ठाणे येथील विजयराज बोधनकर यांनी गेल्या सहा वर्षांपासून चित्रांच्या दुनियेत रममान झाले असून, त्यांनी ठिकठिकाणी प्रदर्शन भरविले आहे. ५० हून अधिक नामवंत समाजसुधारक, साहित्यिकांचे स्वभाव विनोदी ढंगातून ङ्कांडलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हातात एक झोपडी आहे. तिच्याकडे निरक्षर करीत ते गावाची रचना साहित्यातून मानडताना दिसतात. बहिणाबाई चौधरी घरात चुलीजवळ बसून तव्यावर पोळी शेकत आहेत. त्याचवेळी त्यांचा दुसरा हात काव्यरचनेत व्यस्त आहे. या चित्रातून ग्रामीण भागातील एक निरक्षर महिलाही साहित्यात किती प्राबल्य आहे, हे दिसून येते. पू.ल. देशपांडे यांचे चित्र बघून हसूच येते. डोक्यावर पुस्तक. त्यात एका पानावर फुलाचे चित्र, 'देश' हा शब्द, दुसर्या पानावर एक पान आणि इंग्रजीत 'डे' अशी संकल्पना पुलंचा विनोदीस्वभाव सांगितलेला आहे. माधव गडकरी यांच्या हातात एक लेखनीरुपी पिचकारी असून, त्यातून फवारा निघत आहे. महात्मा फुले यांचे चित्र परिवर्तनवादी विचार सांगून जाते. फुलेच्या हातात लेखणी असून, तिच्या टोकावर ब्राह्मणवादी विचारांचा पगडा असलेला व्यक्ती दूर द्गेकताना दिसतो. या चित्रात ब्राह्मणवादी साहित्यांची द्गेकद्गाक झालेली आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या हाती दुःखी आणि सुखी अशी दोन मुखवटे आहेत. यातून रसिकांच्या भावना समजून घेणारा साहित्यिक दृष्टीस पडतो. चि. वि. जोशींच्या हातात एक विदूषक आहे. त्याचा हात चि. विं. च्या गालावर गुदगुल्या करीत आहे. लिखाणाची जादू गालावर हसू आणते, असा बोध होतो. आचार्य अत्रेंच्या हाती काटेरी पेन आहे. यावरून अत्रे रोखठोक विचारांचे होते, हे सांगायचे आहे. साने गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू पडत आहेत. मात्र, ते पुस्तकावर पडताच द्गूले झाल्याचे दिसतात. परागकणातून हळवं मन असलेला हा साहित्यिक होतो, हेच या चित्रकाराला सांगायचे आहे.
घरात टीव्ही नाही. पण, साडेचार लाखांची पुस्तके आहेत. ते सर्व वाचले. साहित्यिकांच्या स्वभावाचा अनुभव शेअर करण्यासाठी व्यंगचित्रांची ही कल्पना आहे. सहा वर्षांपासून चांगला प्रतिसाद असून, जुन्या साहित्यिकांचे नवे विचार सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
- विजयराज बोधनकर, चित्रकार.