काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 27, 2018

51st Engineers Day celebrated at RCERT Chandrapur.

51st Engineers Day celebrated at RCERT Chandrapur.

The  51st Engineers day was celebrated with fervor and enthusiasm at the Rajiv Gandhi College of Engineering, Research and Technology ,Chandrapur on  15th September 2018.The function was organized by the Institution of Engineers (I), Chandrapur Local centre in association with Rajiv Gandhi College of Engineering, Research and Technology at the Chotubhai Patel Auditorium .
            The Programme was inaugurated at the hands of Dr.Z.J.Khan, Principal Rajiv Gandhi College of Engineering, Research and Technology, Chandrapur. Dr.Vinod S. Gorantiwar, Chairman, Institution of Engineers (I) Chandrapur Centre and Dean I.I.I. Cell ,RCERT presided the function. Prof.R.K.Krishna Hon. Secretary, Institution of Engineers (I) Chandrapur Centre, Er.Pramod Singh, Head Enterprise Architecture Centre of Excellence, Persistent Systems Ltd., Nagpur and Er.R.S.Divahi, Scientist F, DRDL, Hyderabad were present on the dias. The theme for this year’s programme was “Digital Transformation: A new Industrial Revolution”. The Guests Er.Pramod Singh was welcomed by Dr.D.V.Bhope, Dean IQAC and Past Chairman IE(I)CLC. Er.R.S.Dinvahi was welcomed by Er.P.S.Kularni ,Dean (Academics) and past Secretary IE(I) Chandrapur Local centre.
            At the outset, two of the teachers of the college, Prof.N.B.Warbhe and Prof.Parag Dhankar were felicitated at the hands of Dr.Z.J.Khan, Principal, RCERT. Prof.N.B.Warbhe has been recently elected to the Grievance Redreessal committee of Gondwana University and Prof.Parag Dhankar was elected to the Management Council.
            On the occasion, an annual Technical Magazine launched by the students of the Mechanical Engineering Department “Tech Era “was released.
            In his address Dr.Z.J.Khan, and Chief Guest of the Function, made the Staff and students aware of the importance of Engineers Day. He reminded the audience the various contributions of Dr. Viswerayyaa and his contribution in the Civil Engineering in India. He also gave an insight into the field of industrial revolution that is taking place in India and the transformation that is taking place due to digital transformation and the impact this will have on the Engineering fields and the Engineering education. He discussed the positive effects of Internet of things, machine learning and artificial intelligence and the vast amount of data that is being made available to researchers, and scientists due this digital transformation. Dr.Z.J.Khan was felicitated on this occasion at the hands of Dr.Vinod Gorantiwar, president of the function.
Dr.Vinod Gorantiwar, Chairman of the Institution of Engineers, Chandrapur Centre described how the IE (I) Chandrapur from a humble beginning in the year 2009 has evolved into a large organization with more than 350 members. He informed the audience regarding the completion of the first floor of the IE(I) building and the progress of the second floor. He remembered and thanked Hon. Hansraj Ahir, State Minister for Home, Government of India for his contribution and encouragement for the completion of the first phase of the Building. He also informed about the various programmes being conducted by IE(I).
                In his welcome address, Prof.R.K.Krishna,Honarary Secretary, Institution of Engineers, Chandrapur Local centre described the evolution of the first, second ,third and Fourth  Industrial Revolution the progress made because of the availability of genetic advances as well as biological realm which involves sensors, Internet of Things, Block Chain and Distributed Ledgers, 3D Printing, autonomous vehicles like  drones.               
              The Guest of Honor for the Function was Er.Pramod Kumar Singh, Head Enterprise Architecture Centre of Excellence, Persistent Systems Ltd. and the alumnus of RCERT in the year 1995. He presented in details how the Industry 4.0 is focused on creating intelligent products, processes and procedures that leads to ubiquitous connectivity of people, things and machines. He discussed the vision of Industry 4.0 that is likely to be adopted worldwide and its influence other initiatives and cooperative efforts. He also discussed nine key technological components that progressively make up the foundation of Industry 4.0: Autonomous robots, big data, augmented reality (AR), additive manufacturing, cloud computing, cyber security, IoT, system integration, and simulation.
                            
