काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 21, 2010

सिनेजगातातिल चेहरे आणि मी

सिनेजगातातिल चेहरे आणि मी

 आस्करवारी - हरिशचंद्राची फाक्टोरी चे नायक नंदू माधव आणि अभिनेता मिलिंद गवली सोबत सकाळ परिवार
 आस्करवारी - हरिशचंद्राची फाक्टोरी चे नायक नंदू माधव आणि अभिनेता मिलिंद गवली आणि मी
 आस्करवारी - हरिशचंद्राची फाक्टोरी चे नायक नंदू माधव आणि अभिनेता मिलिंद गवली सोबत चर्चा करताना देवनाथ.
 हिंदी मराठी चित्रपटातील आघाडीच्या कलावंत रीमा लागु सोबत देवनाथ
                                                                            देवनाथ
                                            संगीतकार अशोक पत्की सोबत मी
अभिनेता मिलिंद गवली सोबत एक प्रसंग

Saturday, October 16, 2010

"हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी'

"हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी'

कथानकाला न्याय देणारी मंडळी "स्टार'


सकाळ वृत्तसेवा

Saturday, October 16, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: chandrapur, vidarbha
चंद्रपूर - चित्रपट दोनच प्रकारचे असतात, एक अभ्यासू आणि बिगरअभ्यासू. क्‍लास आणि मास या दोघांनाही "हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' तेवढाच आवडला. कारण, कार्य-कारण भावाने येणारी रंगसंगती यात जुळून आलेली होती. "स्टार'वगैरे ही संकल्पना मान्य नाही. कथानकाला न्याय देणारी मंडळी ही खरी "स्टार' असतात. यात पडद्यावरचे आणि पडद्यामागचे दोघेही आलेत, अशी प्रांजळ कबुली सिनेअभिनेता नंदू माधव यांनी दिली.
युनिसेफच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सिनेअभिनेते नंदू माधव आणि मिलिंद गवळी आज (ता. 15) चंद्रपुरात आले होते. त्यांनी "सकाळ' विभागीय कार्यालयाला भेट देऊन "सकाळ संवाद' या कार्यक्रमातून विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
ऑस्करचे भूत भारतीयांच्या मानगुटीवरून एकदाचे उतरले पाहिजे. आपण उगाच या पुरस्काराचा बाऊ करतो. प्रत्येक स्पर्धा वेगळ्या नजरेतून बघितली पाहिजे. "विहीर' चित्रपटाची बर्लिन महोत्सवातील रेड कार्पेटची बातमी गाजली नाही. मराठी चित्रपटांची आता वेगवेगळ्या पातळीवर दखल घेतली जात आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.

Tuesday, October 12, 2010

Friday, October 08, 2010

Wednesday, October 06, 2010

40 दिवसांच्या बालिकेच्या नलिकेत अंगठी!

40 दिवसांच्या बालिकेच्या नलिकेत अंगठी!

चंद्रपूर - घरात बाळ जन्मल्याचा आनंदसोहळा सर्वत्र साजरा होत असताना नामकरण कार्यक्रमात बाळाच्या बोटातील अंगठी तोंडावाटे नलिकेत गेली आणि सर्व आप्तांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. अवघ्या 40 दिवसांच्या चिमुकल्या बालिकेच्या अन्न आणि श्‍वासनलिकेच्या मधोमध अडकलेली सोन्याची अंगठी डॉ. मंगेश गुलवाडे आणि त्यांच्या वैद्यकीय चमूने यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली. सायमा जमीर शेख असे या नुकत्याच नामकरण झालेल्या बालिकेचे नाव आहे.


