काव्यशिल्प Digital Media: बिबट

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बिबट. Show all posts
Showing posts with label बिबट. Show all posts

Thursday, September 27, 2018

उघड्यावर शौचालयाला गेला अन.. गमवावा लागला जीव

उघड्यावर शौचालयाला गेला अन.. गमवावा लागला जीव

बिबिट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे.जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मुरपार येथील एका ८ वर्षाचा मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.मात्र हि घटना काही वेगळ्या कारणाने घडल्याचे समोर येत आहे.साहिल सालोरकर वय 8 वर्षे असे बिबट्याने ठार केलेल्या बालकाचे नाव आहे.हा मुलगा सकाळी आई पाठोपाठ उघड्यावर शौचालयाला गेला असता त्याचेवर दबा घरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.बिबट्याने झडप घातली व त्याला खेचत जंगलात नेले. आरडाओरडा केल्या नंतर संपूर्ण गाव गोळा झाला व जंगलात साहिल चा शोध घेतला असता तो मृत अवस्थेत आढळून आला. 
महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्रात २०१२मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
घडलेल्या या प्रकारावरून शासनाच्या योजना घराघरात कितपत पोहोचल्या आहेत याचा प्रत्यय समोर येत आहे.

Saturday, July 21, 2018

अपघातात जखमी झालेल्या बिबट्याच्या अखेर मृत्यू

अपघातात जखमी झालेल्या बिबट्याच्या अखेर मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरालगत मुल मार्गावर लोहारा गावाजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या मादी बिबट्याचा मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला .अपघातानंतर उपचारासाठी त्याला गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात आणले होते. तब्बल दोन महिन्यांच्या उपचारानंतरही या बिबट्याची किडनी काम करत नसल्याने बिबट्या मृत्यु झाला. बिबट्याला 16 मे रोजी गोरेवाड्यात आणले होते. प्राथमिक तपासणीत बिबट्याचा मागील उजवा पाय तुटला होता समोरच्या पायाला देखील मोठी जखम झाली होती . त्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली त्याच्या पायात रॉड टाकण्या संदर्भात विचार सुरू होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भाग्यश्री शेंडे यांच्या मार्गदर्शनात त्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याच्या किडनी निकामी झाल्यावर त्या त्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरीष उपाध्ये डॉक्टर विनोद धूत,भाग्यश्री शेंडे यांच्या उपस्थितीत डॉक्टर सोनकुसरे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर गोरेवाडा उपविभागीय व्यवस्थापकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सहाय्यक वनरक्षक वनपाल माडभुशी,वनपाल चव्हाण,वनरक्षक जाधव,वाघाडे आदी उपस्थित होते.

Tuesday, May 15, 2018

चंद्रपुरात बिबट्याच्या वन अधिकाऱ्यावर हल्ला

चंद्रपुरात बिबट्याच्या वन अधिकाऱ्यावर हल्ला

नागपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर-मुल मार्गावर अधन्यात वाहनाच्या धडकेत जखमी वन अधिकाराच्या अंगावर झडप घेत हल्ला चढविला,या बिबट्याला उपचाराकरिता नेण्यासाठी वनविभागाची टीम १२ तासापासून बिबट्याला जेरबंद करायच्या प्रयत्नात होती,मात्र या चवताडलेल्या  बिबट्याने चक्क वाचवायला गेलेल्या वन अधिकाऱ्यावरच हल्ला केला,मात्र वन अधिकारी संतोष थीपे यांनी या बिबट्याचा प्रतिकार केला, यात वनपरीक्षेत्र अधिकारी थोडक्यात बचावले चंद्रपूर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर चंद्रपूर- गडचिरोली महामार्ग हा प्रकार घडला.वन अधिकार्यावर हल्ला चढविला असता दरम्यान  त्यांच्या हातात असलेल्या फायबर रॉडने त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्यावर रोड ऊगारला त्यामुळे संतोष थिपे हे थोडक्यात बचावले, तब्बल पाच मिनिटे हा प्रकार सुरू होता हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे ही थरारक आणि  बिबट्या आणि वन अधिकारी यांची झुंज समोर आली. वाहनाने वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती व तो परिसरातील बांबूचे झुडपांमध्ये लपलेला होता या याचा दरम्यान वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याला उपचारासाठी न्यायला आले असता त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला,यानंतर त्याला जेरबंद करून उपचारासाठी चंद्रपूर येथे आनण्यात आले आहे.