                  The Key note speaker for the Function was Dr.R.S.Dinvahi, Scientist F, DRDL, Hyderabad and also the alumnus of RCERT of 2000 batch. In his keynote address he discussed at length the progress made by the country as the industrial revolution progressed. He discussed the Digital Platform and how Industry 4.0 is being applied with three mutually interconnected factors that include digitization and integration of any simple to complex technical – commercial relation, digitization of products and service offers and new market models. According to Dr.Dinvahi all these human activities are interconnected through state of the art communication system, which include Internet of Things, Internet of Services and Internet of People.
               He also discussed the three principal approaches in Industrial 4.0 concept that included horizontal integration, vertical integration and integrated digital engineering and also how the integrated digital engineering enables the collection and exchange of production data throughout the entire chain involved in product development and leads to reduction of large amount of production data accumulated throughout the life cycle.
Both the guests were felicitated at the hands of DR.Z.J.Khan, Principal, RCERT Chandrapur.  The meet ended with vote of Thanks by Prof.R.K.Krishna, Honorary Secretary IE(I) Chandrapur Local centre  followed by National Anthem.


I:\IE (I)\2018 - Engineers Day\Engineers day Photos\press.jpg
आहारात फळांचे महत्व

आहारात फळांचे महत्व

    राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख      

दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आपल्या आहारात फळांचे महत्व सांगणारा लेख ...




आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन - प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते. त्यायोगे अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता,मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत.

आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. सर्दी कमी करण्यास 'क' जीवनसत्व उपयुक्त ठरते. 'क' जीवनसत्वामुळे'स्कर्व्हो' सारखा रोग होत नाही.

फळात जीवनसत्वे, आम्ले आणि संप्लवनशील तेले (व्होलाटाईल ऑईल्स) असतात. संप्लवनशील तेलामुळे भूक चांगली लागण्यास मदत होते. आंबा, कलिंगड, चेरी आणि अन्य काही फळात 'बीटा कॅरॉटीन' नावाचे द्रव्य असते. आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. फळात 10 ते 15 टक्के मिनरल्स म्हणजेच खजिनद्रव्ये म्हणजेच धातू, अधातू, क्षार असतात. या खजिनद्रव्यात सोडीयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, गंधक, फॉस्फरस, लोह, तांबे या धातू मूलद्रव्याचा समावेश होतो. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते. दातांचे आरोग्य चांगले राहते. रक्तात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास माणसे चिडक्या स्वभावाची बनतात. मॅग्नेशियम मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीचा उत्साह मंदावतो. माणसास थकवा जाणवतो. रक्तातील सोडियम अन्नपचनाला मदत करते. पोटॅशियममुळे जखमांच्या वेळी रक्त थिजण्याच्या (क्लॉटिंग) क्रियेला मदत होते. थिजण्याच्या सक्षम क्रियेमुळे रक्तस्त्राव जास्त होत नाही. पोटॅशियम यकृताला उत्तेजीत करते. आयोडीनमुळे कंठस्थ ग्रंथीचे आरोग्य चांगले राहते. त्यायोगे थायरॉईड ग्रंथीच्या संबंधित विकार जडू शकत नाहीत. सर्वसमावेषक संतुलीत आहारामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा, मोसमी किंवा बिगरमोसमी,त्याचबरोबर बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, चारोळी, इ. ड्रायफ्रुटसचा समावेश असणे आगत्याचे आहे.



विविध फळांमध्ये केळी, डाळिंब, अंजीर, करवंदे, जांभूळ, चिकू, सीताफळ, रामफळ, संत्री, मोसंबी, द्राक्षे, फणस, बोरे, अननस इत्यादी अनेक प्रकारची फळे समाविष्ट होतात. ज्या आहारात फळांचा समावेश अधिक त्या आहाराला संरक्षक आहार म्हणून संबोधले जाते.

महागडा आहार म्हणजे 'सत्वयुक्त' आहार किंवा सफरचंदसारख्या महागड्या फळांचे सेवन म्हणजेच अधिक सत्वयुक्त आहार हा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे. खरे पाहता सफरचंद, बदाम, आक्रोड हे फळांचे प्रकार सकृतदर्शनी महागडे वाटत असले तरी त्यांच्यातील पोषण मूल्यांचा विचार केला आणि त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या शक्तीचा विचार केल्यास ती खऱ्या अर्थाने महागडी नाहीत. दुसरा मुद्दा हा की केळी, पेरू, पपई, चिकू, बोरे, संत्री, मोसंबी, सीताफळ,करवंदे, जांभळे ही उच्च दर्जाची पोषणमुल्ये असणारी, अत्यंत स्वस्त अशी फळे आहेत. नित्यनियमाने त्यांचे सेवन करण्यास काय हरकत आहे ?