मूळचे अहेरी येथील रहिवासी जमीर शेख यांच्या पत्नी श्रीमती कैसर शेख यांनी एका गोंडस बालिकेला जन्म दिला. तिच्या नामकरणाचा सोहळा 40 दिवसांनी 21 सप्टेंबर रोजी सिरोंचा येथील नातलग शेख रसूल यांच्या घरी आयोजिला होता. नामकरणानंतर तिच्या आजी-आजोबांनी सायमाला ही सोन्याची अंगठी भेट दिली होती. बोटात घातलेली अंगठी खेळत असताना अचानक तिच्या तोंडात गेली. त्यानंतर ती अन्न आणि श्‍वासनलिकेच्या मधोमध अडकून पडली. दरम्यान सायमाच्या बोटात अंगठी नसल्याचे पाहून आई कैसर शेख घाबरली. सर्वत्र शोधाशोध करीत असतानाच चिमुकल्या सायमाला ठसके येऊ लागले. यावरून अंगठी तिच्या गळ्यात असावी, असा प्राथमिक अंदाज बांधून आलापल्ली येथील रुग्णालयात तिला हलविण्यात आले. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार एक्‍स-रे काढल्यानंतर नलिकेत अंगठी असल्याचे स्पष्टपणे दिसले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 11ला चंद्रपूरला हलविण्यात आले. सर्वप्रथम बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवजी यांच्याकडे तपासणण्यात आले. मध्यरात्रीदरम्यान नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. मंगेश गुलवाडे यांच्याकडे तपासणी करण्यात आली. डॉक्‍टरांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कोणताही वेळ वाया जाऊ न देता एंडोस्कोपी सर्जरीच्या (दुर्बीण) साह्याने अवघ्या दीड तासाच्या शस्त्रक्रियेतून ही अंगठी बाहेर काढली. ही अंगठी वेळीच बाहेर निघाली नसती तर बालिकेच्या जीवाला धोका झाला असता, असे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. मोनिका पिसे, सलिम तुकडी, रितिशा दुधे, सारिका गेडाम यांनी सहकार्य केले.

Sunday, September 26, 2010

पत्रकार संपर्क

पत्रकार संपर्क

बाळ हुनगुंद
9326641177 
प्रमोद काकडे 
9922540074 
अरुण सहाय 
9922919459 
आशिष आंबाडे 
9422891334 
बाळू रामटेके
9403866996
Deven gavande
9822467714
Gajannan tajne
9881156188
Golu barahate
9096923609
Irshad शेख
9860273759
जितेंद्र masharkar
9325242852
महेंद्र ठेम्स्कर
9422838911
मजहर अली
9422137199
मंगेश खाटिक
9011043653
मुकेश वाळके
9421993900
पंकज शर्मा
9823350111
प्रकाश शर्मा
9423117393
प्रमोद उंदिरवाडे
9921009653
प्रशांत देसाई
9423675901
प्रवीण बतकी
9881750655
Prshant devtale
8888828027
रमेश kalepalli
9960033592
संजय रामगीवार
9881717832
रवी जवळे
9850050811
रवी जुनारकर
9423117394
साईनाथ सोनटक्के
8007347925
संजय तायडे
9822237638
सुनील देशपांडे
9822737841
सुनील तायडे
9422140045
सुशांत घाटे
9422131588
Sushli nagrale
9923838961
Yashvant mullemwar
9890331996
विशाल tokekar
9421812456
Govil meharkure
9689988282
निलेश लाइव्ह
9860774567

Monday, September 13, 2010

Monday, August 30, 2010

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या रोगाचे थैमान

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या रोगाचे थैमान

Tags: chandrapur, diseases, vidarbha

Monday, August 30, 2010 AT 12:00 AM (IST)

सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - जिल्ह्यातील नागरिक सध्या साथीच्या रोगाने ग्रासले असून, उपचारासाठी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात मोठ्या संख्येने भरती होत आहेत. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातच औषधांचा तुटवडा आहे. डायरिया प्रतिबंधक औषधे आणि सलाईन नसल्याने रुग्णांना खासगी औषधालयातून खरेदी करावे लागत आहे. शहरातील सर्व खासगी दवाखाने ताप आणि साथीच्या रोगाने हाउसफुल्ल आहेत. शिवाय आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीच्या दवाखान्यात रुग्ण दिसून येत आहेत.
पावसाची उघडीप सुरू असतानाच वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. रस्त्यावरील खड्डे, घरासमोरील घनकचरा आणि नाल्यातील सांडपाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन पावसाळा रोगराईस आमंत्रण देत आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या रोगाचे थैमान असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात उपचार घ्यायला खाट उपलब्ध नाहीत, इतकी गर्दी झाली आहे.
पावसाळा सुरू झाला की, हळूहळू साथीचा रोग पाय पसरू लागतो आणि मलेरिया, ग्रॅस्टो, हगवण, उलटी, कावीळ यांसारखे रोग अख्ख्या कुटुंबाला आपल्या कवेत करतात. त्यामुळे कुटुंबच्या कुटुंबे रुग्णालयात हलविण्याची पाळी येत आहे. चंद्रपूर शहरातही हगवण, उलट्यांचे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. दररोज 300 ते 400 रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. रुग्णालयात 200 ते 300 खाटांची व्यवस्था आहे. मात्र, येथे साडेचारशे रुग्ण भरती झाल्याने उर्वरित रुग्णांना खाली झोपून उपचार घ्यावा लागत आहे.
नागभीड तालुक्‍यातील अनेक गावांत कावीळ रोगाची लागण झाली असून, रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. तालुक्‍यातील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी नवेगाव पांडव, मौशी, बाळापूर, तळोधी, वाढोणा येथे रुग्णालये आहेत. परंतु, मागील अनेक दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची हेडसांळ होत आहे. तालुक्‍यातील मोहाळी, मांगली, कोरंभी आणि अन्य गावात काविळीची लागण झाली आहे.
मूल पावसाने दडी मारल्यानंतर वातावरणात बदल झाला असून, मलेरिया, कावीळ आणि ग्रॅस्टोची साथ पसरत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण हाउसफूल असून, रुग्णांना बाहेरून उपचार घ्यावा लागत आहे. रुग्णांना भरतीसाठी आता जागा उपलब्ध नसल्याने खाली गादी टाकून उपचार घेताना रुग्ण दिसत आहेत. दुसरीकडे स्थानिक रुग्णांना घरूनच ये-जा करून उपचार घ्यावा लागत आहे. शहरात आणि ग्रामीण भागात उघड्यावरच्या घाणीमुळे ही साथ पसरली असून, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी फवारणी केली जात नाही. दूषित पाण्यामुळेही हगवण, उलटी, कॉलरा, ग्रॅस्टोची लागण होत आहे.

