সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 17, 2010

भाववाढीने लस्सीही महागली

चंद्रपूर - दूध आणि साखरेच्या भाववाढीमुळे सकाळच्या चहाची चव कडू झाल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेच्या दाहकतेला कमी करण्यासाठी मागणी असलेली लस्सीही महागली आहे. साखर 40 रुपये किलो, तर दूध 30 रुपये लिटर झाल्याने लस्सीचा ग्लास 20 रुपयांपर्यंत पोचला आहे.

मकरसंक्रांत संपली आणि सूर्याची तप्त किरणे आग ओकू लागली आहेत. रंगपंचमीपासून त्याची तीव्रता आणखीनच वाढू लागली आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांत रोजगार मिळविणारी शहरातील शीतपेयांची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा महागाईचा फटका बसत आहे. यंदा साखर आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर आभाळाला पोचले आहेत. त्यामुळे त्यापासून तयार होणारी थंड आणि गरम पेय महागली आहेत. चहाच्या कपाचे दर चार ते सहा रुपयांपर्यंत गेल्यानंतर अनेकांची जीभ कडू झाली. आता उन्हाळ्याच्या दिवसांत ही रक्कम थंडपेयांच्या माध्यमातून वसूल होणार आहे. चंद्रपूर शहरात गांधी चौक, श्रीकृष्ण टॉकीज, जटपुरा गेट येथील लस्सी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील दर ग्लासाच्या आकारानुसार वेगवेगळे आहेत. गांधी चौकात 10 आणि 15 रुपये ग्लास, श्रीकृष्ण टॉकीजसमोर 20 ते 25 रुपये, तर जटपुरा गेट परिसरात 12 ते 18 रुपये ग्लास असे दर आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत पाच रुपयांनी भाववाढ झालेली दिसून येते. दुधाची वाढती टंचाई आणि भाववाढीमुळे दही महागले आहे. शिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढत आहेत. याशिवाय बर्फाच्या किमती वाढत आहेत. बर्फाची एक लादी 300 रुपयांची असल्याने एका तुकड्याची किंमत 30 रुपये मोजावी लागत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.