काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, July 14, 2013

पिंज-यातून बिबट पळाला…

पिंज-यातून बिबट पळाला…

चंद्रपूर- मोहुर्ली येथील वन विभागाच्या पिंज-यातील जेरबंद बिबट रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वनाधिका-यच्या हातावर तुरी देऊन पळाला. या घटनेमुळे वनाधिका-यात चांगलीच खळबळ माजली. या बिबट्याला शोधण्यासाठी जंगल पिंजून काढावा लागला. वन परीषेत्र अधिकारी राऊतकर, इको-
प्रो चे अध्यक्ष, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी शोध मोहीम राबउन या बिबट्याला पकडले. दीड वर्षापूर्वी सोमनाथ येथून जेरबंद करण्यात आलेला हा बिबट असून तो वन विभागाचा पाहुणा म्हणून पाहुणचार घेत आहे.
वनविभागाकडे सध्या यंदाचे चार आणि वर्षभरापूर्वीचा एक, असे एकूण पाच बिबटे असून, दिवसाला 15 किलो मटणाचा खर्च वनविभाग सोसत आहे. 
ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यात दीड महिन्यात 12 जण ठार झाले. वनखात्याने अनुक्रमे 14 एप्रिल, 27 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मोहुर्ली, आगरझरी व मामला, पालेबारसा, माना टेकडी परिसरात पिंजरे लावून चार बिबटे जेरबंद केले. यातील तीन बिबट्यांना मोहुर्ली येथे तर, एक बिबट रामबाग नर्सरीत जेरबंद करून ठेवण्यात आला आहे. दीड महिन्यापासून चार बिबटे जेरबंद असून, पाहुणे बनून वनखात्याचा पाहुणचार घेत आहेत. याशिवाय वर्षभरापूर्वी सोमनाथ येथून आणलेला एक बिबट वनविभागाच्या दावणीला बांधून आहे. यंदा जेरबंद झालेल्या चारपैकी नेमका कोणता बिबट माणसांवर हल्ले करणारा आहे, याची शहानिशा न झाल्याने त्यांना जंगलात सोडण्यात आलेले नाही. त्यासाठी उपमुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती चारही जेरबंद बिबट्यांचा अभ्यास करून या संदर्भातील अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस. डब्ल्यू. एच. नकवी यांच्याकडे सादर करणार होती. आतापर्यंत याबाबत समिती सदस्यांच्या तीनदा चंद्रपूर येथे बैठका झाल्या. मात्र, नेमका माणसांवर हल्ले करणारा बिबट कोण, या निर्णयापर्यंत समिती पोहोचली नाही. त्यामुळे चार बिबटे दीड महिन्यापासून पिंजऱ्यात अडकून आहेत. या चारही बिबट्यांना जंगलात सोडण्यापूर्वी मायक्रोचिप व रेडिओ कॉलर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा प्रत्येकी खर्च तीन ते साडेतीन लाख रुपये असल्याने व कॉलर वनखात्याला मिळत नसल्याने बिबटे पिंजऱ्यात अडकून आहेत. एका बिबट्याला दिवसाला तीन किलो मटण लागते. त्यासाठी प्रतिकिलो 338 रुपये दराने मटण खरेदी केले जात असून, पाच बिबट्यांसाठी दररोज पाच हजार 70 रुपयांचा, तर महिन्याला 1 लाख 52 हजार 100 रुपयांचा खर्च मटणावर होत आहे.

Saturday, July 13, 2013

 सदानंद बोरकर यांना  रंगकर्मी पुरस्कार

सदानंद बोरकर यांना रंगकर्मी पुरस्कार

चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Friday, July 12, 2013

किशोर डांगे यांचे हृदयविकाराने निधन

किशोर डांगे यांचे हृदयविकाराने निधन

चंद्रपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किशोर डांगे यांचे शुक्रवारी (ता. १२) हृदयविकाराच्या धक्क्याने राजस्थानातील जयपूर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.
आपल्या मित्र परिवार आणि कुटुंबीयांसह ते राजस्थान दौ-यावर गेले होते. शुक्रवारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना जयपूर येथील एका रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घेतली. यावेळी त्यांच्याजवळ पत्नी जिल्हा परिषद सदस्य चित्रा डांगे व दोन्ही मुल उपस्थित होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचे पार्थिव येथे येण्याची शक्यता आहे.