  -----------------------------------------------------------------------
जाहिरात...

भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Sunday, January 14, 2018

झुंजीमध्ये बिबट्याचा मृत्यू

झुंजीमध्ये बिबट्याचा मृत्यू

उमरेड/वार्ताहर:
उमरेड तालुक्यातील लोहारा गावाजवळ रविवार १४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ८ वा.  दरम्यान दोन शेतकरी व बिबट्याच्या  झुंजीमध्ये बिबट्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी रवींद्र भाऊराव ठाकरे रा. लोहारा व राजेंद्र देवनाथ ठाकरे रा. खुर्सापार येथील रहिवासी असून या दोघांचीही शेती लोहारा जंगलाला लागून आहे. रोजच्याप्रमाणे दोघेही रात्री  आपआपल्या शेतामध्ये पिकांची पाहणी  करण्याकरिता गेले होते. दिवस उजाळल्यानंतर रवींद्र ठाकरे यांना एक बिबट त्यांच्या शेतातील मालकीच्या बैलावर हल्ला  करताना दिसला.
                                 हे दृष्य पाहून त्याने काहीही एक विचार न करता वाघाच्या दिशेने धाव घेतली. मिळेल त्या साधणांनी वाघाला हाकलून लावले. परंतु, थोड्याच वेळात परत वाघाने रवींद्रवर हल्ला चढविला व त्याला गंभीर जखमी केले. तेव्हा रविंद्रची आरडा ओरडा पाहून बाजूच्या शेतात असलेला राजेंद्र हा रवींद्रच्या दिशेने धावला व  मिळेल त्या वस्तुने वाघाच्या शरीरावर मारणे सुरू केले. या झटापटीत रवींद्रला बिबट्याने जखमी केले. मदतीला राजेंद्र धावून आला. बैल, शेतकरी रवींद्र व बिबट्याच्या जीवघेण्या झुंजीमध्ये दोन्ही शेतकºयांनी आपली सुटका केली. परंतु ,त्यांच्या झुंजीमध्ये वाघाचा मृत्यू झाला. बिब्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे असल्याचे समजते. तेव्हा काही वेळेने ही बातमी गावामध्ये वाºयासारखी पसरली. यानंतर गावकºयांनी त्याठिकाणी धाव घेवून दोन्ही जखमी शेतकºयांना नागपूर येथील रुग्णालयात हलविले. 
                           थोड्याच वेळात उमरेड येथील वनविभागाचा चमु व पोलिस पथक दाखल झाले. पंचाच्या उपस्थितीत वाघाचा पंचनामा करुन लोहारा जवळील नर्सरीमध्ये वाघावर अग्नीसंस्कार करण्यात आले. परंतु या घडलेल्या घटनेमुळे गावातील सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतातील पिकाची व आपल्या पाळीव प्राण्याचे काय होणार असा प्रश्न नागरिकांसमोर पडला असून वनकर्मचारी  कर्मचारी फक्त पाहण्याचीच भूमिका घेणार की काही करणार असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे.

Wednesday, November 15, 2017

भुज पद्मापूर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

भुज पद्मापूर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

 ब्रह्मपुरी /प्रतिनिधी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण वन परिसराअंतर्गत येणाऱ्या भूज पद्मापूर येथे श्री.दादाजी उंदरु तलांडे वय (55) गुराखी हा  गायीं चरायला जंगल मध्ये नेला असता झुडपा मध्ये लपुन बसलेल्या पिसाळलेल्या वाघानी हल्ला चढवून गंभीर जखमी केले.असून जखमी गुराखी याला प्रथोमपचारा करीता ब्रम्हपुरी रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे
 तरी संभाव्य धोके लक्षात घेता वन विभागाने तात्काळ पिसाळलेल्या वाघाला जेरबंद करावे अन्यथा आंदोलन करण्याच इशारा तेथील ग्रामस्थांनी दिला आहे

