সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 26, 2010

प्रखर उन्हामुळे शेतजमिनीला पावसाची तहान

सकाळ वृत्तसेवा
Monday, May 24, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: agriculture, rain, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - गतवर्षी अपुऱ्या पावसामुळे शेतीहंगाम बुडाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी पुन्हा एकदा नव्या खरीप हंगामाकरिता कंबर कसू लागला आहे. यंदाच्या प्रखर उन्हामुळे शेतजमिनीला पावसाची तहान लागली आहे. मे महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी प्रतीक्षेतच आहे.

मागील वर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व हंगामाला सुरवात झाली होती. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीकामे वेळेत सुरू झालीत. मात्र, हंगामाच्या मध्यकाळात पावसाने दगा दिला. अनेक दिवस पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे कोरडा दुष्काळाचा फटका बसला. त्याचाच परिणाम हिवाळा आणि यंदाच्या उन्हाळ्यात बसला. विहिरी खोल खोल गेल्या. तलाव, नाले आणि नद्याही आटल्या. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उद्‌भवली आहे. यंदाचा उन्हाळा चांगलाच तापत आहे. त्यामुळे शेतीतील जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. या मातीला आता पावसाची तहान लागलेली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी खरीपपूर्व कामाला लागले आहेत. शेतातील कचऱ्याची साफसफाई, अनावश्‍यक वाळलेल्या गवतीझाडांची कापणी आणि पाळ्यांना आग लागून शेतजमीन व्यवस्थित केली जात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत शेणखत टाकण्याची कामे केली जातात. बैलबंडीच्या माध्यमातून शेतात शेणखत टाकण्यात येत आहे. खरिपाच्या हंगामासाठी कृषी क्षेत्रही सज्ज झाला आहे. रासायनिक खते, बियाण्यांचा पुरवठा होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी चांगल्या प्रतीच्या धान्याचे बियाणे साठवून ठेवत असतात.

देवाणघेवाणीच्या माध्यमातून बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांत होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत उद्‌भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन काही ठिकाणी घरांची व्यवस्था, बैलाचे गोठे तयार करण्यात येत आहे. बैलाचा चाराही योग्य ठिकाणी साठवून ठेवण्यात येत आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे खचलेला शेतकरी यंदा नव्या उमेदीने खरिपाच्या तयारीला लागला आहे. आता प्रतीक्षा आहे ती केवळ पावसाची.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.