वीजनिर्मिती कंपनीत नोकरीवर असलेले डांगे यांनी शिवसेनेच्या सामान्य कार्यकत्र्यांपासून आपल्या राजकीय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला सेनेच्या बांधणीत मोलाची भूमिका बजावणाèया श्री. डांगे यांनी नंतर शिवसेनेकडून वरोरा-भद्रावती मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढली होती. या निवडणुकीतील पराभवानंतर ते काही वर्षे राजकारणापासून दूर होते.  त्यानंतर ते काँग्रेसवासी झाले. सध्या ते वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच अनेकांना धक्का बसला. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
हातात बंदूक म्हणजे व्यवस्थेविरुद्धच रोष

हातात बंदूक म्हणजे व्यवस्थेविरुद्धच रोष

विश्लेषण                         

मनिलंबित ग्रामसेवकाने प्रलंबित बिलासाठी अधिकाèयावर बंदूक रोखलीङ्क हे शीर्षक वाचून अनेकांना धक्का बसला. असे का घडले, याविषयी चर्चाही सुरू झाली. मात्र, ज्या अधिकाèयावर ही बंदूक रोखली, त्यांनी हा प्रकार हसण्यावारी नेला. त्याला कारणही तसेच होते. ही बंदूक जत्रेत ङ्कुगे ङ्कोडण्याच्या स्पर्धेतील असल्याचे अधिकाèयास ठाऊक होते. त्यामुळे ग्रामसेवकांचे हे कृत्य त्यांनी मनावर घेतले नाही. मात्र, ज्या कुणी व्यक्तींनी हा प्रकार डोळ्यादेखत बघितला, त्यांच्या हृदयाचे ठोके वाजायला लागले होते.
चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत येणाèया म्हातारदेवी ग्रामपंचायतीत हा ग्रामसेवक कार्यरत होता. सरपंचांविरुद्ध वाद झाल्याने त्याच्यावर बंदूक रोखली होती. तेव्हा सरपंचाच्या तक्रारीवरून अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याला काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. तेव्हापासून तो थकीत बिलासाठी पंचायत समितीत चकरा मारत आहे. मात्र, अधिकाèयांनी त्याला न्याय दिलेला नाही. एरवी सामान्य माणसांना अधिकारी वारंवार चकरा मारायला लावता. काही तरी तांत्रिक चुका काढून काम अडवून ठेवतात. मात्र सामान्य माणसं काही करू शकत नाही. जमेल तेवढी प्रतीक्षा करतात qकवा अधिकाèयांच्या हातावर चार पैसे देऊन आपले काम मार्गी लावतात. मात्र यावेळी हा सामान्य माणूस नव्हता. तोही या व्यवस्थेचाच एक भाग आहे. त्याला अधिकाèयांकडून अडवणूक होत असल्याची कारणे चांगलीच माहित होती. त्यामुळेच त्याचा तोल सुटला. त्यामुळे व्यथित झालेल्या या ग्रामसेवकाने हाती बंदूक घेऊन अधिकाèयांना धकमावून न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला. ग्रामसेवकाला हातात बंदूक घेण्याची वेळ का आली? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मनस्ताप सहन न झाल्याने बंदूक हातात घेऊन (ङ्कूगे ङ्कोडण्याची का असेना) आपल्या वरिष्ठ अधिकाèयांपर्यंत एखादा कर्मचारी पोहचतो, त्या कार्यालयात सामान्य माणसांना किती त्रास सहन करावा लागत असेल. उद्या याच ग्रामसेवकाला खरीखुरी बंदूक मिळाली तर? तो व्यवस्थेविरोधातील आपला राग कशा पद्धतीने व्यक्त करेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे वरकरणी हा प्रकार अगदी क्षुल्लक वाटत असला तरी यामागचे भविष्यातील धोके लक्षात घेणे आवश्यक आहे. यानिमित्ताने शासकीय कार्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाèयांमधील ताणतणावाचेही चित्र समोर आले.

