काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 12, 2014

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी


चंद्रपूर दि.12- जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे आज जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून पाहणी केली. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णसेवा व नवीन इमारत याविषयीची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधला.
जिल्हाधिका-यांनी महिला वार्ड, शिशु वार्ड, सामान्य वार्ड, बर्न वार्ड, नेत्र विभाग, स्वयंपाक गृह, भांडार गृह, सिटी स्कॅन, आयसीयू व नवीन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयाकरीता नवीन सिटी स्कॅन मशीन तसेच एक्सरे मशीनची मागणी करावी अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. रुग्णालयातील लिफ्ट त्वरीत कार्यान्वित करावी व स्वच्छतेविषयी विशेष काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप

जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप

चंद्रपूर : जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली.
सभापतींच्या खातेवाटपामध्ये देवराव भोंगळे यांना बांधकाम, तसेच शिक्षण खाते मिळाले आहे. ईश्वर मेश्राम यांना आरोग्य खाते देण्यात आले आहे. उपाध्यक्ष कल्पना बोरकर कृषी सभापतिपद देण्यात आले आहे. तर नीलकंठ कोरांगे यांना समाजकल्याणचा भार देण्यात आला आहे. सविता कुडे यांना महिला बालकल्याण खाते मिळाले आहे.
समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. माजी पदाधिकाऱ्यांपैकी संदीप गड्डमवार यांची जलव्यवस्थाप समिती सदस्य, संतोष कुमरे यांची अर्थ समिती, गुणवंतराव कारेकर शिक्षण समिती, अमृता सूर यांची बांधकाम समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.
पीक बंदोबस्तासाठी वाघाची विष्ठा

पीक बंदोबस्तासाठी वाघाची विष्ठा

नागपूर   : डुकरांच्या हैदोसापासून आपले पीक व शेत वाचविण्यासाठी व त्याच्या बंदोबस्तासाठी वेलतूर व परिसरातील शेतकरी सध्या वाघाची विष्ठा मिळविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. या विष्टेसाठी शेतकरी जंगल पालथे घालत असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.
जंगलातल्या वाघाची विष्ठा आणायची. शेताच्या चारही बाजूला शिवरात ठिकठिकाणी थोडी थोडी टाकायची आणि डुकरांच्या हैदोसापासून मुक्त व्हायचे. हा उपाय केल्यास डुकरे कित्येक दिवस नव्हे, तर महिनोमहिने शेताकडे फिरकत नाहीत, असा अजब सल्ला कुणीतरी शेतकऱ्यांना दिला. तेव्हापासून शेतकऱ्यांनी वाघाच्या विष्ठेचा शोध सुरू केला आहे.
जंगली डुकरांच्या बंदोबस्तासाठी परिसरातील बहुतेक शेतकरी दरवर्षी जिवाचे रान करत असतो. दिवस-रात्र जागल करतात. फटाके फोडणे, धूर करणे, आग लावणे, नाही ते आवाज करणे, विषारी पदार्थ मांडून त्याची फवारणी करणे, कुंपण घालणे, कुंपणातून वीजप्रवाह सोडण्यासारखे जिवघेणे व अमानवीय प्रयोगही केले जातात. परंतु, डुकरे नुकसान करतातच. मात्र, यावर्षी शेत बचावासाठी शेतकऱ्यांनी वेगळाच प्रयोग सुरू केला आहे. परिसर जंगलव्याप्त असून, जंगलात जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. वाघाचेही वास्तव्य असल्याने जंगलात जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका होऊ शकतो.
अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांच्या ऑनलाईन माहिती प्रणालीचे उदघाटन

अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांच्या ऑनलाईन माहिती प्रणालीचे उदघाटन

अल्पसंख्याक संस्थांची प्रवेशप्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

मुंबई, दि. 11 : राज्यातील भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांची प्रवेशप्रक्रिया आणि कारभार आता अधिक पारदर्शक होणार असून यासाठी mddtrust.mahaonline.gov.in या अद्ययावत वेबपोर्टलचा आज मंत्रालयात राज्याचे महसूल तथा अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज श्री. खडसे यांच्या दालनात हा कार्यक्रम झाला.

Sunday, November 09, 2014

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

  • हंसराज  अहिर
  • जन्म ११ नोव्हेंबर, १९५४
  • नांदेड, महाराष्ट्र
  • कार्यकाळ
  • इ.स. २००४ – इ.स. २००९
  • मतदारसंघ  - चंद्रपूर
  • राजकीय पक्ष - भारतीय जनता पक्ष
  • पत्नी - लता हंसराज अहिर
  • अपत्ये - २ मुलगे
  • निवास - चंद्रपूर, महाराष्ट्र

  • कोण आहेत …

Saturday, November 08, 2014

नवी उमेद

नवी उमेद

वादळ, अतिवृष्टी, गारपीट निसर्गातील सर्व संकटे झेलत आयुष्य जगणा-या शेतक-याच्या बैल गाडीची चाके मात्र थांबत नाहीत. पुन्हा नवी उमेद घेऊन शेताकडे निघालेली गाडी । छायाचित्र देवानंद साखरकर, चंद्रपूर  

Friday, November 07, 2014

Thursday, November 06, 2014

महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी

महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी

केरळ आणि गुजरातच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी, अशी मागणी पर्यावरण व निसर्ग संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली. संस्थेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.