Friday, November 10, 2017

शिर्शीतल्या बेपत्ता मुलीचा तब्बल ५ दिवसानंतर लागला शोध

शिर्शीतल्या बेपत्ता मुलीचा तब्बल ५ दिवसानंतर लागला शोध

(चंद्रपूर:ललित लांजेवार) 
सावली तालुक्यातील  शिर्शी गावामध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अंगणात शेकोटीजवळ जेवत बसलेल्या जितेंद्र हजारे यांच्या 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला ओढत नेले होते.त्या मुलीचा तब्बल ५ दिंसानंतर शोध लागला असल्याची माहिती आहे.  सोमवारी हि मुलगी आजीसोबत शेकोटी जवळ बसून जेवत असतांना संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान तिला त्या परिसरातील बिबट्याने मागून हल्ला करत जंगलात खेचत नेले होते.त्यामुळे तिचे फक्त रक्ताने माखलेले कपडे मिळाले होते , त्यामुळे गावात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.

Thursday, November 09, 2017

विदर्भात वाघासाठी धोक्याची घंटा

विदर्भात वाघासाठी धोक्याची घंटा

 वनालगतच्या शेतातील विद्युत तारेचे कुंपन ठरतेय वाघासाठी 'काळ'


वीज प्रवाहामुळे  होणारे वाघांचे मृत्यु थाबविण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी*

*शेतपिक संरक्षणकरिता हवी प्रभावी उपाय योजना....
ताडोबा-बफरच्या धर्तीवर 'व्यक्तिगत सौर ऊर्जा कुंपन'
अनुदान तत्वावर पुरविण्याची मागणी...*


चंद्रपूर : विदर्भात वर्षभरात वीज प्रवाहामुळे मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळे भविष्यातील व्याघ्र संवर्धनाची चिंता निर्माण झाली आहे. त्यावर वेळीच सावध होऊन योग्य उपाययोजना न केल्यास ही मोठी समस्या उभी राहील. विदर्भातील वाढती वाघांची संख्या आणी शेतपीक वाचविण्याकरिता शेतकरी बांधवांकडून होणारे प्रयत्न म्हणजे शेतकरी विरूध्द वाघ पर्यायाने वनविभाग असा नवा संघर्ष उभा होत आहे.



विदर्भात विदयुत प्रवाहामुळे होणारे वाघ मृत्यु ची त्वरित दखल घेऊन थाबविण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची मागणी एका निवेदनद्वारे वनमंत्री सुधीर मुुनगंटीवार यांच्याकडे इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. सोबतच वाघाचे मृत्यू आणि शेतपीक नुकसान थांबविण्याकरीता बफरच्या धर्तीवर ‘व्यक्तीगत पातळीवर सौर उर्जा कुंपन अनुदान तत्वावर’ देण्याची मागणी केली आहे.



मागील सप्ताहात 4 नोव्हेंबर 2017 ला चपराळा येथे रेडीओ काॅलर लावुन सोडण्यात आलेली वाघीण अशाच विदयुत प्रवाहाच्या धक्काने मारली गेली. 7 नोव्हे 2017 चिमुर वनक्षेत्रातील आमडी शेतशिवारातील वाघ मृत अवस्थेत आढळला. तिथेही विज तारेचे कुंपन लावण्यात आलेले होते. यासोबत मागील 13 आॅक्टोबर 2017 ला ब्रम्हपुरी येथुन सोडण्यात आलेली वाघीण सुध्दा शेतातील वीज प्रवाहाने बोर व्याघ प्रकल्प लगत वर्धा जिल्ह्यात मृत झाली होती. नागपुर जिल्ह्यात सुद्धा अशीच घटना आहे. प्रसिद्ध श्रीनीवास वाघ रेडीओ काॅलर असलेला ब्रम्हपुरी वनविभागात 27 एप्रील 2017 रोजी मृत अवस्थेत आढळला. त्यापुर्वी मध्य चांदा कोठारी अंतर्गत 3 नोव्हे 2016 ला एक वाघ मेलेला आहे. यांनतर 3 डिसें 2016 ला बाजुच्या तेलगांणा राज्यात कागजनगर येथे मध्य चांदा वनविभागातुनच स्थलांतरीत झालेला वाघ सुध्दा तिथेही याच कारणानी मेला.