Thursday, July 11, 2013

भरसभागृहात बंदूक रोखली

भरसभागृहात बंदूक रोखली

चंद्रपूर : गेल्या काही वर्षांपासून निलंबित असलेल्या एका ग्रामसेवकाने प्रलंबित बिलांची रक्कम मंजूर करवून घेण्यासाठी चक्क संवर्ग विकास अधिकाèयावर भरसभागृहात बंदूक रोखल्याचा प्रकार घडला. गुरुवारी दुपारी पाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने सभागृहात बैठकीसाठी उपस्थितांत एकच खळबळ माजली.

चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत येणा-या म्हातारदेवी ग्रामपंचायतीतून निलंबित झालेला काळेवार नामक ग्रामसेवक प्रलंबित बिलांच्या रक्कमेला मंजूरी मिळविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत आहे. गतवर्षीच या मागण्यांना घेऊन त्याने उपोषणही केले होते. मात्र, ही रक्कम मंजूर न झाल्याने तो चांगलाच वैतागला आहे.प्रलंबित बिलांची रक्कम मंजूर करवून घेण्यासाठी आज त्याने कहरच केला. चक्क खांद्यावर बंदूक घेऊन तो पंचायत समितीत आला. प्रारंभी त्याने संवर्गविकास अधिकाèयांचे कक्ष गाठले. मात्र, तिथे कुणीही नव्हते. साहेब, शेजारच्या कृषक सभागृहात बैठकीत असल्याचे शिपायाने सांगितले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा सभागृहाकडे वळविला.तिथे पंचायत राज संदर्भात बैठक सुरू होती. अचानक कुणीतरी खांद्यावर बंदूक घेऊन आल्याचे बघून सभागृह उभा झाला. ग्रामसेवकाने सरळ मंचाकडे चाल करून संवर्गविकास अधिकारी हरीश माटे यांच्या डोक्यावर बंदूक लावली.मबिल मंजूर करता है की नही, नही तो बंदूकसे मार दुंगाङ्क अशी ङ्किल्मी डायलॉग त्याने मारली. शिवाय बंदूकीच्या घोड्यावर बोटही ठेवला. खटकन आवाज होताच संवर्गविकास अधिकाèयांच्या चेहèयावर चांगलाच घाम ङ्कुटला, तर सभागृहात उपस्थितांच्या हृदयाचे ठोके वाजू लागले. मग, काहींनी त्याची समजूत काढत बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेची तक्रार करण्यात आलेली नाही.

खांद्यावर बंदूक घेऊन आलेला हा ग्रामसेवक प्रशासकीय भवन, न्यायालयाच्या मार्गाने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने आला. त्यानंतर तो उपविभागीय अधिकाèयांच्या कार्यालयाकडून पंचायत समितीत आला. हा संपूर्ण परिसर पोलिसांच्या देखरेखीत असतानाही तो कुणालाच कसा दिसला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय एखादा व्यक्ती थेट बंदूक घेऊन आल्यानंतरही पोलिस प्रशासन गाठ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ही बंदूक मेल्यात ङ्कुगे ङ्कोडण्याची असून, यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून सोडले होते.

सरपंचावरही रोखली होती बंदूक
म्हातारदेवी येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असताना या महाशयाने येथील सरपंचावर बंदूक रोखली होती. तेव्हा सरपंचाच्या तक्रारीवरून अटकही करण्यात आली होती.
school

school

चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील टोमटा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था दाखविण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. ही परिस्थिती सर्वत्र आहे.

