সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 04, 2016

दोषींना फाशी

युग चांडक अपहरण आणि हत्येप्रकरणी

नागपूर : नागपुरातील युग चांडक या 8 वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने, आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना दोषी मानत दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

शहरातील एका 8 वर्षीय युग चांडक असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती.  
एक सप्टेंबर 2014 रोजी युगचे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि आपल्या राहत्या गुरुवंदन अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बेग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला.
इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले.
ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे काल संध्याकाळ पासूनच नागपूर पोलिसांचे अनेक पथक नागपूर आणि आजू बाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होते.
या घटनेनंतर सर्वत्र नाकेबंदीही करण्यात आली होती, मात्र तरीही युगचा शोध लागू शकला नाही. त्यानतंर काल संध्याकाळी नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर लोणखैरी गावाजवळ एका निर्जनस्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला. अपहरणाची घटना समोर आल्यापासूनच पोलिसांनी अनेक संशयितांना पकडून चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

राजेश डावरे आणि अरविंद सिंग अशी या दोघांची नावं आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात अकाऊंटटण्ट म्हणून कामाला होता. मात्र त्याने अकाऊंट्समध्ये काही घोळ केल्याने काही दिवसांपूर्वी त्याला डॉ. चांडक यांनी कामावरून काढले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने युगचे अपहरण केले.

नागपूरातील हत्या आणि अपहरणाच्या घटना-
  1. आदित्य पारेख- 2003 साली वर्मा ले-आऊट परिसरातून अपहरण
  2. हरेकृष्णा ठकराल- 2004 साली इतवारी भागातून अपहरण
  3. कुश कटारिया- 2011 साली छापरू नगर भागातून अपहरण
  4. यश बोरकर- 2012 साली खापरी परिसरातून अपहरण

शिक्षा?
*लहान मुलाचे अपहरण केल्याने फाशी
*अपहरण करून हत्या – फाशी
*अपहरण-हत्येचा कट – जन्मठेप
*पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न – 7 वर्षांची शिक्षा
*दोन्ही आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा


न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण

  • जरी पहिलाच गुन्हा असला, तरी हा गुन्हा अपघाताने नाही. आरोपींनी अत्यंत शांत डोक्याने, विचारपूर्वक केलेलं हे क्रूर कृत्य आहे.
  • फक्त वय कमी आहे म्हणून दोषींना मोकळं सोडणे चुकीचं आहे. त्यामुळे या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही.
  • दोषींनी 8 वर्षाचा बालक जो स्वसंरक्षण करण्यास असमर्थ होता, अशा युगचं अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या केली. त्यामुळे हा गुन्हा माफ करण्यासारखा अजिबात नाही.
  • आरोपींचं कृत्य पाहता, पालक वर्गात भयभीतता आहे. त्यामुळेच आरोपींना जरब बसण्यासाठी दोषींना कठोर शासन आवश्यक आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.