नारळ :- कफ, वात, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे वरदानच आहे. नारळातील खोबरे आणि नारळ पाणी या दोहोत प्रथिने आहेत, कार्बोहाड्रेट्स आहेत. तेलाच्या स्वरूपात स्निग्धांश आहे, क्षार आहेत, जीवनसत्वे आहेत, अनेक प्रकारची खनिजद्रव्ये आहेत. आजारपणात डॉक्टर नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ म्हणजे सर्व प्रकारच्या पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोल आहार आहे.

सफरचंद :- सफरचंद संधिवातावर उत्तम आहे. सफरचंद सेवनाने डोकेदुखी कमी होते. नैराश्य आले असल्यास तेही कमी होते. सफरचंद शरीराची ताकद व रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. सफरचंदामुळे शौचाच्या तक्रारी कमी होतात व पचनशक्ती सुधारते.

द्राक्षे :- आयुर्वेदात द्राक्ष फळाला उच्च स्थान आहे. पिकलेली द्राक्षे चवीला मधुर असतात. ती तहान भागवू शकतात. द्राक्षांमुळे पित्तदोष कमी होतो. द्राक्षे खाल्यानी थकवा कमी होतो. एक महत्वाचा सल्ला हा की द्राक्षावर कीटकनाशकांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे द्राक्षे ही दोन - तीन वेळा स्वच्छ धुवून खावीत हे अधिक महत्वाचे.

केळी :- केळी सर्व ऋतूत उपलब्ध होतात. केळ्यामध्ये ७० टक्के पाणी, ०.८ टक्के खनिज द्रव्ये, ०.४ टक्के तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. केळात कॅल्शियम,लोह, फॉस्फरस असतात. कॅल्शियममुळे हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते. केळातील साखर पचनास सुलभ असल्याने थकलेल्या शरीराला चटकन शक्ती प्राप्त होऊन उत्साह वाढतो. पचनसंस्थेचे आरोग्य टिकविण्यासाठी, मलविसर्जनची क्रिया सुलभ होण्यासाठी केळी फारच मोलाची ठरतात. केळी शक्तिवर्धक असल्यामुळे बालकांना शक्ती वाढविण्यासाठी ती टॉनिकच्या स्वरूपात उपयोगी पडतात. अधिक वाढलेले पित्त केळाने कमी होते. मलावरोध, आतड्याची जळजळ, मूळव्याध, डायरीया, संधिवात इ. अनेक रोगांवर केळ्याचा आहार फायद्याचा ठरतो. केळात लोह असते.

डाळींब :- डाळिंबात ग्लुकोजसारखी चटकन पचणारी साखर असते. डाळिंब दाण्यातील रस रक्तवर्धक असून त्याचा लॅक्टींग एजंट म्हणून म्हणजेच मातेला दूध वाढविण्यासाठी उपयोग होतो. डाळींबाच्या सेवनाने हगवण आमांश, मुळव्याध, जठर विकार बरे होतात. डाळिंब सालीचा रसही औषधी गुणधर्माचा असून त्याचा जंतूनाशक म्हणून आणि त्वचारोगावर चांगला उपयोग होतो. डाळिंब जठराग्नी प्रदिप्त करते. त्यामुळे भूक चांगली लागते. डाळिंब पित्तनाशक असल्यामुळे पित्ताच्या तक्रारीवर उत्तम ठरते. डाळिंबाने वातदोषाचे शमन होते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. डाळिंबाने मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होण्यास मदत होते.

पपई :- पपई हे शरीराची ताकद वाढविणारे फळ आहे. पपई मूळव्याधीवर गुणकारी सिद्ध झाली आहे. मूत्रपिंडाचे विकार कमी करण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या रसामुळे आम्लपित्त कमी होते. जठराला आलेली सूज कमी होते. पपईच्या सेवनाने अन्नपचन सुलभ होते. पपईने मांसाहाराच्या पचनास सुलभता प्राप्त होते. पपईच्या बियांचे चूर्ण व मध यांचे मिश्रण जंतुनाशक आणि कृमिनाशक म्हणून उपयोगी पडते.