Tuesday, July 09, 2013

shetakri atmahatya

shetakri atmahatya

अमरावती - अंजनगावसुर्जी तालुक्यातील तुरखेड येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी (ता. नऊ) विष पिऊन आत्महत्या केली. विजय आनंद वाघ (वय 50, रा. तुरखेड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. वाघ यांच्याकडे सव्वा एकर शेती आहे. त्यांनी या वर्षी सोयाबीनची पेरणी केली; परंतु पंधरा दिवसांपर्यंत पेरलेले उगवलेच नाही. म्हणून ते चिंतित होते. मंगळवारी (ता. नऊ) दुपारी एक वाजताकुणालाही न सांगता ते घराबाहेर पडले. शेताच्या मार्गावर त्यांनीविष घेतले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे कर्ज त्यांच्यावर थकित होते, असे निकटवर्तींनी सांगितले. कर्ज आणिमुलीचे लग्न या दोन गोष्टींमुळे ते चिंतित राहत होते, असेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले. अंजनगावसुर्जी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.
aniket amate

aniket amate

लोक बिरादरी प्रकल्पात आदिवासी बांधवान करिता नवीन संगणक कक्ष सुरु होतोय. अतिशय दुर्गम भागात हा प्रकल्प असल्याने लाईट-विजेचाप्रचंड प्रॉब्लेम येत असतो. ४० नवीन आणि १० जुने असे एकूण ५० संगणक असणार आहेत. हा संपूर्ण कक्ष सोलरवर (सौर उर्जेवर) चालावाअसे आम्ही ठरवतोय. मित्रांचा सल्ला व मदत हवी आहे.
प्रा. राजेश कात्रटवार याचा अटकपूर्व जामीन मंजूर

प्रा. राजेश कात्रटवार याचा अटकपूर्व जामीन मंजूर

जवान विनोद किरंगे खून प्रकरण 

चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी अभियानातील जवान विनोद किरंगेच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार याचा अटकपूर्व जामीन ऊच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला.
सावली तालुक्याच्या टोकावरील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या एका बिअरबारमध्ये सी-६0 जवान विनोद किरंगे याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना ४ जूनला उजेडात आली. या खूनप्रकरणात बारमध्ये काम करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी असलेला बारमालक तथा गडचिरोली नगरपालिकेचा नगरसेवक प्रा.राजेश कातट्रवार, अँड.संजय भट, जिल्हा परिषदेचा अभियंता प्रकाश शंखदरबार यांचा समावेश आहे. यातील प्रा.राजेश कातट्रवार याच्याविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दंगल, सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, हे विशेष.
मृत सी-६0 पथकातील जवान विनोद किरंगे हा त्याच्या काही सहकार्‍यांसोबत ४ जून रोजी चंद्रपूर-गडचिरोली मार्गालगत वैनगंगेच्या काठावरील प्रा.राजेश कातट्रवार याच्या मालकीच्या सारंग बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. यावेळी अतिमद्यप्राशनामुळे विनोदने उलटी केली. या कारणावरून वेटरसह अन्य कर्मचार्‍यांनी विनोदशी वाद घातला. हा प्रकार एवढय़ावरच थांबला नाही, तर बारमालक प्रा.राजेश कातट्रवार याच्यासह अँड.संजय भट, अभियंता प्रकाश शंखदरबार व अन्य काही साथिदारांनी विनोदला बेदम मारहाण केली. यात विनोदचा मृत्यू झाला. प्रकरण अंगलट येईल म्हणून विनोदचा मृतदेह चंद्रपूर-गडचिरोली मार्गालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाखाली फेकण्यात आला.
वैद्यकीय अहवालात विनोदचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सावली पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून प्रफुल्ल गोहोणे व नीळकंठ सिडाम या दोघांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी प्रा.राजेश कातट्रवार याच्यासह आणखी दोघांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान प्रा.कातट्रवार याच्यासह अन्य दोन आरोपी फरार झाले. त्यांनी  अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ऊच्च न्यायालयात अर्ज केला होता.  नागपूर खंडपीठाने तो  मंजूर केला. 