मादी डास घातक
गाढ झोप लागते तेव्हा थव्याने येऊन गुणगुणत झोपेचे खोबरे करणाऱ्या मादी डासांमुळे तापाचा संसर्ग पसरतो. "सॅण्डफ्लॉय' माशी चावल्यानंतरच चंडीपुरा मेंदूज्वर होतो. "एडीस इजिप्टाय' ऍनाफेलीस, क्‍यूलेक्‍स डासाची मादी चावल्यानंतर डेंग्यूची शक्‍यता बळावते. फायलेरियामध्ये हीच स्थिती असते.



ताप येण्यास कारणीभूत घटक
-सॅण्डफ्लय
-एडीस इजिप्टाय
-ऍनाफेलीस
-क्‍यूलेक्‍स



जिल्हा सामान्य रुग्णालय

खाटांची संख्या-300


सध्या रुग्ण-340


साथीचे रुग्ण-20


आतापर्यंत मृत्यू-सात


जुलैअखेरपर्यंत चंडीपुरा रोगाचे 133 नोंद झाली होती.



प्रशासनाची बेपर्वाही
ग्रामीण भागात आजही शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे रोगांचा फैलाव प्रामुख्याने होतो. घनकचरा आणि नाल्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. मात्र, तसे काहीही केले जात नाही. आरोग्य यंत्रणेच्या इमारती गावोगावी आहेत. मात्र, औषधांचा साठाच नाही. त्यामुळे गरिबांच्या वाट्याला रोगराईचा सामना कायम आहे.

"पावसाळ्यामुळे डबक्‍यांमध्ये पाणी साचून अळ्या निर्माण होतात. त्याचे रुपांतर डासांमध्ये होते. मागील 15 दिवसांपासून साथीचा आजार दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 20 रुग्ण भरती आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. औषधांचा साठा संपला असून, वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.''


-डॉ. रमेश बांडेबुचे, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

http://www.esakal.com/

लाच प्रकरणातील शल्यचिकित्सकजिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रतिमा रुग्णांच्या गैरसोयीसोबतच आर्थिक गैरव्यवहाराने डागाळलेली आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी डॉ. खुरपे यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. 1990 नंतर डॉ. गोटेफोडे यांना तीन हजार रुपये घेताना, तर 2004 मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमाकांत अणेकर यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथे पकडण्यात आले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी डॉ. रमेश बांडेबुचे हे दोन हजार 800 रुपये घेतल्याप्रकरणी लाचप्रकरणात अडकले आहेत. रुग्णालयाच्या इतिहासात डॉ. स्वामी, डॉ. अय्यर या अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती.