अन्य फळे:- पेरू कफवर्धक परंतु मलप्रवृत्ती साफ करण्यास उपयुक्त. अंजीर पित्तशामक असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. आंबा वीर्यवर्धक असून शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. लिंबे, संत्री, मोसंबी या फळात 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. 'क' जीवनसत्व अन्नपचन कार्यास प्रभावी ठरते. व्यायाम केल्यानंतर घाम येतो व शरीराचे निर्जलीकरण होते. या फळांनी म्हणजेच त्यांच्या रसांनी शरीरातील कमी झालेल्या जलाशयाची भरपाई होऊन शरीरातील 'जलसंतुलन' कायम राखले जाते. बदाम प्रथिनयुक्त असून बुद्धिवर्धक आहे. बदामामुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.

जांभूळ कफ व पित्तनाशक आहे. हे फळ विशेष करून मधुमेही व्यक्तिंना अधिक पथ्यकारक आहे. कलिंगड उन्हाळ्यातील मोसमी फळ आहे. कलिंगड, टरबूज, खरबूज,काकडी ही उन्हाळ्यात उत्पादीत होणारी फळे आहेत. निसर्ग कल्पक आहे. उन्हाळ्यात उन्हामुळे आणि अधिक उष्णतेमुळे प्राणीमात्राच्या शरीरातील घामाच्या स्वरूपात मोठा जलक्षय होतो. या फळात पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्याचे काम ही फळे करतात. या फळातील पाणी शुद्ध असून रक्त शुद्धीकरणाचे काम ती चांगल्या प्रकारे करतात. या फळातील साखर लवकर सहजरित्या पचणारी असल्यामुळे त्यांचा चांगला उपयोग होतो. कफ प्रकृतीच्या आणि ज्यांना वारंवार सर्दी, पडसे, खोकला होतो, त्यांनी शक्यतो ही फळी खाऊ नयेत.

फळे हि मानवी जीवनाला लाभलेले 'वरदान' आहे. 'फलाहार' हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वानी का बरे बाळगू नये?

- प्रा. वसंतराव बंडोबा काळे
सेवानिवृत्त उपप्राचार्य
जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
उघड्यावर शौचालयाला गेला अन.. गमवावा लागला जीव

उघड्यावर शौचालयाला गेला अन.. गमवावा लागला जीव

बिबिट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे.जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मुरपार येथील एका ८ वर्षाचा मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.मात्र हि घटना काही वेगळ्या कारणाने घडल्याचे समोर येत आहे.साहिल सालोरकर वय 8 वर्षे असे बिबट्याने ठार केलेल्या बालकाचे नाव आहे.हा मुलगा सकाळी आई पाठोपाठ उघड्यावर शौचालयाला गेला असता त्याचेवर दबा घरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.बिबट्याने झडप घातली व त्याला खेचत जंगलात नेले. आरडाओरडा केल्या नंतर संपूर्ण गाव गोळा झाला व जंगलात साहिल चा शोध घेतला असता तो मृत अवस्थेत आढळून आला. 
महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्रात २०१२मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
घडलेल्या या प्रकारावरून शासनाच्या योजना घराघरात कितपत पोहोचल्या आहेत याचा प्रत्यय समोर येत आहे.
गणपतीच्या मूर्तीचे JCB लाऊन केले तुकडे अन..

गणपतीच्या मूर्तीचे JCB लाऊन केले तुकडे अन..

गणपतीच्या मूर्तीचे JCB च्या माद्यमातून केले तुकडे-तुकडे  ;डम्पर मध्ये नेऊन मुर्त्या तिथे फेकल्या जिथे गावभरचा कचरा होतो जमा. 

ह्या बातमीचा विडीओ तुमच्या परियंत पोहचविण्याचा उद्देश कोणाच्या धार्मिक भावनांना  ठेस पोहचविणे हा नसून मातीच्या गणपतीची स्थापना आणि घरीच केलेलं विसर्जनाचे महत्व हे सांगणे आहे  
अहमदाबाद:


आजपासून घरघुती वापरातल्या १९ वस्तूंच्या किमती वाढल्या

आजपासून घरघुती वापरातल्या १९ वस्तूंच्या किमती वाढल्या

एसी, फ्रीज,वाॅशिंग मशिनसह 19 वस्तू महागणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
बघा कोणत्या आहेत त्या वस्तू 

काव्यशिल्प/ऑनलाईन:
केंद्र सरकार मुख्य सीमा शुल्क वाढवून शुल्क मर्यादा केली आहे. 
एकूण 19 वस्तूंवर अबकारी वाढवलाय असं मंत्रालयाने स्पष्ट केलं.
एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन (10 किलो पेक्षा कमी) वर अबकारी कर 20 टक्काने वाढवलाय. हे दर 26-27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.