Monday, July 08, 2013

जवानाची गोळी झाडून आत्महत्या

जवानाची गोळी झाडून आत्महत्या

चंद्रपूर-पाटण या माओवादग्रस्त भागात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
विशाल बबन शेट्टे (वय ३०) हे मरण पावलेल्या जवानाचे नाव आहे. ते एसआरपीएफच्या दौंड येथील कॅम्पमध्ये कार्यरत होते. सुमारे सहा महिन्यांपासून शेट्टे माओवादग्रस्त भागात ड्यूटीवर होते. काही दिवसांपूर्वी ते रजेवर गेले होते. रजेवरून परतल्यानंतर रविवारी कंपनी कमांडर जवानांना सूचना देत होते. त्यावेळी गोळी झाडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यानंतर शेट्टे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून असल्याचे जवानांना दिसले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह सातारा येथे त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला आहे.  

Sunday, July 07, 2013

गडचिरोलीत चकमकीत सहा माओवादी ठार

गडचिरोलीत चकमकीत सहा माओवादी ठार


एटापल्ली तालुक्यातील शिवरी गावाजवळ रविवारी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले.
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शिवरी गावाजवळ रविवारी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. पोलिसांना घटनास्थळावर मोठया प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरुन कार्बाइन रायफल, बारा बोरच्या तीन बंदुका, हॅण्डग्रेनेड आणि इतर शस्त्रसाठा जप्त केला आहे. गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखवी सुरक्षा दलाच्या जवानांची गेल्या तीन दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात शोधमोहिम सुरु होती. पोलिस शिवरी गावाजवळच्या जंगलात पोहोचताच माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिस आणि जवानांनीही लगेचच त्याला प्रत्युत्तर दिले. पोलिस आक्रमक होताच माओवाद्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी नंतर गोळीबार सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, तेथे सहा माओवादी मृत्तावस्थेत आढळले. त्यांच्याजवळ मोठया प्रमाणात शस्त्रसाठा सापडला.

Saturday, July 06, 2013

पसार लुकडी अखेर गवसला

पसार लुकडी अखेर गवसला

चंद्रपूरः पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी फरार झालेला कोळसा माफियांच्या माध्यमातून झालेल्या एका खून प्रकरणातील न्यायाधीन कैदी लुकडी उर्फ धीरेंद्र जयकिसन यादव याला एकोरि मातेच्या मंदिराजवळून अटक करण्यात आली. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . शुक्रवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना हुलकावणी देत धीरेंद्र पळून गेला . २ ८ जुलै २० १ १ रोजी परप्रांतीयांचा मुद्दा, अवैध उत्खननाविरुद्धची मोहीम आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुचना येथील वरोरा-भद्रावती क्षेत्राचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांचा खून करण्यात आला. लुकडी (पप्पू) यादव व सैन्यदलात काम करणारा सचिन यादव यांच्यासह सात ते आठ आरोपींनी सुनियोजितपणे कुचना येथील एका बारसमोर सकाळी दहा वाजताच्या सुमाराला बोलावून श्री. सूर यांच्यावर गोळी झाडून तसेच तलवारीने गंभीर वार करून खून करण्यात आला होता. लुकडी (पप्पू) यादव याला कारागृहात पाठविण्यात आले आहे. 
 कैदी पोलिसांना गुंगारा देत फरार

कैदी पोलिसांना गुंगारा देत फरार

चंद्रपूरः कोळसा माफियांच्या माध्यमातून झालेल्या एका खून प्रकरणातील न्यायाधीन कैदी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी फरार झाला . धीरेंद्र जयकिसन यादव हे या कैद्याचे नाव आहे . त्याच्या विरुद्ध कोर्टात खटला सुरू आहे . प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . शुक्रवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना हुलकावणी देत धीरेंद्र पळून गेला . वरोराजवळील माझरी गावातील नंदू सूर नामक युवकाचा गेल्या वर्षी जूनमध्ये कोळसा माफियांनी सुपारी देऊन खून केला होता . याप्रकरणातील धीरेंद्र हा आरोपी आहे .

