সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 04, 2010

मस्की दाम्पत्य बेड्या घालून निघाले नागपूरला

Tuesday, May 04, 2010 AT 12:30 AM (IST)

चंद्रपूर - वेगळ्या विदर्भासाठी लढा देणाऱ्या शोभा मस्की व बाबाराव मस्की यांनी हातापायात बेड्या घालून नागपूरपर्यंतच्या पदयात्रेस सुरवात केली असून, त्यांचे आज (ता. तीन) शहरात आगमन झाले. त्यांनी राजुरा येथून एक मेपासून पदयात्रा सुरू केली आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी देशप्रेमी संघटनेच्या माध्यमातून मस्की दाम्पत्याने वेळोवेळी विविध आंदोलने पुकारून शासनाचे लक्ष वेधले आहे. शोभा मस्की यांनी राजुरा येथे टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा देत प्रशासनाच्या नाकीनऊ आणले होते. त्यानंतर विदर्भ बंदमध्ये बसची तोडफोड केली. विदर्भाच्या मागणीसाठी लढताना त्यांच्यावर आजपर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रदिनाचा निषेध करीत या दाम्पत्याने एक मेपासून विदर्भ पदयात्रा राजुरा ते नागपूर असे आंदोलन सुरू केले आहे. दोन तारखेला बल्लारपूर पार केल्यानंतर आज (ता. तीन) दुपारी त्यांचे चंद्रपुरात आगमन झाले. महाकाली मंदिरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर शहरात प्रवेश केला. रस्त्यावरील नागरिकांना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची पत्रके वाटली. उद्या (ता. चार) भद्रावती येथे पोचणार असून, त्यानंतर वरोरा, खांबाडा, समुद्रपूर, हिंगणघाट, अलिपूर, वर्धा, सेलू, सिंदी, बुटीबोरी, हिंगणा, साईमंदिर नागपूर, गणेश मंदिर आणि 17 मे रोजी ताजबाग नागपूर येथे समारोप होईल

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.