यांच्यावर फार जवळून बंदुकीच्या गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या केले,परंतु सोशियल मीडिया वर लंकेश हत्याकांडावर ना ना प्रकारचे टिंगलटवाळी संदेश,पोष्ट करतांना दिसून येत आहेत,कर्नाटक चे भाजप आमदार डी. एन. जीवराज यांनी गौरी लंकेशची यांची हत्या,संघविरोधी लिखाण वरून झाल्याची गरळ ओखली, तर अनेक युवकांची सोशियल मीडिया वर हत्येचा निषेध सोडाच 'जैसी करणी वैसी भरणी",या सारखे पोष्ट वाचून मनाला खंत वाटत आहे.


आपला देश संस्कृतीक, पारंपरिक रीती रिवाज या सर्वांगाने नटलेले हे देश आहे,याच देशात भगवान गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान आम्हाला ऐकायला मिळतात,याच देशात आम्हाला संतांची अभंगे ऐकायला मिळतात,आणि यांच देशात संविधानासारखी लोकशाही बळकट आहे, देशात विचारवंतांनी गाचाटलेले महान विचारवंत होऊन गेले,महापुरुष होऊन गेले,यांच्या चळवळीला सार्थ ठरण्यासाठी अनेक अनुयायी आज महापुरुषांच्या वैचारिक चळवळीचा वारस म्हणून जगतात,अनेक विचारवंत आज त्यांच्या कार्याची रथ पुढे नेण्यात यशस्वी आहेत,परंतु देशात वाढत चाललेली सहिष्णुता पाहून नक्कीच आमच्या विचारसरणीला प्रबोधन कमी पडत असल्याचे जाणवत आहे,एकीकडे अनेक विचारवंतांची फौज देशात तयार होत आहेत,तर त्यापेक्षा दुप्पटीने त्यांच विचारवंतांची हत्या करणारे हत्येकरी व त्यास प्रोत्साहन देणार,समर्थन करणारेे युवा वर्ग,किती लाजिरवाणी बाब आहे, बैगळूरच्या जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश त्यांच्या हत्येनंतर निषेधा वैतरिक्त हत्येकऱ्याना प्रोत्साहन देणारे आज सोशिअम मीडिया वरती वाचायला मिळत आहे,लोकशाहीचे लोकप्रतिनिधी असलेले कर्नाटकचे भाजपा आमदार डी.एन.जीवराज यांच वक्तव्य तर हत्येकऱ्यांना समर्थन करणार्यापैकी एक, संघ विरोधी लिखाण केल्याने गौरी लंकेश यांची हत्या झाल्याचे त्याने गरळ वकुन, पुन्हा एकदा लोकशाहीचा घात केला,देशात लोकशाहीची,संविधानाची बाजू बळकट करण्यासाठी या लोकप्रतिनिधींना आपण लोकशाहीच्या बळावर निवडून द्यायचं आणि हे लोकप्रतिनिधी आपल्याकडे असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुसक्या आवळायची हेच का देशात चालत असलेली समानता,स्वतंत्रता,बंधुता,एकात्मता, तिकडे अमेरिका म्हणते,'गौरी लंकेश यांची हत्या म्हणजे भारताच्या लोकशाहीस घातक ठरतोय,मग आम्हाला आमच्या लोकशाहीची पर्वा नाही का,आमच्या देशात सत्य आणि खरे बोलल्या जाणाऱ्यांसाठी बंदुकीची गोळी हाच सन्मान आहे का.?



पुरोगामी पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात देखील काही वर्षांपूर्वी दोन विचारवंतांची हत्या झाली,त्याचा अजूनही शोध मोहीम चालूच असल्याचे सांगतात,मारेकऱ्यांचा तपास अद्याप लागला नाही,डॉ.दाभोलकर, आणि कॉ. पानसरे यांनाही बंदुकीच्या गोळ्यांने सन्मानित करण्यात आले होते,हे विचारवंतही डाव्या विचारसरणीचे होते,सामाजात चालत असलेली अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्या वर गधा आखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेमून अनेक बुवा बापूच्या खोट्या जंतरमंतर वरून समाजाला सुटका मिळत होता ढोंगी पाखंडाची दुकाने बंद होत चालली होती , विज्ञानवादी विचाराने अनेक प्रबोधनाच्या सानिध्यात सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असलेल्या दाभोलकर , पानसरे,कुलबर्गी यांना शेवटी सत्यशोधकांना मिळणारा (हत्या) मान सन्मान मिळाला,यांच्या हत्येनंतर अनेक संघटने,अनेक समूहाच्या लाठा रस्त्यावर उतरले,मेणबत्या पांजरल्या "व्यक्ती मेले तरी विचार मरत नाहीत",अश्या वक्तव्य समाजातून ऐक्याला मिळत होत्या,आणि आजही तेच ऐकत आहोत,आजही गौरी लंकेश च्या हत्येनंतर अनेकांनी ह्या वक्तव्यातून निषेध नोंदवला,मात्र खंत या गोष्टीची वाटते अजून किती विचारवंत संपवता..?,व्यक्ती गेले विचार जात नाहीत खरे पण त्या व्यक्तीची जागा किती जणांनी घेतली,त्यांच्या विचारांनी कितीजण आज न्याय मागतात, सत्य रेखटणाऱ्या व्यक्तीला असेच संपवणार का.? नेमकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरला का..?
सोशियल मीडियावर नकोत्या पोष्ट वाचायला मिळत आहेत,म्हणजे हत्येकऱ्यांच्या समर्थकांची यादी आज या सुसंस्कृत देशात वाढत चालली आहे,म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा,देशातल्या संविधानिक लोकशाहीचा हा घातच ना, पानसरे,दाभोलकर, कलबुर्गी पाटोपाट गौरी लंकेश अजून ही यादी कितीवर जाणार आणि किती जण यास समर्थन करत देशातील स्वतंत्राचा अधिकार नष्ट करणार,एका व्यक्तीची लेखणीची ताखत इतकी भयंकर की त्यास समाना करण्यास थेट मृत्यूच्या सानिध्यात जावे लागते,हत्येची समर्थन करणाऱ्यांनी एकदा इतिहास जरूर तपासावा,कारण समाजाचा इतिहास विसरणारा व्यक्ती आपला अस्तित्व कधीच निर्माण करू शकत नाही असे डॉ. बाबासाहेब म्हणायचे,आणि हा इतिहास साक्षीला आहे आज पर्यंत खर बोलणाऱ्या,लेखणाऱ्या विचारवंताना बंदुकीच्या धाकीची सन्मान व हत्येने पुरस्कार.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.