२ ८ जुलै २० १ १ रोजी  परप्रांतीयांचा मुद्दा, अवैध उत्खननाविरुद्धची मोहीम आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुचना येथील वरोरा-भद्रावती क्षेत्राचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांचा आज खून करण्यात आला. लुकडी (पप्पू) यादव व सैन्यदलात काम करणारा सचिन यादव यांच्यासह सात ते आठ आरोपींनी सुनियोजितपणे कुचना येथील एका बारसमोर सकाळी दहा वाजताच्या सुमाराला बोलावून श्री. सूर यांच्यावर गोळी झाडून तसेच तलवारीने गंभीर वार करून खून करण्यात आला. यानंतर संतप्त जमावाने सुमारे बारा ट्रक जाळले, तर चाळीसहून अधिक दुकानांची नासधूस केली.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर हे मूळचे वणी तालुक्‍यातील झोला येथील रहिवासी आहेत. सध्या ते माजरी येथे राहत होते. दीड ते दोन वर्षांपासून त्यांनी अवैध व्यावसायिकांविरुद्ध मोहीम उघडली होती. परप्रांतीयांच्या मुद्द्यासोबतच त्यांनी अवैध उत्खननाचे मुद्देही लावून धरले होते. माहितीच्या अधिकाराचा वापर करून काही व्यावसायिकांचे त्यांनी पितळही उघडे पाडले होते. अशाच एका प्रकरणावरून लुकडी यादव आणि नंदू सूर यांच्यात वैमनस्य झाले. लुकडी यादव हा वाहतुकीचा व्यवसाय करायचा. त्याने आपल्याला धमक्‍या दिल्याचे सूर यांनी यापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती; मात्र पोलिसांनी यादववर कुठलीही कारवाई केली नाही.
गुरुवारी (ता. 28) सकाळी सव्वादहाच्या सुमारास लुकडी यादव याने कुचना येथील पाम वाइनबारसमोर बोलायचे असल्याचे निमित्त करून सूर यांना बोलावून घेतले. सूर यांनीही काळजी घेत भाऊ हरी सूर, साळा उमेश बोढेकर आणि रितेश मेश्राम यांना सोबत घेतले. बारजवळ पोचताच लुकडी यादव याने नंदू सूर यांच्यासोबत वाद घातला. यादवसोबत त्यावेळी सचिन यादव, फिरोज कय्यामुद्दीन आणि अन्य पाचजण होते. वाद सुरू असतानाच डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच सचिन यादव याने नंदू सूर यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर लुकडी यादव याने तलवारीने डोक्‍यावर, हातावर आणि पोटावर वार केले. नंदू सूर लागलीच जमिनीवर कोसळले. बचाव करणाऱ्या उमेश बोढेकर यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. श्री. सूर ठार झाल्याची खात्री पटल्यावर लुकडी यादव, सचिन यादव आणि अन्य पाच ते सहा आरोपी चारचाकी वाहनाने पसार झाले. आरोपींपैकी सचिन यादव हा सैन्यात कार्यरत असल्याचे वृत्त आहे.
घटनेचे वृत्त कळताच नागरिक रस्त्यावर आले. वरोरा, भद्रावती, चंद्रपूर आणि वणी तालुक्‍यातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्तेही घटनास्थळाकडे निघाले. घटनेनंतर पंधरा ते वीस मिनिटांनी कुचना गावाची स्थिती हाताबाहेर गेली. वर्दळीचा वणी-वरोरा मार्ग रोखून धरण्यात आला. थांबलेल्या सुमारे बारा ट्रकला आग लावण्यात आली. छोट्या-मोठ्या सुमारे 40 हून अधिक दुकानांतील सामान बाहेर काढून जाळण्यात आले, तसेच नासधूस करण्यात आली. माजरी कॉलरीची एक स्कूलबसही जाळण्यात आली. जवळच असलेल्या शुभम बारमधील सर्व वस्तूंची तोडफोडही करण्यात आली. माहिती मिळाल्यांनतर वरोरा, भद्रावती पोलिसांसह पोलिस अधीक्षक सुवेज हक अतिरिक्‍त कुमक घेऊन घटनास्थळी पोचले. हा सर्व ताफा पोचेपर्यंत माजरी ठाण्याचे रणधीर मेश्राम हेसुद्धा जखमी झाले होते.
घटना घडल्यानंतर पोलिसांची कुमक पोचण्यास दीड ते दोन तास लागले. पोलिस पोचल्यानंतर संतप्त नागरिक आणि मनसेनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात दगडफेकही झाली. गर्दी आवरत नाही, हे लक्षात येताच पोलिसांनी बंदुकीची एक फैरीही झाडल्याचेही वृत्त आहे. पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. गर्दी पांगविल्यानंतर नंदू सूर यांचा मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनीही तेथे गर्दी केली. येथे झालेल्या धक्काबुकीत वरोरा येथील पोलिस उपनिरीक्षक येरमे यांचे पिस्तूल हिसकण्याचा प्रयत्न झाला. आजच्या घटनेत दोन पोलिसांसह उमेश बोढेकरही जखमी झाले. नंदू सूर यांच्या खुनानंतर काही वेळात नंदोरी येथून आरोपींनी वापरलेले वाहन जप्त केल्याचे वृत्त आहे. एमएच-34-9052 या क्रमाकांची सुमो ही लुकडी यादव याचीच असून, सुमोत रक्‍तही आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिलेला नव्हता.


