সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 03, 2017

मोर्चा निघणारच

नागपूर -  शासनाचा विकास खरच पागल झाला आहे......शासनाला सर्व कामे, उपक्रम फुकट करून घ्यायची आहे....तोडा फोडा व झोडा अशीच स्थिती निर्माण करून शिक्षक संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न असून सरकारी जि प शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे.
आजपर्यँच्या इतिहासात दरवर्षी बदल्या होतील असा GR निघाला नाही....पण आज 27/02 च्या GR मुळे घडणार आहे....कारण वास्तव्य कालावधी हा शाळा किंवा तालुका स्तरावरील गृहीत न धरता.....*जिल्ह्यातील एकूण 10 वर्षे सेवा झालेला शिक्षक हा बदलीपात्र ठरवून तो संवर्ग 1 किंवा 2 मध्ये येई पर्यंत दरवर्षी बदलीपात्र राहणार व दरवर्षी त्याच्यावर बदलीची टांगती तलवार राहणार......हे 100% सत्य👌

ऑनलाईन कामा संदर्भात कुठलीही पायाभूत सुविधा न पुरविता सर्व कामे शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या खिशातून (वेतनातून) करावी ही शासनाची सक्ती म्हणजे आपल्याला आर्थिक गुलामगिरी कडे नेणारी बाब आहे...👌

शाळा A श्रेणी मध्ये आणावी तरच वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर हा तर शिक्षकांना न्याय हक्का पासून वंचित करण्याचा डाव आहे.....👌
गुणवत्ता वाढावी, शाळा सुंदर असावी यामध्ये कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही......पण दरवर्षी बदली पात्र शिक्षक राहणार असेल तर....गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा बँड वाजल्याशिवाय राहणार नाही.... हेही तितकेच खरे👌

विद्यार्थी म्हणजे यंत्र व शिक्षक म्हणजे कामगार अशी नेमकी घोडचूक शासन करीत असून 27/02च्या GR ने अस्थिरता निर्माण करीत आहे...👌

*सजीवांच्या आंतरक्रिया, भाव भावना यांचे नाते तोडून तांत्रिक बाबी यशस्वी (ऑनलाइन बदल्या) करण्याचा असीम  अट्टाहास सुरू आहे.*

@ शरद भांडारकर
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना, नागपूर


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.