वरील काही घटनात वाघांना रेडीओ काॅलर असल्याने व कुणी माहिती दिल्याने या घटना बाहेर आलेल्या आहेत. जे वाघ विदयुत प्रवाहाने मृत झाले असतील आणि जमिनीत पुरले गेले असतील अशा काही घटना नाकारता येत नाहीत. वाघांसोबतच चंद्रपूरात 3 रानगवे एकसाथ विदयुत प्रवाहाने मेलेत, एका शेताच्या कुंपनात अनेक वन्यप्राण्यांचे हाडांचे सापळे काढण्यात आले यावरून तृणभक्षी प्राणी सुध्दा मोठया प्रमाणात मृत्युमुखी होत असल्याचे एकदंरीत चित्र आहे.



विदर्भातील शेतकरी कोरडवाहु शेती करणारा मोठा वर्ग आहे. जेमतेम एक पिकावर शेतकरीचे वर्षभराचे अर्थशास्त्र अवलंबुन आहे. उभे पिक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न शेतक-यांकडून केले जाते. वन्यप्राण्यांपासून शेतपीक वाचविण्याकरीता शेतकरीकडुन अशा पध्दतीने तारेचे कुंपन शेताभोवती करून त्यात जिंवत वीज प्रवाह सोडला जातो. कारण, विदर्भातील शेतकरीची ‘अस्मानी आणी सुलतानी’ संकटातुन वाचलेले पिक वन्यप्राण्यापासुन वाचविण्याकरीता स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शेतात जिवंत वीज प्रवाह सोडतात. अशा चुकीच्या पध्दतीने आपला जिव जाईल, हे माहीती असताना सुध्दा असे प्रयत्न सुरू आहेत. विदयुत प्रवाहाने शेतकरीच मरण्याच्या घटना जिल्हयात व विदर्भात घडलेल्या आहेत. अशा चुकीच्या पध्दतीने विदयुत प्रवाह शेतात सोडणे हे नक्कीच समर्थनीय नाही. परंतु, ही सर्व धडपड वन्यप्राण्यापासून उभे पिक वाचविण्यासाठी असते. यावर विदयुत विभागाचे व वनविभागाचे कुठलेही नियंत्रण नसते. वाघांच्या शेतात येण्यावर सुध्दा कुणाचेच नियंत्रण नसल्याने अनेक वाघ आणी वन्यप्राणी मृत्युमुखी होत आहेत.





विदर्भातील वाढलेली वाघांची संख्या, त्यांचे होणारे स्थलांतर, स्थंलातर होताना वन्यप्राण्याचे भ्रमणमार्ग हे फक्त जंगल नसल्याने शेतशिवार, गावे, रस्ते-हायवे, नदया-नाले हे सर्व ओलांडुन पुढील वनक्षेत्राचा शेकडो किमीचा प्रवास पुर्ण करतात. तसेच वनव्याप्त गावातील शेती, वनालगत असलेले शेतशिवार म्हणजे येथे वाघांचा वावर असतोच. शेतशिवारातील पाळीव प्राण्याची शिकार करण्यास किंवा शेतशिवारात येणारे रानडुक्कर, निलगाय व इतर तृणभक्षी प्राणी यांची शिकार करण्यास वाघ येतो अशावेळी तिथे अशा पध्दतीने शेतक-याने तारेचे कुंपन करून त्यात जिवंत विदयुत प्रवाह सोडण्यात आलेला असल्यास तिथे वाघांसाठी धोका संभवतो. वनविभाग सोबतच विद्युत् विभागने अश्या घटना घडणार नाही, विजेचा चुकीचा वापर होणार नाहीं याकडे लक्ष देने अत्यंत गरजेचे आहे.

Monday, November 06, 2017

सिर्सीत बिबट्याचा चिमुकलीवर हल्ला

सिर्सीत बिबट्याचा चिमुकलीवर हल्ला


सावली/प्रतिनिधी:
सीर्शी या गावामध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून जितेंद्र हजारे यांच्या 4 वर्ष्याच्या मुलीला अंगणात आजीसोबत शेकोटी शेकत असताना उचलून नेले आहे. त्यामुळे गावात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यानंतर गावकऱ्यांनी मुलीचा शोध सुरू केला आहे मात्र वृत्त लिहेपर्यंत मुलीचा शोध लागलेला नाही. फक्त तिचे रक्ताने माखलेले कपडे मिळाले आहेत .स्थानिक वनविभागाचे अधिकारी,पोलिस व गावकरी यांच्या मदतीने मुलीचा  शोध सुरु आहे.