चंद्रपूर जिल्हयात खाण माफियांचं वाढतं वर्चस्व कोळसा व्यवसायाला धोका निर्माण करणारं आहे. गेल्या काही दिवसात कोल माफीयांनी चार लोकांचा खून केला आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या घुग्गुसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षाची भर दिवसा तलवारीने हत्या करण्यात आली. कारण होतं. कोळशाच्या व्यवसायातलं शत्रुत्वाचं. हे कोळसा माफिया बेकायदेशीर तस्करी तर करतातच पण त्यांच्या कारनाम्यांमुळे गुन्हेगारीही वाढलीय.
चंद्रपूर जिल्ह्यात 40 हजारांच्या वर अंडरग्राउंड आणि ओपनकास्ट खाणी आहेत. खाणीतला कोळसा नेताना यावर कोळसामाफियांची करडी नजर असते. या व्यवसायात अनेक गँग सक्रिय आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढलीय. लाखांची दलाली आणि प्रशासनाचं पाठबळ यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा माफियांनी उच्छाद मांडला आहे. या कोळसा माफियांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने सीआयएसएफसारखी यंत्रणा लावावी, अशी मागणीही झाली. पण सरकारनं त्याकडे फारसं गांभिर्याने बघितलं नाही. जो अधिकारी अशा माफियांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवतो त्या अधिकार्‍याची बदली करण्यात येते. त्यामुळे माफिया आणि प्रशासन यांचे साटेलोटे तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झालीय. चंद्रपूरमध्ये कोळसा खाणींवरुन होणार्‍या हिंसेचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलंय. एक नजर टाकूया या गँगवॉरवर…
- हाजी सरवर आणि तिरुपती पॉल यांच्यातलं गँगवॉर नेहमीचंच- 2011 : कोल माफिया सत्याचा खून- 2011 : मनसे शहर अध्यक्ष नंदू सूर याचा खून – 6 महिन्यांपूर्वी घुग्गुस शहरात हाजी सरवरवर गोळीबार – 6 गोळ्या लागूनही हाजी सरवर बचावला- 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष तिरुपती पॉल याचा खून
सिंधुदुर्गात कळणेमध्ये 600 कोटींपेक्षाही जास्त बेकायदा मायनिंगतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे मायनिंगने लाखो टन बेकायदा लोहखनिज काढल्याचं निष्पन्न होऊन तब्बल सहा महिने झाले तरी अद्याप या मायनिंग कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही . नागपूर आणि कोल्हापूर खनिकर्म विभागाने नव्याने केलेल्या संयुक्त तपासणीत या मायनिंगमधून तब्बल 9 लाख टन बेकायदा लोहखनिजाचं बेकायदा उत्खनन झाल्याची माहिती आयबीन्एन लोकमतच्या हाती लागलीय. सुमारे 600 कोटीपेंक्षाही अधिकचा हा घोटाळा आहे. शिवाय सरकारचा कोट्यवधींचा महसूलही बुडाला आहे. मात्र राजकीय वरदहस्तामुळेच हे सगळं प्रकरण झाकलं जात असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे.