সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, April 10, 2010

'वेलकम टू हेवन'च्या मागे दडला भेसूर चेहरा

by Pramod kakade, Repoter(chandrapur)
सुकमा (जि. दंतेवाडा) - चिंतलगुफा घटनास्थळापासून 12 किलोमीटर अंतरावर केंद्रीय राखीव पोलिस दलाचा कॅम्प आहे. या कॅम्पच्या प्रवेशद्वारावरच "वेलकम टू हेवन' असे लिहिलेले आहे. इथून पुढे प्रवेश केल्यानंतर दुर्दैवाने येथील स्वर्गाऐवजी नरकसदृश स्थितीची कल्पना येते. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या या परिसराला नक्षलवादी आणि पोलिसांच्या वास्तव्याने अक्षरश: नरकाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

मंगळवारला चिंतलनारपासून पाच किलोमीटर अंतरावरील मरकानाच्या जंगलात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 76 जवानांचा नक्षलवाद्यांनी बळी घेतला. त्यानंतर हा परिसर निर्मनुष्य झाला. पोलिस आदिवासींकडे संशयाच्या नजरेने बघत आहेत. चिंतलगुफा येथील कॅम्पमध्येच काही दिवसांपूर्वी शहीद झालेल्या जवानांचे वास्तव्य होते. या घटनेनंतर या कॅम्पमधील वातावरणच बदलले. स्तब्ध झालेले प्रश्‍नार्थक चेहरे इथे बघायला मिळतात. याही परिस्थितीत ते आपले कर्तव्य बजावत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक नव्या चेहऱ्याला संशयाने बघितले जाते. या कॅम्पच्या समोर एका दगडावर इंग्रजीत "वेलकम टू हेवन' असे लिहिलेले आहे. या दगडाच्या मागे तीन वर्षांपूर्वी माओवाद्यांशी लढताना शहीद 12 जवानांचा स्मृतिस्तंभ आहे. याला लागूनच मोठा तलाव आहे. तिथे शेकडो कमळे फुललेली आहेत. प्रथमदर्शनी कुणीही बघितले तर येथे नंदनवन असल्याचा साक्षात्कार होतो; मात्र तो फसवा आहे. याची कल्पना थोड्या दूर अंतरावर गेल्यावर लक्षात येते. ओबडधोबड रस्ते, तुटलेले पूल, जागोजागी नक्षलवाद्यांनी खोदलेले खड्डे याशिवाय येथे दुसरे काहीच नाही.

चिंतलगुफानंतर कांकेरलंका, पोलमपल्ली आणि शेवटचा चिंतलनार कॅम्प आहे. चितलनार कॅम्पमधील जवान शहीद झालेले आहेत. येथे भेट दिली असता जवानांच्या चेहऱ्यावरील संताप ओसंडून वाहत होता.

रस्ताही मृत्यूकडे नेणारा
"स्वर्गात या' म्हणून स्वागत करणाऱ्या चिंतलगुफा ते चिंतलनार यादरम्यान 12 किलोमीटरचा रस्ता "मृत्युमार्ग' झाला आहे. नक्षलवाद्यांनी जागोजागी भूसुरुंग पेरून ठेवलेला आहे. त्यामुळे कधी स्फोट होईल याचा नेम नाही. झाडांलगत प्रेशरबॉम्ब लावलेले आहेत. आज पोलिसांना चार जिवंत बॉम्ब मिळाले. त्यामुळे या मार्गावरून चालताना कधीही मृत्यू समोर उभा राहू शकतो, हे लक्षात घेऊनच गावकरी आणि जवान येणाऱ्यांना सावध करीत आहेत.

गाव की स्मशान?
या घटनेनंतर चितलगुफा, चिंतलनार, कांकेरलंका, पोलमपल्ली ही गावे अक्षरश: निर्मनुष्य झालेली आहेत. गावांत घरे होती; पण दिसत नव्हती ती माणसं. जनावरे मात्र रस्त्यावरच चरत होती. एखादंदुसरे लहान मूल दृष्टीस पडले तेवढेच. या चारही गावांनी हा थरार अनुभवला. पोलमपल्ली येथील लालूसिंग म्हणाले, "उभ्या आयुष्यात अशी घटना अनुभवलेली नाही. दिवाळीच्या फटाक्‍यांचे मोठे आवाज कानावर पडत होते. आम्ही मात्र घरात बसूनच हा थरार अनुभवला. मदत केली तर नक्षलवाद्यांचा त्रास होतो.
आता संशयित म्हणून पोलिसांचा त्रास सुरू होईल.' लालूसिंगशिवाय एकानेही अनोळखी व्यक्तीशी बोलण्याची हिंमत केली नाही.

जागोजागी खुणा
चितलगुफा ते चिंतलनार या मार्गावर नक्षलवाद्यांनी केलेल्या विध्वंसाच्या खुणा स्पष्टपणे जागोजागी दिसतात. रस्त्यावर बांधलेले पूल, शासकीय कार्यालये आणि शाळा स्फोटात छिन्नविच्छिन्न झाल्या आहेत. जमीनदोस्त झालेल्या या इमारती इथल्या नरकस्वरूप परिस्थितीची कल्पना देतात.

प्रथमच 'मोलोटीव-काकटेल'चा वापर
दंतेवाडा जिल्ह्यातील ताडमेटला येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करताना प्रथमच "मोलोटीव-काकटेल' या नावाचे रसायन वापरल्याची माहिती समोर आली आहे.

ताडमेटला येथील नक्षल्यांच्या दलात 76 शहीद झाले होते. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी बंदूक, ग्रेनेड, तिरकमठ्यांचा वापर केला होता. मात्र, या जवानांचे मृतदेह हाती लागल्यानंतर त्यांच्या अंगावरील जखमा बघता या हल्ल्यात वेगळे काही वापरले असावे, अशी शंका व्यक्त केली जात होती. ज्या हेलिकॉप्टरने जवानांचे मृतदेह उचलण्यात आले, त्या पायलटच्या सेवेत असणाऱ्या छत्तीसगड पोलिस दलातील ओ. पी. साहू या शिपायाने मृतदेह प्रत्यक्ष बघितले. त्यांनीही यात हा प्रकार वेगळा असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले होते.
मोलोटीव काकटेल नावाच्या रसायन पेट्रोल आणि पेट्रोलियम जेलीपासून तयार केले जाते. काचेच्या बाटलीत भरून त्याला आग लावून हवेत फेकले जाते. याचा स्फोट होऊन अंगावर पडले की व्यक्ती भाजते. याचाच वापर नक्षलवाद्यांनी या हल्ल्यात केला. बहुतेक जवानांच्या शरीरावर पोळल्याच्या खुणा होत्या. संबंधित बातम्या
रक्तचिंब छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा खच
निमलष्करी फौजा परत पाठवा
कोंदावाही जंगलात पोलिस-नक्षलवाद्यांत चकमक

प्रतिक्रिया
On 4/9/2010 2:45 PM मराठी मन said:
अशा घटना घडल्यानंतर काय करावं तेच कळतं नाही...आपले ७६ जवान शहिद झाले, वाटते आता तरी शासन जागे होऊन ठोस कार्यवाही करुन नक्षलवाद्यांचा बिमोड करेल....देशाचे रक्षण करण्यासाठी लष्करात भरती व्हायचे आणि देशातील या शक्तींशी सामना करतच मरायचे. आज ७६ तर उद्या १०० शहिद होतील, आपण फ़क्त ’आत्म्यांना शतश प्रणाम’ म्हणायचे आणि पुढील ’आत्म्यांना शतश प्रणाम’ म्हणण्यासाठी तयार व्हायचे. सरकार आश्वासन देत राहणार आपण ते घेत राहणार... बाकी काय! काय करणार...नुसतीच मत मांडून काहीच होणार नाही, काय करायला हवं?????
On 4/9/2010 12:02 PM PRADIP said:
सर्व शहीद जवानांना शतशः प्रणाम! शतशः प्रणाम! शतशः प्रणाम! शतशः प्रणाम!
On 4/9/2010 11:37 AM masum said:
मन सुन्न झालं हे सर्व वाचून ! communist ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे.हिचा समूळ नायनाट होण आवश्यक आहे. अजून किती जवानांचे आम्ही बळी देणार आहोत?आणि कुठे कुठे?सर्व शहीद जवानांना शतशः प्रणाम!
On 4/9/2010 10:20 AM dipti said:
आमच्या पोलिसांना सलाम ज्यांनी तिथे आपला प्राण गमावला...नक्षल वादी लोक तुम्ही भ्याड आहात..आम्ही तुमचा धिक्कार करतो.....तुम्ही अशा निष्पाप लोकांचे बळी आणि शाप घेतल्यानंतर कधीही सुखी राहू शकणार नाही.
On 4/9/2010 8:47 AM Sachin Arvind Sonawane said:
do we have political will to get out of this mess, are we really going to help our troopers.
On 4/9/2010 4:19 AM aai said:
मन सुन्न झालाय.त्या सगळ्या जवानांच्य आत्म्यांना शतश प्रणाम.. त्या सर्वांच्या कुटुंबियाच्या दुख्खात आम्ही सामील आहोत.एकच वाटते व्यर्थ न हो हे बलिदान
On 09/04/2010 00:54 Ashish said:
काय प्रतिक्रिया देऊ, ह्या सरकारने देशाचे पूर्ण वाटोळा केला आहे. हे साध्या नक्षल् वाद्यांना नाही रोखू शकत, हे काय चीन आणी पाकीस्थान शी लढतील. स्वार्थाची पोळी भाजून झाली की झाले, कोणी मरो की जलो.... सांगा त्या ८३ विधवांना की आमच्या हातून काही चूक घडली ते... ह्यांना देश सांभाळता येत नाही म्हणूनच आज पर्यंत काश्मीर भारतात नाही आहे. देव ह्या देशाचे भला करो...
Thank you.
Your Comment will be published after Screening.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.