तसंच कम्प्रेसर, स्पीकर आणि बुटांवरही अबकारी करवा क्रमश: 10, 15 आणि 25 टक्क्यांनी वाढवलाय.

रेडियल कार टायर वर 10 वरून 15 टक्के कर वाढवलाय. पॉलिश केलेले, सेमी प्रोसेस्ड आणि प्रयोगशाळेत तयार केलेले खडे यावर 5 वर 7.5 टक्के कर वाढवण्यात आलाय.

ज्वेलरी, सोनं, चांदीची भांड्यांवर 15 वरून 20 टक्के कर वाढवण्यात आला.

तसंच बाथरूमची उत्पादन पॅकिंग साहित्य, किचनच्या वस्तू, ऑफिस स्टेशनरी, सजावट करणाऱ्या शीट, बांगड्या, ट्रंक, सुटकेस आणि प्रवासी बॅकवर 10 ऐवजी 15 टक्के कर वाढवलाय.

तसंच सरकारने विमानाच्या इंधनावरही 5 टक्के कर वाढवलाय. आधी यावर कोणताही कर नव्हता. 
केंद्र सरकारने जेट इंधन, एअर कंडीशनर आणि रेफ्रिजरेटरसह 19 वस्तूंवर आयात कर वाढवला आहे.






आधार कार्ड का सही उपयोग कहा करणा है ,पढे पुरी खबर

आधार कार्ड का सही उपयोग कहा करणा है ,पढे पुरी खबर


आधार कार्ड पर सुप्रीम कोर्ट ने सुनाया ये फैसला

सुप्रीम कोर्ट ने आधार की वैधता पर अपना फैसला सुना दिया है। शीर्ष अदालत ने कुछ शर्तों के साथ आधार को संवैधानिक रूप से वैध बताया है। कोर्ट ने यह भी कहा है कि सरकार ने अपना होमवर्क पूरा नहीं किया। मोबाइल और बैंक अकाउंट से आधार को लिंक करना गैर-संवैधानिक है। मोबाइल और बैंक अकाउंट के लिए आधार जरूरी नहीं है। शर्तों के साथ आधार को केंद्र की योजना आधार को मान्यता देते हुए कोर्ट ने कहा कि इससे निजता के अधिकार का हनन नहीं होता।


 नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन दीड महिना नागपुरात

नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन दीड महिना नागपुरात

नागराजच्या 'झुंड'साठी बिग बी दीड महिना नागपुरातनागपूर/ऑनलाईन काव्यशिल्प: 
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या आगामी सिनेमाच्या शूटिंगला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना विदर्भात तळ ठोकणार आहेत.

या सिनेमाचं 40 ते 45 दिवसांचं शूटिंग नागपुरात होणार आहे. नागपूरच्या सेंट जॉन शाळेच्या आवारात ह्या सिनेमाचा सेट उभारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना नागपुरात राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
'ठग्ज ऑफ हिंदुस्थान', कौन बनेगा करोडपती यासारखे प्रोजेक्ट संपल्यानंतर बिग बीनं आपल्या तारखा 'झुंड' सिनेमासाठी दिल्या आहेत.



चित्रपटाचा सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून हटवल्यानंतर चित्रीकरण लांबणीवर पडलं होतं. त्यानंतर तारखांचा घोळ झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी सिनेमा सोडलाही होता. मात्र अखेर बिग बी पुन्हा सिनेमात काम करण्यास राजी झाले.(स्रोत:ABP )

 महावितरणतर्फ़े पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

महावितरणतर्फ़े पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरण नागपूर परीमंडळच्या विद्युत भवन प्रशासकीय इमारत येथे महावितरण आणि महानिर्मितीच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार (दि.25 सप्टेबर) रोजी त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. 
यावेळी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता (टि आय सी) शांताराम पौनीकर, महावितरणचे महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री.शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, तसेच महावितरण कार्यालयातील पुरुष व महिला अधिकारी/कर्मचारी तसेच महानिर्मितीचे महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सविता झरारीया, अधीक्षक अभियंता विजय बारंगे, श्रीराम बोरकर, कार्यकारी अभियंता सलीला कामत कार्यकारी अभियंता, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ संजय बोकडे यांचेसमवेत नागपूर कोल कार्यालयातील पुरुष व महिला अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोवर व रुबेला उच्चाटनासाठी मनपातर्फे नोव्‍हेंबरमध्ये लसीकरण मोहीम