Tuesday, August 24, 2010

तरुणांनी केली 300 कुष्ठरोगीबांधवांची कटिंग-दाढी

तरुणांनी केली 300 कुष्ठरोगीबांधवांची कटिंग-दाढी

Tuesday, August 24, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: social work, youth, malnutirican, chandrapur, vidarbha
सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - साठ वर्षांच्या कालवधीमध्ये आनंदवन येथे बाबा आमटे यांनी कुष्ठरोगीबांधवांना येथे आणले. त्यांना स्वत: केस कापणे, दाढी करून देणे, अंघोळ घालून देत असत. ते त्यांना नवीन कपडे घालून देत असत. तेव्हा त्यांच्याजवळ कोणीही यायला तयार नव्हते. लोकांमध्ये आता सुद्धा काही प्रमाणात गैरसमज आहे. अशातच चंद्रपूर नाभिक समाजातील युवकांनी तेथे जाऊन 300 कुष्ठरोगीबांधवांची कटिंग-दाढी करून दिली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर, सलून असोसिएशन चंद्रपूरतर्फे आनंदवन येथे मोफत कटिंग- दाढीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्‌घाटन साधनाताई आमटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री. प्रभू होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे श्‍याम राजूरकर, मनोज पिंजदुरकर, अशोक गोलगुंडेवार, विलास बडवाईक, दत्तू कडूकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात नगाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश एकवनकर यांनी केले. मान्यवरांच्या मनोगतानंतर रुग्णांच्या कटिंग-दाढी कार्यक्रमाला सुरवात झाली. यात मूकबधीर विद्यालय, अंध विद्यालय, अपंग विद्यालय, संधी शाळा, दवाखाने आदी ठिकाणी विद्यार्थी व रुग्णबांधवांची जवळपास 300 लोकांची कटिंग- दाढी करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अरविंद नक्षिणे, राजू कडवे, राजू कोंडस्कर, रोशन चातके, पांडुरंग, चौधरी, विठ्ठल चौधरी, रवि वानकर, नीलेश चल्लीवार, विजय कोंडस्कर, नानाजी कडूकर, रत्नाकर वानकर, पुरुषोत्तम घुमे, दीपक, चिंतामणी मांडवकर, संतोष अतकरे, मालचंद्र शेंडे, सुनील नक्षणे, दीपक नक्षणे, प्रकाश चांदेकर, सुभाष निंबाळकर यांनी सहकार्य केले.


60 वर्षांत आनंदवनात कटिंग-दाढीचा कार्यक्रम कधीही झाला नाही. चंद्रपूरच्या नाभिक समाजातील युवकांनी येथे येऊन रुग्णबांधवांची कटिंग- दाढीचा कार्यक्रम राबवून खूप मोठे धाडस केले आहे.


- साधनाबाई आमटे, ज्येष्ठ समाजसेविका

Monday, August 23, 2010

चंद्रपुरातील अतिवृष्टिग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई

चंद्रपुरातील अतिवृष्टिग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई

मुख्य पान

ऍग्रो स्पेशल
^^^^^^^^^^^^^^
Sunday, August 22, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: rain, chandrapur

चंद्रपूर - यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टी, वीज आणि अन्य घटनांत १५ लोकांचे बळी गेले असून, २४ जनावरांचा मृत्यू झाला. याशिवाय एक हजार घरांची पडझड झाली असून, अतिवृष्टिग्रस्तांना शासनाच्या वतीने १४ लाखांची नुकसानभरपाई देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील इरई, झरपट, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जुलैअखेरीस तसेच पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा जिल्ह्यात आतापर्यंत पंधरा लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जनावरे मृत्युमुखी पडली. यामध्ये वीज पडून १२ लोकांचा, आगीने एकाचा तर पुरात वाहून गेल्याने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सहा बैल, चार गाई, तीन म्हशी व सात बकऱ्या अशी वीस जनावरे मृत्युमुखी पडली.
वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख असे बारा लाख व पशुपालकांना प्रत्येकी दहा हजार असे आतापर्यंत चौदा लाखांचे वाटप जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत एका व्यक्तीचा व चार बैलांचा मृत्यू झाला. पावसामुळे घरांची पडझड आणि पूल व रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर-बल्लारपूर, चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर- मूल, चंद्रपूर-गडचिरोली या प्रमुख रस्त्यांचीही बरीच हानी झाली आहे.
या वर्षी अतिवृष्टीने सिंदेवाही, चिमूर, बल्लारपूर व चंद्रपूर या चार तालुक्‍यांत घरांची सर्वाधिक पडझड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत ६९७ घरे पूर्णपणे पडली होती. दरम्यान, नुकसानग्रस्तांना विविध योजनेअंतर्गत मदत देता यावी, यासाठी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी अतिवृष्टीचा अहवाल तयार करून नागपूर येथे आयुक्त कार्यालयात पाठविला आहे.



पिकांचे नुकसान पाच टक्के

यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचेही नुकसान झाले आहे; मात्र कृषी विभागाने हे नुकसान अवघे पाचच टक्के असल्याचा अहवाल तयार केल्याने सर्वेक्षणावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. या वर्षी नदीकाठावरील अनेक शेतातील पिके नष्ट झाली. दरम्यान, पिकांवर झालेल्या लष्करी अळी व उंट अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Agrowon - India's First Agro DailyAbout Us

Contact Us

http://www.agrowon.com/
epaper.agrowon.com