दारूच्या आहारी गेल्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्थ झाले. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी आपण चर्चेलाही तयार असल्याचे संस्थेने मुख्यमंत्र्यांना कळविले. शिष्टमंडळात सचिव मधुकर सुरवाडे, राजेश सोनटक्के, जितेन वासनिक, विजय मेश्राम, के. टी. तिवाडे, डी. यू. इंदूरकर, प्रदीप हजारे, मनोज फुलपाटील, संजय मानकर आदींचा समावेश होता.
पेट्रोलिंगसाठी दोन गॅंगमन पाठविणार

पेट्रोलिंगसाठी दोन गॅंगमन पाठविणार

रेल रोकोच्या आंदोलनाची घेतली दखल

वरोरा
 - मध्य रेल्वेच्या वरोरा विभागात नाइट पेट्रोलिंगसाठी एक गॅंगमन पाठविणार असल्याचे सांगताच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दोन गॅंगमन पाठविण्याचा निर्णय घेतला. 

Wednesday, November 05, 2014

14 ते 19 नोव्हेंबर स्वच्छ भारत विशेष अभियान

14 ते 19 नोव्हेंबर स्वच्छ भारत विशेष अभियान

जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर

चंद्रपूर दि.05- केंद्र व राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान प्राधान्याने राबविण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयात 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान स्वच्छ भारत विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. ते विविध विभागाच्या खाते प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हाधिकारी दामोधर नान्हे, पंकज चौबळ व विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
वनरक्षक भरती प्र्रक्रीया रद्द करा - बंडु धोतरे

वनरक्षक भरती प्र्रक्रीया रद्द करा - बंडु धोतरे

वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे मागणी - 
वनरक्षक पदाकरिता 12 विज्ञान गणीतसह उत्तीर्ण अटीचा विरोध


चंद्रपूरः चंद्रपूर सह इतरही जिल्हयात वनविभागातील वनरक्षक पदाकरिता भरती प्रकीया सुरू आहे. वनरक्षक पदाकरिता शैक्षणीक पात्रता 12 विज्ञान गणीत विषयासह उत्तीर्ण होण्याची अट घातली गेली आहे. ही शैक्षणीक अट मागे घेण्यात यावी व सुरू असलेली भरती प्रक्रीया रद्द करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी राज्याचे वनमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातुन केली आहे.
एक महिन्यात दारूबंदी- सुधीर मुनगंटीवार

एक महिन्यात दारूबंदी- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर-  जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय इथल्या महिलांनी घेतला आहे. 816 ग्रामपंचायतींपैकी 600 ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा ठराव घेतला आहे. त्यामुळं दारुबंदी करण्याला माझं प्राधान्य राहिल, एक महिन्यात दारूबंदी झालेली दिसेल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र टोलमुक्त करू, अशी निवडणुकीपूर्वी घोषणा करणाऱ्या भाजपनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भूमिका बदलल्याचा आरोप ेकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला. या प्रश्‍नावर पत्रकारांनी छेडले असता, मुनगंटीवारांनी केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी राज्यात ठिकठिकाणी टोल उभारण्यात आले आहेत. यात सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे. जे टोल कंत्राटदारांच्या भल्यासाठी उभारलेत, ते निश्‍चितपणे बंद केले जातील, असे प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Tuesday, November 04, 2014

दक्षिण आफ्रिकेमध्ये रक्षा खडसे यांचे भाषण

दक्षिण आफ्रिकेमध्ये रक्षा खडसे यांचे भाषण

मंबाथो दि. 4 : राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्येरावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी "भारतीयलोकशाही आणि सुशासन" या विषयावर आपले विचार मांडले.
याअधिवेशनाची सुरुवात काल दि. 2 नोव्हेंबर, 2014 रोजी दक्षिण आफ्रिकेच्यावायव्य प्रांताच्या "मंबाथो" येथील विधिमंडळ सभागृहात झाली. यावेळीवायव्य प्रांताच्या विधिमंडळाच्या अध्यक्षा सुसाना रिबेका तसेच विविधराष्ट्रकुल देशांच्या संसद तसेच विधिमंडळातून आलेले युवा संसद तसेचविधिमंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांनी"भारतीय लोकशाही व सुशासन" या विषयावर आपले विचार मांडतानाजगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील संसद सदस्य तसेच विधिमंडळसदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासदस्यांची निवड प्रक्रिया यावर सविस्तर विवेचन केले. भारतीय राज्यघटनेप्रमाणे भारतासारख्या मोठ्या व खंडप्राय देशामध्ये सुशासनराहण्यासाठी राजकीय व्यवस्था, कार्यकारी व प्रशासकीय व्यवस्था,न्यायपालिका व प्रसिध्दी माध्यमांची भूमिका कशी महत्वाची आहे, याबाबतविस्तृतपणे माहिती दिली. केंद्र आणि राज्य यांच्यामधील संबंध तसेचकायदा करण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थितांना संबोधित केले. भारतामध्येपंचायती राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणिग्रामपंचायत या त्रिस्तरीय रचनेमधील राजकीय पक्षांची व प्रशासनाचीभूमिकेचे महत्व विशद केले. भारतातील राजकीय व प्रशासकीयव्यवस्थेमध्ये सुशासन आणण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्यासुधारणांबाबतही आपले मत व्यक्त केले.
rakshatai.jpg प्रदर्शित करत आहे