गोवर व रुबेला उच्चाटनासाठी मनपातर्फे नोव्‍हेंबरमध्ये लसीकरण मोहीम

३० ठिकाणी मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण
नागपूर/प्रतिनिधी:
गोवर व रुबेला या रोगांच्या उच्चाटनासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार येत्या नोव्‍हेंबर महिन्यापासून नागपूर महानगरपालिकेच्यावतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत शहरातील महानगरपालिकेच्या शाळांसह सरकारी व खासगी शाळा तसेच ९ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना एम.आर. लस देण्यात येणार आहे. 
या मोहिमेसाठी शहरातील शिक्षण विभागातील यू.आर.सी.१ (प्राथमिक) व यू.आर.सी.२ (माध्यमिक) शाळा केंद्रांमध्ये आणि महानगरपालिका शिक्षण विभाग अशा एकूण ३० ठिकाणी मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाला शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते. आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्‍हाणे, जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. साजिद खान, नोडल अधिकारी डॉ. सुनील घुरडे, डॉ. नंदकिशोर राठी, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार, समन्वयक दिपाली नागरे यांच्यासह दहाही झोनचे वैद्यकीय अधिकारी लसीकरण मोहिमेच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.

 डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणीचा वेळ वाढवून घ्या

डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणीचा वेळ वाढवून घ्या

आरोग्य सभापती मनोज चापले यांचे निर्देश : धंतोली झोनमध्ये आढावा बैठक 

नागपूर/प्रतिनिधी:
 शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यादृष्टीने झोनमधील प्रत्येक प्रभागात फवारणीवर विशेष लक्ष द्या. प्रत्येक भागांमध्ये फवारणी गाडी पोहोचावी याकडे लक्ष देऊन फवारणीचा वेळही वाढवून घ्या, असे असे निर्देश मनपा आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले. 
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत बुधवारी (ता. २६) धंतोली झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते, नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका लता काटगाये, सहायक आयुक्त स्मिता काळे, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी यांच्यासह झोनमधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 
बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी धंतोली झोनअंतर्गत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घेतली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा व ज्या घरी लारवी आढळली त्या घरी पुन्हा ती वाढू नये यासाठी विशेष काळजी घ्या, असेही निर्देश त्यांनी दिले. मनपातर्फे वॉर्डावॉर्डात वेळोवेळी फवारणी होते अथवा नाही, यावर लक्ष द्या. वार्डांमध्ये २०-२० दिवसांनी फवारणी करा व त्यासंबंधी प्रभागातील नगरसेवकांना दोन दिवसांपूर्वी माहिती देण्यात यावी. या सर्व प्रक्रियेचा अहवाल प्रत्येक आठवड्याला आरोग्य समिती सभापती व झोनचे सहायक आयुक्त यांना सादर करा, असेही सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले. 
‘मोबाईल व्हॅन’ आजपासून सुरू 
डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये भीती असून त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेतर्फे ‘मोबाईल व्हॅन’ बुधवार (ता. २६) सुरू करण्यात आली आहे. या ‘मोबाईल व्हॅन’च्या माध्यमातून शहरातील चौकाचौकांसह शाळांमध्ये चित्रफित दाखवून डेंग्यूची विस्तृत माहिती व त्यापासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी यावेळी सांगतिले. याशिवाय डेंग्यूच्या लारवीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमूने झोनमधील शाळांसह इतर भागातही जनजागृती करावी, असेही त्यांनी निर्देश दिले. 
बाभूळखेडा रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करा 
बाभुळखेडा होमिओपॅथी रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. नागरिकांना उत्तम आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रुग्णालयाची नव्याने निर्मिती होणे आवश्यक आहे. बाभूळखेडा होमिओपॅथी रुग्णालय इमारतीच्या बांधकामाची फाईल तयार करून त्या संबंधीचा प्रस्ताव सादर करा, असेही निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीच्या जागेवर अद्ययावत इमारत उभारण्यात येणार असून यासंबंधीही प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
सेंट्रल बाजार रोडवर ‘पौर्णिमा दिवसा’निमित्त जनजागृती

सेंट्रल बाजार रोडवर ‘पौर्णिमा दिवसा’निमित्त जनजागृती

मनपा-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम : अनावश्यक वीज दिवे एक तासासाठी केले बंद 

नागपूर/प्रतिनिधी:
 ऊर्जा बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. पोर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. असाच काहीसा अनुभव मंगळवारी (ता. २५) पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने आला. 
नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक २५ सप्टेंबर रोजी रामदासपेठ परिसरातील सेंट्रल बाजार मार्गावरील कल्पना बिल्डिंग चौकात जनजागृतीसाठी पूर्वी केलेल्या आवाहनाप्रमाणे रात्री ८ वाजता पोहचले. नेहमीप्रमाणे जनजागृतीसाठी आणि पोर्णिमा दिवस उपक्रम तसेच ऊर्जा बचतीचे सांगण्यासाठी जेव्हा ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक व्यापारी प्रतिष्ठानात जाऊ लागले तेव्हा त्यांनी या उपक्रमाविषयी कल्पना असल्याचे सांगितले. आम्ही स्वयंप्रेरणेने अनावश्यक वीज उपकरणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक पोर्णिमा दिवसाला आम्ही किमान एक तास वीज उपकरणे बंद ठेवू, असे आश्वासन स्वयंसेवकांना दिले. 
विशेष म्हणजे, यावेळी पौर्णिमा दिवसाला नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने परिसरातील पथदिवेही एक तासाकरिता बंद केले होते. यावेळी मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल यांच्या नेतृत्वात मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी वीज बचतीविषयी जनजागृती केली. 
स्वयंसेवकांनी यावेळी परिसरातील व्यापारी प्रतिष्ठान, रुग्णालये, तसेच घराघरांत जाऊन वीज बचतीचे महत्त्व सांगितले. पौर्णिमा दिवस या उपक्रमाबद्दल माहिती दिली. पौर्णिमेची रात्र ही उजेडी रात्र असते. चंद्राचा प्रकाश भरपूर असतो. हे निमित्त साधून आपल्या परिसरातील दिवे किमान एक तास बंद ठेवले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होते, असे सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो यूनीट विजेची बचत झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये नागपुरातील या उपक्रमाचा उल्लेख केल्याची माहिती स्वयंसेवकांनी व्यापारी आणि नागरिकांना दिली. स्वयंसेवकांच्या आवाहनाला दाद देत व्यापाऱ्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानातील अनावश्यक वीज दिवे रात्री ८ ते ९ या कालावधीत बंद ठेवले. 
या उपक्रमात मनपाचे सहायक अभियंता अजय मानकर, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, राजेंद्र राठोड, सचिन फाटे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, विष्णुदेव यादव, दादाराव मोहोड, सौरभ अंबादे व मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपान देणार पैसा

नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपान देणार पैसा

‘जिका’च्या प्रमुखांची प्रतिनिधी मंडळासह मनपाला भेट 
नोव्हेंबरमध्ये सुरू होणार सर्वेक्षण 
नागपूर/प्रतिनिधी:
 ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा’ला जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसहाय्य करणार आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प अहवाल आणि प्रकल्पातील अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी ‘जिका’ प्रमुख आणि चमू नागपुरात आली असून बुधवारी (ता. २६) आयुक्त सभा कक्ष प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन येथे महापौर नंदा जिचकार, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो (Katsuo Matsumoto), जिकाचे भारतातील चीफ डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट एम.पी. सिंग (M.P. Singh), जिकाच्या प्रोग्राम स्पेशालिस्ट काओरी होंडा (Ms. Kaori Honda), जिकाच्या ओजेटी हारुका कोयामा (Ms. Haruka Koyama) यांच्यासह मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, एनईएसएलचे संचालक डॉ. रिजवान सिद्दिकी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, राजेश मोहिते, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. ईसराईल, नगररचना सहसंचालक प्रमोद गावंडे, मुंबई येथील एनजेएसचे संचालक विद्याधर सोनटक्के, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, मनोज गणवीर, राजेश भूतकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, वित्त विभागातील अधिकारी विलास कावळे उपस्थित होते. 

प्रारंभी तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. ईसराईल यांनी नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०३४ पर्यंत नाग नदी सांडपाणीमुक्त होईल, असे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून केंद्र शासनाची अधिकृत वित्तीय संस्था ‘जिका’द्वारे अर्थसहाय्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. 

या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो यांनी प्रकल्प अहवाला काही गोष्टी समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या. या प्रकल्पासाठी सेंट्रल मॉनिटरींग ॲण्ड कंट्रोल सिस्टीम असावी, घनकचरा व्यवस्थापनसंदर्भात काय उपाययोजना आहेत, त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करण्यात येईल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागेची उपलब्धता काय, ह्या संपूर्ण प्रकल्पावर महानगरपालिकेचे नियंत्रण असेल की एनईएसएलचे असेल याची संपूर्ण माहिती प्रकल्प अहवालात नमूद करण्याची सूचना त्यांनी केली. नोव्हेंबर २०१८ पर्यंत सर्वेक्षणासाठी चमूची नियुक्ती करून डिसेंबरमध्ये सर्वेक्षणाचे कार्य सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली. जपानची चमू सर्वेक्षणासाठी येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्वेक्षणानंतर मंजुरीकरिता जपानहून एक स्वतंत्र चमू येईल. त्यांच्या मंजुरीनंतर जपान सरकारची अंतिम मंजुरी मिळेल. अंतिम मंजुरीनंतर अर्थसहाय्य देण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या होतील. ही सर्व प्रक्रिया फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो यांनी दिली. 

यावर बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, सध्या नागपुरात उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा संपूर्ण देशातील पथदर्शी प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर नागनदीच्या तीरावर असे चार प्रकल्प उभारून नाग नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ह्या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पुढील नियोजनाच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया लवकर आटोपून जिकाने जानेवारी २०१९ पर्यंत अर्थसहाय्य करारावर स्वाक्षऱ्या कराव्यात, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. 
प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रकल्पाला गती प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून नागपूरची वाहिनी असलेले नाग नदीचे चित्र यामुळे बदलेल. जिकानेसुद्धा आवश्यक ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती त्यांनी केली. 
तत्पूर्वी जिकाच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी तुळशीचे रोपटे देऊन केले. महापौर नंदा जिचकार यांचेही त्यांनी स्वागत केले. नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या प्रकल्पाचीही माहिती दिली. बैठकीला सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, गणेश राठोड, हरिश राऊत, राजेश कराडे, सुवर्णा दखणे, स्मिता काळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 
केंद्राला ६० आणि राज्याला २५ टक्के 
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला ‘जिका’ ८५ टक्के अर्थसहाय्य करणार आहे. त्यापैकी केंद्र सरकारला ६० टक्के आणि राज्य सरकारला २५ टक्के अर्थसहाय्य करेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून ने नागपूर महानगरपालिकेला देण्यात येईल. १५ टक्के वाटा हा नागपूर महानगरपालिकेचा असेल. 
प्रस्तावित एसटीपी च्या जागांना भेट 
नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रस्तावित एसटीपी प्रकल्पाच्या जागांना ‘जिका’चे प्रतिनिधी मंडळाने भेट दिली. सर्वप्रथम नाग नदीचे उगमस्थान असलेल्या अंबाझरी ओव्हरफ्लो प्वाईंटला भेट दिली. त्यानंतर सीताबर्डी, संगम चाळ येथील प्रस्तावित जागांना भेटी दिल्या. 


Wednesday, September 26, 2018

महावितरणच्या वसुली पथकावर एकाच दिवशी दोन ठिकाणी जीवघेणे हल्ले

महावितरणच्या वसुली पथकावर एकाच दिवशी दोन ठिकाणी जीवघेणे हल्ले



नागपूर/प्रतिनिधी:-
महावितरणच्या वसुली पथकावर राज्यातील एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्यात आले. वीजबिलाची वसुली करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी गेले असताना थकबाकीदारांनी हे कृत्य केले.पहिली घटना वर्धा तर दुसरी घटना भंडारा येथे घडली आहे.
थकबाकीदाराच्या घरी महावितरणची वसुली पथक गेले असता थकबाकीदारांनी महावितरणच्या वसूल पथकावर हल्ला केला यात महावितरण डी सी 2 वर्धा शहर चे लाईनमन श्री दीपक जत्रे वय 35 याना वीज बिल वसुली करत असताना शिंदे मेघे येथे वीज ग्राहकाकडून जीव घेणा हल्ला चढवत जबर मारहाण केली तर भंडारा येथील संदीप मंगरे व कार्तिक भोयर हे दोन्ही महावितरणचे कर्मचारी थकबाकीची रक्कमेबाबद विचारपूस करण्यासाठी गेले असता अमर प्रभाकर लांजेवार व प्रभाकर महादेव लांजेवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला,या हल्यात वितरणचे कर्मचारी गंभीर रित्या जखमी झाले ,त्यांना तत्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
या दोन्ही घटना झाल्याची तक्रार महावितरणने संबंधित हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये केली असून त्यांच्यावर कलम 353,कलम 332, कलम 333,कलम 506,कलम 326,कलम 504, कलम 34, अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
वारंवार महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.